शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियानाचा शुभारंभ

By admin | Updated: June 2, 2017 01:28 IST

राज्याच्या कृषी विभागाच्या उन्नत शेती-समृध्द शेतकरी या अभियानांतर्गत रोहिणी नक्षत्रात आधुनिक तंत्रज्ञानयुक्त

शेतकऱ्यांची उपस्थिती : शेतीबाबत मार्गदर्शन लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : राज्याच्या कृषी विभागाच्या उन्नत शेती-समृध्द शेतकरी या अभियानांतर्गत रोहिणी नक्षत्रात आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेतीचा प्रचार व प्रसार पंधरवाडाचा शुभारंभ पंचायत समितीच्या बचत भवनात आयोजित खास शेतकरी सभेच्या माध्यमातून करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झरपडा येथील प्रगतीशील शेतकरी डॉ. उदाराम मुंगमोडे होते. उद्घाटन नाविण्यपूर्ण पीक घेणारे कुसन झोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंडळ कृषी अधिकारी एन.एच.मुनेश्वर, नवेगावबांधचे मंडळ कृषी अधिकारी संजय रामटेके, पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी.बी.उईके, कृषी पर्यवेक्षक आर.के.चांदेवार उपस्थित होते. सर्वप्रथम राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेसमोर दिप प्रज्वलन व माल्यार्पणाने अभिवादन करून उन्नत शेती पंधरवाडा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी तज्ञांंनी विस्तृत असे मार्गदर्शन करून अभियानाबद्दल माहिती विशद केली. आपल्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांना मौलीक सल्ला देताना कृषी अधिकारी म्हणाले की, दिवसेंदिवस शेती उत्पादनासाठी खर्चाचे प्रमाण वाढत आहे. शेती उत्पादनासाठी आवश्यक साधन सामुग्रीच्या किंमतीचे भाव दुपटीने वाढत आहे. याबाबीचा शेतकऱ्यांनी विचार करून कमी खर्चाची शेती करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. वडिलोपार्जीत शेतीला बदल देऊन आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करण्याची तत्परता शेतकऱ्यांनी दाखवावी. जपानी पध्दतीने भाताची लागवड करावी. रासायनिक खताचा वापर कमी जैवीक, सेंद्रीय खताचा वापर शेतकऱ्यांना हितावह आहे. कृषी विभागाच्या सल्यानी शेतामध्ये नगदी पीक देणारे फळभाज्या, केळी, कारल्या, मका, टरबूज आदी पिकाची लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे. पिकावर येणाऱ्या किडीचा वेळीच बंदोबस्त करावा. कृषी उपयोगासाठी साहित्य घ्यावे, असे महत्वाचे मार्गदर्शन करण्यात आले. अभियानाच्या पहिल्याच दिवशी अर्जुनी-मोरगाव, ईटखेडा, माहुरकुडा, वडेगाव-रेल्वे, नवेगावबांध, गोठणगाव, धाबेपवनी, चापटी, सिरोली, धाबेटेकडी, जांभळी इत्यादी गावात शेतकरी सभा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. संचालन विलास कोहाडे यांनी केले. प्रास्ताविक मुनेश्वर यांनी मांडले. आभार हुकरे यांनी मानले.