शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतीची मशागत अंतिम टप्यात

By admin | Updated: June 8, 2014 23:59 IST

उन्हाळ्याचा शेवट आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकर्‍यांना शेतीची पूर्ण मशागत करणे आवश्यक असते. ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत शेतकरी सध्या शेतीच्या मशागतीत व्यस्त आहे.

रावणवाडी : उन्हाळ्याचा शेवट आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकर्‍यांना शेतीची पूर्ण मशागत करणे आवश्यक असते. ऊन, वारा,   पाऊस अंगावर झेलत शेतकरी सध्या शेतीच्या मशागतीत व्यस्त आहे. शेतकरी सर्व दु:ख बाजूला सारुन यावर्षी निसर्ग आपल्याला साथ देईल म्हणून रखरखत्या उन्हात शेतीच्या मशागतीचे कार्य जोमाने करू लागला आहे. येत्या काही वर्षापूर्वीपासून शेतकर्‍यांना विविध प्रकारच्या समस्या सहन कराव्या लागत होत्या. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळाच्या छायेत शेतकरी वावरत आहे. आज ऋतूप्रमाणे कोणत्याही ऋतूत कधी उन्हाळ्यात, हिवाळ्यात अकाली पाऊस, किटकांचा प्रकोप होत असल्याने उन्हाळी हंगामात शेतात घेतलेले रबी पिकेही जमीनदोस्त होत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या वाट्याला काहीही उरले नाही. शेतकर्‍यांना निसर्गही साथ देत नसून शासनही शेतकर्‍यांना वेळोवेळी मदत करीत नाही. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांनी कुणाकडून दाद मागावी अशा प्रश्न शेतकर्‍यांसमोर पुढे ठाकला आहे. यावर्षी उन्हाळ्यात निसर्ग रबी पिकासाठी उपयुक्त नसून सुरुवातीच्या काळात अकाली पावसाने दमदार हजेरी लावून पूर्णत: तालुक्यास झोडपून काढले. त्यामध्ये शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. रबी पिकासाठी पेरलेले बियाणे पूर्णपणे उगलेच नाही. तर काही पाण्याने हिरावून घेतले. अशाप्रकारे कठीण समस्या येऊनही शेतकर्‍याने शेतीविषयी आस सोडली नाही. तो पुन्हा या भिषण गर्मीच्या चटक्यात शेतात घाम गाळीत आहे. येत्या खरीप हंगामात चांगले पीक हाती लागेल या उद्देशाने शेतकरी शेत कामासाठी लागणारे विविध प्रकारचे औजारे यांची विधीवत पूजा-अर्चना करुन खरीप हंगामासाठी शेतीच्या पूर्ण मशागतीच्या कामाला लागला आहे. सकाळी ६ वाजतापासून आपल्या घराबाहेर पडलेला हा शेतकरी सायंकाळी ६ वाजतापर्यंंत घरी परत येत नाही. पूर्ण दिवसभर उन्हात भिषण गर्मीचे चटके झेलत शेतीच्या पूर्व मशागतीत मग्न दिसून येत आहे. यंदातरी बर्‍यापैकी उत्पन्न होवून कर्जापासून मुक्तता मिळेल, याच आशेत शेतकरी आहे.  (वार्ताहर)