शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

ग्राम स्वच्छता अभियान ढेपाळले

By admin | Updated: March 3, 2017 01:28 IST

कर्मयोगी संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या महापुरूषांच्या नावावर राज्य शासनाने ग्रामस्वच्छता अभियानाची संकल्पना अंमलात आणली.

लोकसहभागाकडे दुर्लक्ष : अनेक रस्त्यांची दैनावस्थाकेशोरी : कर्मयोगी संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या महापुरूषांच्या नावावर राज्य शासनाने ग्रामस्वच्छता अभियानाची संकल्पना अंमलात आणली. सुरुवातीच्या काळात ग्रामस्वच्छता अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे स्वच्छता अभियानाचे चांगले परिणाम समोर आले. महाराष्ट्राच्या धर्तीवर इतर राज्यांनी देखील स्वच्छता अभियान राबविले. परंतु महाराष्ट्रातच हे अभियान सपेशल ढेपाळल्याचे चित्र दिसायला लागले आहे. त्यामुळे स्वच्छ व सुंदर गावांचे दर्शन आता दुरापास्त झाले आहे. आजही गावातील अनेक रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. जागोजागी कचऱ्याचे ढिगारे पडलेले दिसून येत आहेत. त्यामधून दुर्गंधी सुटत असते. बऱ्याच ठिकाणी शासकीय जागेवर अतिक्रमण करुन जागा बळकविण्याचा प्रयत्न नागरिकांकडून होताना दिसत आहे. याकडे प्रशासनाला लक्ष देण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे या परिसरातील अनेक गावांचा चेहरामोहरा बदलल्याचे दिसत आहे.किमान ज्या अधिकाऱ्यांवर गाव विकासाच्या जबाबदारीची धुरा आहे, ते अधिकारी, पदाधिकारी स्वच्छता किंवा स्वच्छता अभियानाविषयी काही बोलायला नाही. यासंबंधी गावातील सामान्य माणसांना तर त्याचे काही देणे-घेणे नाही. सुरुवातीच्या काळात ज्या गावांनी ग्राम स्वच्छता अभियानात सहभागी होवून शासनाकडून रोख बक्षीस मिळविले, ते गावही आजच्या स्थितीत स्वच्छ राहिले नाही. गावातील स्थानिक सत्तेतील पदाधिकारी बदलले की गावाच्या सुधारणेचे अंदाज बदलले जातात. आपण सत्तेवरुन बाहेर गेलो की गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष होतो, ही भावना उदयास येते. अस्वच्छता म्हणजे गावासाठी संकटे उभे करण्याचे साधन आहे. यामुळे कावीळ, मलेरिया, साथीचे आजार अशी स्थिती असते. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अजूनही बरीच मंडळी रस्त्याच्या दुतर्फा उघड्यावर शौचास बसतात. पावसाळ्याच्या दिवसात हे पाणी नदी, नाल्यात जाते आणि अस्वच्छ पाण्यातून साथीच्या आजाराचा प्रसार होतो. या प्रकाराकडे शासन व प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. (वार्ताहर)