शहरं
Join us  
Trending Stories
1
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
2
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
3
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
4
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
5
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
6
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
7
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
8
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
9
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
10
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
11
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
12
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
13
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
14
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
15
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
16
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
17
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
18
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
19
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
20
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    

ग्राम स्वच्छता अभियान ढेपाळले

By admin | Updated: March 3, 2017 01:28 IST

कर्मयोगी संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या महापुरूषांच्या नावावर राज्य शासनाने ग्रामस्वच्छता अभियानाची संकल्पना अंमलात आणली.

लोकसहभागाकडे दुर्लक्ष : अनेक रस्त्यांची दैनावस्थाकेशोरी : कर्मयोगी संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या महापुरूषांच्या नावावर राज्य शासनाने ग्रामस्वच्छता अभियानाची संकल्पना अंमलात आणली. सुरुवातीच्या काळात ग्रामस्वच्छता अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे स्वच्छता अभियानाचे चांगले परिणाम समोर आले. महाराष्ट्राच्या धर्तीवर इतर राज्यांनी देखील स्वच्छता अभियान राबविले. परंतु महाराष्ट्रातच हे अभियान सपेशल ढेपाळल्याचे चित्र दिसायला लागले आहे. त्यामुळे स्वच्छ व सुंदर गावांचे दर्शन आता दुरापास्त झाले आहे. आजही गावातील अनेक रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. जागोजागी कचऱ्याचे ढिगारे पडलेले दिसून येत आहेत. त्यामधून दुर्गंधी सुटत असते. बऱ्याच ठिकाणी शासकीय जागेवर अतिक्रमण करुन जागा बळकविण्याचा प्रयत्न नागरिकांकडून होताना दिसत आहे. याकडे प्रशासनाला लक्ष देण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे या परिसरातील अनेक गावांचा चेहरामोहरा बदलल्याचे दिसत आहे.किमान ज्या अधिकाऱ्यांवर गाव विकासाच्या जबाबदारीची धुरा आहे, ते अधिकारी, पदाधिकारी स्वच्छता किंवा स्वच्छता अभियानाविषयी काही बोलायला नाही. यासंबंधी गावातील सामान्य माणसांना तर त्याचे काही देणे-घेणे नाही. सुरुवातीच्या काळात ज्या गावांनी ग्राम स्वच्छता अभियानात सहभागी होवून शासनाकडून रोख बक्षीस मिळविले, ते गावही आजच्या स्थितीत स्वच्छ राहिले नाही. गावातील स्थानिक सत्तेतील पदाधिकारी बदलले की गावाच्या सुधारणेचे अंदाज बदलले जातात. आपण सत्तेवरुन बाहेर गेलो की गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष होतो, ही भावना उदयास येते. अस्वच्छता म्हणजे गावासाठी संकटे उभे करण्याचे साधन आहे. यामुळे कावीळ, मलेरिया, साथीचे आजार अशी स्थिती असते. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अजूनही बरीच मंडळी रस्त्याच्या दुतर्फा उघड्यावर शौचास बसतात. पावसाळ्याच्या दिवसात हे पाणी नदी, नाल्यात जाते आणि अस्वच्छ पाण्यातून साथीच्या आजाराचा प्रसार होतो. या प्रकाराकडे शासन व प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. (वार्ताहर)