शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

नेत्यांच्या कोलांटउड्यांनी कार्यकर्त्यांची गोची

By admin | Updated: September 29, 2014 23:07 IST

विधानसभा निवडणुकीला आता खरा रंग चढत आहे. निवडणूक जसजशी जोमात येत आहे तसतशा राजकीय घडामोडींना वेग येत आहे. इकडचे कार्यकर्ते तिकडे आणि तिकडचे इकडे खेचून प्रमुख पक्षांकडून आपली

गोंदिया : विधानसभा निवडणुकीला आता खरा रंग चढत आहे. निवडणूक जसजशी जोमात येत आहे तसतशा राजकीय घडामोडींना वेग येत आहे. इकडचे कार्यकर्ते तिकडे आणि तिकडचे इकडे खेचून प्रमुख पक्षांकडून आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र यात ज्या उमेदवाराच्या विजयाची शक्यता जास्त, त्यांच्याकडे जाण्यास अनेक जण इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.विशेष म्हणजे अनेक वर्षे ज्या पक्षाचा झेंडा घेऊन मिरवलो त्या पक्षाने तिकीट नाकारल्याने ऐन वेळी दुसऱ्या पक्षाच्या तिकीटवर मैदानात उतरलेल्या नेत्यांमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच गोची झाली आहे. नवीन पक्षात काम करण्याची मानसिकता बनविणे त्यांच्यासाठी कठीण होत आहे. प्रत्यक्ष मतदानाला आता अवघे १५ दिवस उरले आहेत. त्यामुळे उमेदवारांची धडधड वाढू लागली आहे. अशात आपले कार्यकर्ते वाढविण्यासाठी दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळविण्याचे सत्र प्रमुख उमेदवारांकडून सुरू आहे. यात कार्यकर्तेसुद्धा आपल्या ‘भविष्या’चा विचार करून कोणाला साथ देणे जास्त फायदेशीर ठरेल याचा विचार करून भविष्याची दिशा निश्चित करताना दिसत आहे. यातूनच कार्यकर्त्यांची फुटा-फूट सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांची यादी बुधवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेनंतर निश्चित होईल. रिंगणात अनेक जण राहणार असले तरी प्रमुख राजकीय पक्षातील उमेदवारांतच लढत होणार असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या या युद्धात साम, दाम, दंड व भेद या अस्त्रांचा वापर करण्यास सुरूवात झाली आहे. निवडणूक म्हटली की यामध्ये मतदार व कार्यकर्ते या दोन गोष्टी अतिमहत्वाच्या आहेत. यामुळे आता मतदारांचा कल आपल्याकडे वळविण्यासाठी उमेदवार प्रचार सभा व भेटी-गाठींचे माध्यम अवलंबित आहेत. कार्यकर्त्यांची संख्या वाढविण्यासाठी दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचून आपली ताकद वाढविण्यासोबतच इतरांना कमजोर करण्याचा प्रयत्न सर्वच पक्षातून होत आहे. मात्र काही ठिकाणी कार्यकर्ते सुरक्षित भविष्याची चाहुल ओळखून स्वत:हून एखाद्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. काही अनुभवी उमेदवार राजकारणात रमलेले आहेत. यामुळे त्यांना हे कसब चांगलेच अवगत आहे. कार्यकर्ते आपल्या खेम्यात आल्यास त्यांची मतं तर मिळणारच, मात्र त्यांचा वापर करून त्यांच्या संपर्कातील अन्य मते सुद्धा खेचता येतील या उद्देशाने कार्यकर्त्यांमध्ये फुटा-फुटीचे राजकारण आता गाजू लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)