शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

ग्राम स्वच्छता अभियान ढेपाळले

By admin | Updated: March 3, 2017 01:28 IST

कर्मयोगी संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या महापुरूषांच्या नावावर राज्य शासनाने ग्रामस्वच्छता अभियानाची संकल्पना अंमलात आणली.

लोकसहभागाकडे दुर्लक्ष : अनेक रस्त्यांची दैनावस्थाकेशोरी : कर्मयोगी संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या महापुरूषांच्या नावावर राज्य शासनाने ग्रामस्वच्छता अभियानाची संकल्पना अंमलात आणली. सुरुवातीच्या काळात ग्रामस्वच्छता अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे स्वच्छता अभियानाचे चांगले परिणाम समोर आले. महाराष्ट्राच्या धर्तीवर इतर राज्यांनी देखील स्वच्छता अभियान राबविले. परंतु महाराष्ट्रातच हे अभियान सपेशल ढेपाळल्याचे चित्र दिसायला लागले आहे. त्यामुळे स्वच्छ व सुंदर गावांचे दर्शन आता दुरापास्त झाले आहे. आजही गावातील अनेक रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. जागोजागी कचऱ्याचे ढिगारे पडलेले दिसून येत आहेत. त्यामधून दुर्गंधी सुटत असते. बऱ्याच ठिकाणी शासकीय जागेवर अतिक्रमण करुन जागा बळकविण्याचा प्रयत्न नागरिकांकडून होताना दिसत आहे. याकडे प्रशासनाला लक्ष देण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे या परिसरातील अनेक गावांचा चेहरामोहरा बदलल्याचे दिसत आहे.किमान ज्या अधिकाऱ्यांवर गाव विकासाच्या जबाबदारीची धुरा आहे, ते अधिकारी, पदाधिकारी स्वच्छता किंवा स्वच्छता अभियानाविषयी काही बोलायला नाही. यासंबंधी गावातील सामान्य माणसांना तर त्याचे काही देणे-घेणे नाही. सुरुवातीच्या काळात ज्या गावांनी ग्राम स्वच्छता अभियानात सहभागी होवून शासनाकडून रोख बक्षीस मिळविले, ते गावही आजच्या स्थितीत स्वच्छ राहिले नाही. गावातील स्थानिक सत्तेतील पदाधिकारी बदलले की गावाच्या सुधारणेचे अंदाज बदलले जातात. आपण सत्तेवरुन बाहेर गेलो की गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष होतो, ही भावना उदयास येते. अस्वच्छता म्हणजे गावासाठी संकटे उभे करण्याचे साधन आहे. यामुळे कावीळ, मलेरिया, साथीचे आजार अशी स्थिती असते. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अजूनही बरीच मंडळी रस्त्याच्या दुतर्फा उघड्यावर शौचास बसतात. पावसाळ्याच्या दिवसात हे पाणी नदी, नाल्यात जाते आणि अस्वच्छ पाण्यातून साथीच्या आजाराचा प्रसार होतो. या प्रकाराकडे शासन व प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. (वार्ताहर)