शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
4
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
5
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
6
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
7
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
8
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
9
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
10
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
11
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
12
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
13
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
14
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
15
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
16
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
17
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
18
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
19
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
20
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!

शेतीची मशागत अंतिम टप्यात

By admin | Updated: June 8, 2014 23:59 IST

उन्हाळ्याचा शेवट आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकर्‍यांना शेतीची पूर्ण मशागत करणे आवश्यक असते. ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत शेतकरी सध्या शेतीच्या मशागतीत व्यस्त आहे.

रावणवाडी : उन्हाळ्याचा शेवट आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकर्‍यांना शेतीची पूर्ण मशागत करणे आवश्यक असते. ऊन, वारा,   पाऊस अंगावर झेलत शेतकरी सध्या शेतीच्या मशागतीत व्यस्त आहे. शेतकरी सर्व दु:ख बाजूला सारुन यावर्षी निसर्ग आपल्याला साथ देईल म्हणून रखरखत्या उन्हात शेतीच्या मशागतीचे कार्य जोमाने करू लागला आहे. येत्या काही वर्षापूर्वीपासून शेतकर्‍यांना विविध प्रकारच्या समस्या सहन कराव्या लागत होत्या. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळाच्या छायेत शेतकरी वावरत आहे. आज ऋतूप्रमाणे कोणत्याही ऋतूत कधी उन्हाळ्यात, हिवाळ्यात अकाली पाऊस, किटकांचा प्रकोप होत असल्याने उन्हाळी हंगामात शेतात घेतलेले रबी पिकेही जमीनदोस्त होत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या वाट्याला काहीही उरले नाही. शेतकर्‍यांना निसर्गही साथ देत नसून शासनही शेतकर्‍यांना वेळोवेळी मदत करीत नाही. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांनी कुणाकडून दाद मागावी अशा प्रश्न शेतकर्‍यांसमोर पुढे ठाकला आहे. यावर्षी उन्हाळ्यात निसर्ग रबी पिकासाठी उपयुक्त नसून सुरुवातीच्या काळात अकाली पावसाने दमदार हजेरी लावून पूर्णत: तालुक्यास झोडपून काढले. त्यामध्ये शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. रबी पिकासाठी पेरलेले बियाणे पूर्णपणे उगलेच नाही. तर काही पाण्याने हिरावून घेतले. अशाप्रकारे कठीण समस्या येऊनही शेतकर्‍याने शेतीविषयी आस सोडली नाही. तो पुन्हा या भिषण गर्मीच्या चटक्यात शेतात घाम गाळीत आहे. येत्या खरीप हंगामात चांगले पीक हाती लागेल या उद्देशाने शेतकरी शेत कामासाठी लागणारे विविध प्रकारचे औजारे यांची विधीवत पूजा-अर्चना करुन खरीप हंगामासाठी शेतीच्या पूर्ण मशागतीच्या कामाला लागला आहे. सकाळी ६ वाजतापासून आपल्या घराबाहेर पडलेला हा शेतकरी सायंकाळी ६ वाजतापर्यंंत घरी परत येत नाही. पूर्ण दिवसभर उन्हात भिषण गर्मीचे चटके झेलत शेतीच्या पूर्व मशागतीत मग्न दिसून येत आहे. यंदातरी बर्‍यापैकी उत्पन्न होवून कर्जापासून मुक्तता मिळेल, याच आशेत शेतकरी आहे.  (वार्ताहर)