शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

स्वच्छ भारत मिशनला अखेरची घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 22:25 IST

जिल्हा प्रशासनातर्फे शंभर टक्के शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे.

ठळक मुद्देशौचालयाच्या अनुदानासाठी लाभार्थ्यांची पायपीट : पंचायत समितीच्या अधिकाºयांचे दुर्लक्ष

दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : जिल्हा प्रशासनातर्फे शंभर टक्के शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. तर दुसरीकडे मात्र या योनजनेतंर्गत शौचालयांचे बांधकाम करणाºया लाभार्थ्यांना अनुदानासाठी शासकीय कार्यालयाची पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे तालुक्यात स्वच्छ भारत मिशनला अखेरची घरघर लागल्याचे चित्र आहे.प्राप्त माहितीनुसार गोरेगाव तालुक्यात महाराष्टÑ रोजगार हमी योजनेतून ग्रामपंचायत अधिनस्थ ३ हजार २७१ शौचालय २०१६-१७ या कालावधीत मंजूर झाले. यापैकी १ हजार ७७२ शौचालयाचे बांधकाम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र आत्तापर्यंय यापैकी केवळ १८९ शौचालयाचेच अनुदान ग्रामपंचायत खात्यात वळते करण्यात आले. तर उर्वरित ८५९ शौचालयाचे अनुदान अद्यापही पंचायत समितीच्या बँक खात्यात वळते करण्यात आले नाही. त्यामुळे लाभार्थी मात्र पंचायत समितीचे उंबरठे झिजवित असल्याचे चित्र आहे.शेतीची आणि महत्त्वाची कामे सोडून लाभार्थ्याना अनुदानासाठी वांरवार तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत आहे. मात्र त्यानंतरही कामे होत नसल्याने शौचालयाचे बांधकाम नसते केले तर बरे झाले असते, अशी भावना त्यांच्यात निर्माण होत असल्याचे चित्र आहे.तालुक्यातील आसलपानी २९, आंबेतलाव ३२, बबई ८४, बघोली १७, बाम्हणी ५१, बोरगाव १४४, बोटे ३, चिचगाव ६४, चिल्हाटी २३, चोपा ५९, दवडीपार ३६, डव्वा ८, गणखैरा १५, घोटी ३५, घुमर्रा ५८, गोंदेखारी ६७, हिराटोला ९९, हिरडामाली ४१, हौसीटोला २७, झांजीया ११०, कालीमाटी ८९, कलपाथरी १४, कटंगी १०, कवलेवाडा ८, मलपूरी ४४, मसगाव ४७, मोहाडी ३३, मोहगाव (बु.) १०, मुंडीपार २५, निंबा ३९, पालेवाडा ३९, पुरगाव ८६, सटवा ४५, शहारवानी ६४, सिलेगाव ३३, सोनेगाव १, सोनी ४३, तेढा ५८, तेलनखेडी ११, तुमखेडा १४, तुमसर १३ एवढे शौचालयाचे काम सुरु असून यातील १८९ शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले.या शौचालयाचे अनुदान ग्रामपंचायतीला प्राप्त झाले असले तरी अनुदानासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. शासनाने स्वच्छ भारत मिशन यशस्वी करण्यासाठी बºयाच योजना राबविल्या मात्र स्वच्छ भारत मिशन अभियान मात्र कागदावरच पहायला मिळत चित्र आहे.गुडमॉर्निंग पथके नावापुरतीचतालुक्यातील सर्वच गावांमध्ये गुडमॉर्निग पथके तयार करण्यात आली आहेत. पण यातील बहुतांश पथके कागदावरच आहेत. त्यामुळे गावा-गावात गुडमार्निग पथकाची दहशत दिसून येत नाही. तर दुसरीकडे मात्र प्रशासनाकडून या अभियानाचा मोठा गाजावाजा करुन स्वत:ची पाट थोपटून घेतली जात आहे.