शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

मालगुजारी तलावांची दुरूस्ती व पुनर्स्थापना कामाचा शुभारंभ

By admin | Updated: January 12, 2016 01:41 IST

तालुक्यातील खैरी मालगुजारी तलाव विशेष दुरूस्ती व पुनर्स्थापना कामाचा शुभारंभ तलावाच्या धरणस्थळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.

सामाजिक न्यायमंत्री बडोले : गाळ साचल्याने साठवण क्षमता झाली कमीसडक-अर्जुनी : तालुक्यातील खैरी मालगुजारी तलाव विशेष दुरूस्ती व पुनर्स्थापना कामाचा शुभारंभ तलावाच्या धरणस्थळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रम हरितक्रांती पाणी वापर सहकारी संस्था खोडशिवनी-खैरी व पाटबंधारे विभाग गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले.याप्रसंगी प्रामुख्याने कार्यकारी अभियंता एन.के. ढोरे, उपविभागीय अभियंता ए.एच. डोंगरे, तहसीलदार परूळेकर, माजी सरपंच माधवराव परशुरामकर, पोलीस पाटील भृंगराज परशुरामकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पतिराम परशुरामकर, उपसरपंच मनोहर परशुरामकर, उपसरपंच शिवदास परशुरामकर, पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष महादेव कापगते, सचिव अ‍ॅड. प्रकाश परशुरामकर, विलास समरित व दोन्ही गावातील शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी ना. बडोले म्हणाले, आपली शेती निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. शासनस्तरावर दुष्काळ नियोजनाचे उपाय केले जातात. परंतु निसर्ग कोणाच्या हाती नाही. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी ३०० वर्षांपूर्वी ज्या मालगुजारी तलावांची निर्मिती केली, त्यांच्यात आता गाळ साचल्यामुळे त्यांची साठवण क्षमता कमी झाली आहे. तसेच त्यांचे कालवे जीर्ण झाले आहेत. गेटचे बांधकाम करणे गरजेचे झाले आहे.त्यासाठी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मालगुजारी तलावांकरिता शासनाने १०० कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. याच निधीमधून मालगुजारी तलावांची साठवन क्षमता वाढवून काही प्रमाणात दुष्काळावर मात करण्यात येईल. याकरिता जिल्ह्यातील सर्व मालगुजारी तलावांची दुरूस्ती करण्यात येईल. त्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे ते म्हणाले.याप्रसंगी कार्यकारी अभियंता ढोरे यांनी सांगितले की ९० लाख रूपये खर्चून खैरी तलावाची गाळ काढण्याचे कार्य पूर्ण झाले असून यानंतर गेट, पाटचाऱ्या व कालव्यांचे बांधकाम करण्यात येईल.संचालन भृंगराज परशुरामकर यांनी केले. आभार मनोहर परशुरामकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी शाखा अभियंता व्ही.एम. श्रीवास्तव, माधवराव परशुरामकर, ज्ञानिराम बन्सोड, सुभाष मेश्राम, वरखडे व हरित क्रांती पाणी वापर संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.