शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

जन्मापासून मृत्यूपर्यंत कायद्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 20:47 IST

प्रत्येकाला अधिकार मिळावा, समाजात वावरताना कुणावरही अन्याय होता कामा नये. प्रत्येकाला त्याच्या मूलभूत हक्कापासून वंचित केले जाऊ नये. कायद्याच्या चाकोरीतूनच उत्तम समाज निर्मिती व्हावी. महिलांना समाजात सन्मान मिळावा. कायदे मनुष्याच्या हितासाठीच झाले आहेत.

ठळक मुद्देस्वप्नील रामटेके : तालुका विधी सेवा समितीचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : प्रत्येकाला अधिकार मिळावा, समाजात वावरताना कुणावरही अन्याय होता कामा नये. प्रत्येकाला त्याच्या मूलभूत हक्कापासून वंचित केले जाऊ नये. कायद्याच्या चाकोरीतूनच उत्तम समाज निर्मिती व्हावी. महिलांना समाजात सन्मान मिळावा. कायदे मनुष्याच्या हितासाठीच झाले आहेत. प्रत्येक नागरिकांनी कायद्याचा दुरुपयोग होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. समाजात वावरणाऱ्या प्रत्येकाला जन्मापासून मृत्यूपर्यंत कायद्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन अर्जुनी-मोरगाव येथील दिवानी न्यायाधीश स्वप्नील रामटेके यांनी केले.बोंडगावदेवी येथील सार्वजनिक रंगमंदिरात मंगळवारी लोकअदालत आयोजित करण्यात आली होती. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. तालुका विधी सेवा समिती, वकील संघ, ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून ठाणेदार अनिल कुंभरे, तालुका वकील संघाचे अध्यक्ष श्रीकांत वनपूरकर, अ‍ॅड.पोमेश्वर रामटेके, अ‍ॅड. गौरीशंकर अवचटे, अ‍ॅड.एम.एम. भाजीपाले, अ‍ॅड. टी.डी.कापगते व सरपंच राधेशाम झोळे, उपसरपंच वैशाली मानकर, पोलीस पाटील मंगला रामटेके उपस्थित होते. उपस्थित पक्षकार व सामान्य जनतेला कायदेविषयक मार्गदर्शन करताना अ‍ॅड.श्रीकांत बनपूरकर म्हणाले,समाजामध्ये वावरणाऱ्या प्रत्येक मानवाला कायद्याच्या माहितीसह जाणीव जागृती व्हावी, गरजू वंचितांना कायद्याचे पाठबळ मिळावे यासाठी विधी सेवा समितीच्या वतीने फिरते न्यायालयाचे उपक्रम राबविले जात आहे. ठाणेदार अनिल कुंभरे यांनी कायद्याच्या चाकोरीत राहूनच जीवन जगावे. कायदा हातात घेऊ नये. कायद्याच्या विरोधात जावून कुणीही कृत्य करु नये असे सांगितले. अ‍ॅड. भाजीपाले यांनी कायदे मनुष्याच्या रक्षण व हितासाठी बनविण्यात आले आहे. त्यांनी पोटगी, मुलींचा वारसान हक्क व आधुनिक तंत्रज्ञानसंबंधी जाणीव करुन दिली. अ‍ॅड. गौरीशंकर अवचटे यांनी लोकहितार्थ कल्याणासाठी विविध कायद्याची निर्मिती झाल्याचे सांगितले. सामोपचाराने तंट्यांचा निपटारा लोक अदालतीमधून करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. अ‍ॅड. कापगते यांनी प्रत्येकाला कायद्याची गरज आहे. जन्मापासून ते मरेपर्यंत मनवाला कायद्याची गरज असल्याचे सांगितले. दैनंदिन व्यवहारातील कायद्याची माहिती सामान्य जनतेला व्हावी. यासाठी फिरते न्यायालयाच्या माध्यमातून गावापर्यंत उपक्रम राबविले जात आहे. प्रास्ताविक अ‍ॅड. श्रीकांत बनपूरकर यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज पालीवाल यांनी केले तर आभार ग्रामविकास अधिकारी पी.एम. समरीत यांनी मानले. लोक अदालतीत परिसरातील न्यायालयीन प्रकरण आपसी निपटाºयासाठी ठेवण्यात आली होती. वादी-प्रतिवादींना समझोत्याने वाद सोडविण्यास प्रोत्साहित करण्यात आले.