शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
2
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
3
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
4
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
5
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
6
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
7
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
8
Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
9
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
10
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
11
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
12
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
13
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
14
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
15
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
16
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
17
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
18
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
19
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
20
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"

शेतीची मशागत अंतिम टप्यात

By admin | Updated: June 8, 2014 23:59 IST

उन्हाळ्याचा शेवट आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकर्‍यांना शेतीची पूर्ण मशागत करणे आवश्यक असते. ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत शेतकरी सध्या शेतीच्या मशागतीत व्यस्त आहे.

रावणवाडी : उन्हाळ्याचा शेवट आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकर्‍यांना शेतीची पूर्ण मशागत करणे आवश्यक असते. ऊन, वारा,   पाऊस अंगावर झेलत शेतकरी सध्या शेतीच्या मशागतीत व्यस्त आहे. शेतकरी सर्व दु:ख बाजूला सारुन यावर्षी निसर्ग आपल्याला साथ देईल म्हणून रखरखत्या उन्हात शेतीच्या मशागतीचे कार्य जोमाने करू लागला आहे. येत्या काही वर्षापूर्वीपासून शेतकर्‍यांना विविध प्रकारच्या समस्या सहन कराव्या लागत होत्या. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळाच्या छायेत शेतकरी वावरत आहे. आज ऋतूप्रमाणे कोणत्याही ऋतूत कधी उन्हाळ्यात, हिवाळ्यात अकाली पाऊस, किटकांचा प्रकोप होत असल्याने उन्हाळी हंगामात शेतात घेतलेले रबी पिकेही जमीनदोस्त होत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या वाट्याला काहीही उरले नाही. शेतकर्‍यांना निसर्गही साथ देत नसून शासनही शेतकर्‍यांना वेळोवेळी मदत करीत नाही. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांनी कुणाकडून दाद मागावी अशा प्रश्न शेतकर्‍यांसमोर पुढे ठाकला आहे. यावर्षी उन्हाळ्यात निसर्ग रबी पिकासाठी उपयुक्त नसून सुरुवातीच्या काळात अकाली पावसाने दमदार हजेरी लावून पूर्णत: तालुक्यास झोडपून काढले. त्यामध्ये शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. रबी पिकासाठी पेरलेले बियाणे पूर्णपणे उगलेच नाही. तर काही पाण्याने हिरावून घेतले. अशाप्रकारे कठीण समस्या येऊनही शेतकर्‍याने शेतीविषयी आस सोडली नाही. तो पुन्हा या भिषण गर्मीच्या चटक्यात शेतात घाम गाळीत आहे. येत्या खरीप हंगामात चांगले पीक हाती लागेल या उद्देशाने शेतकरी शेत कामासाठी लागणारे विविध प्रकारचे औजारे यांची विधीवत पूजा-अर्चना करुन खरीप हंगामासाठी शेतीच्या पूर्ण मशागतीच्या कामाला लागला आहे. सकाळी ६ वाजतापासून आपल्या घराबाहेर पडलेला हा शेतकरी सायंकाळी ६ वाजतापर्यंंत घरी परत येत नाही. पूर्ण दिवसभर उन्हात भिषण गर्मीचे चटके झेलत शेतीच्या पूर्व मशागतीत मग्न दिसून येत आहे. यंदातरी बर्‍यापैकी उत्पन्न होवून कर्जापासून मुक्तता मिळेल, याच आशेत शेतकरी आहे.  (वार्ताहर)