शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
3
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
4
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
5
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
6
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
7
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
8
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
9
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
10
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
11
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
12
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
13
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
14
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
15
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
16
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
17
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
18
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
19
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
20
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?

नेत्यांच्या कोलांटउड्यांनी कार्यकर्त्यांची गोची

By admin | Updated: September 29, 2014 23:07 IST

विधानसभा निवडणुकीला आता खरा रंग चढत आहे. निवडणूक जसजशी जोमात येत आहे तसतशा राजकीय घडामोडींना वेग येत आहे. इकडचे कार्यकर्ते तिकडे आणि तिकडचे इकडे खेचून प्रमुख पक्षांकडून आपली

गोंदिया : विधानसभा निवडणुकीला आता खरा रंग चढत आहे. निवडणूक जसजशी जोमात येत आहे तसतशा राजकीय घडामोडींना वेग येत आहे. इकडचे कार्यकर्ते तिकडे आणि तिकडचे इकडे खेचून प्रमुख पक्षांकडून आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र यात ज्या उमेदवाराच्या विजयाची शक्यता जास्त, त्यांच्याकडे जाण्यास अनेक जण इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.विशेष म्हणजे अनेक वर्षे ज्या पक्षाचा झेंडा घेऊन मिरवलो त्या पक्षाने तिकीट नाकारल्याने ऐन वेळी दुसऱ्या पक्षाच्या तिकीटवर मैदानात उतरलेल्या नेत्यांमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच गोची झाली आहे. नवीन पक्षात काम करण्याची मानसिकता बनविणे त्यांच्यासाठी कठीण होत आहे. प्रत्यक्ष मतदानाला आता अवघे १५ दिवस उरले आहेत. त्यामुळे उमेदवारांची धडधड वाढू लागली आहे. अशात आपले कार्यकर्ते वाढविण्यासाठी दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळविण्याचे सत्र प्रमुख उमेदवारांकडून सुरू आहे. यात कार्यकर्तेसुद्धा आपल्या ‘भविष्या’चा विचार करून कोणाला साथ देणे जास्त फायदेशीर ठरेल याचा विचार करून भविष्याची दिशा निश्चित करताना दिसत आहे. यातूनच कार्यकर्त्यांची फुटा-फूट सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांची यादी बुधवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेनंतर निश्चित होईल. रिंगणात अनेक जण राहणार असले तरी प्रमुख राजकीय पक्षातील उमेदवारांतच लढत होणार असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या या युद्धात साम, दाम, दंड व भेद या अस्त्रांचा वापर करण्यास सुरूवात झाली आहे. निवडणूक म्हटली की यामध्ये मतदार व कार्यकर्ते या दोन गोष्टी अतिमहत्वाच्या आहेत. यामुळे आता मतदारांचा कल आपल्याकडे वळविण्यासाठी उमेदवार प्रचार सभा व भेटी-गाठींचे माध्यम अवलंबित आहेत. कार्यकर्त्यांची संख्या वाढविण्यासाठी दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचून आपली ताकद वाढविण्यासोबतच इतरांना कमजोर करण्याचा प्रयत्न सर्वच पक्षातून होत आहे. मात्र काही ठिकाणी कार्यकर्ते सुरक्षित भविष्याची चाहुल ओळखून स्वत:हून एखाद्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. काही अनुभवी उमेदवार राजकारणात रमलेले आहेत. यामुळे त्यांना हे कसब चांगलेच अवगत आहे. कार्यकर्ते आपल्या खेम्यात आल्यास त्यांची मतं तर मिळणारच, मात्र त्यांचा वापर करून त्यांच्या संपर्कातील अन्य मते सुद्धा खेचता येतील या उद्देशाने कार्यकर्त्यांमध्ये फुटा-फुटीचे राजकारण आता गाजू लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)