शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

लाखोंची वसुली, मात्र क्षेत्रफळाबाबत अनभिज्ञ

By admin | Updated: September 25, 2015 02:23 IST

जिल्ह्यात विविध ठिकाणी आठवडी बाजाराचे विस्तीर्ण क्षेत्र आहे. जिल्हा परिषद दरवर्षी त्या क्षेत्राच्या लिलावाच्या माध्यमातून लाखोंची कमाई करते,

पंचायत विभागाचा कारभार : बाजाराच्या जमिनीवर धनदाडंग्यांचे अतिक्रमणअर्जुनी-मोरगाव : जिल्ह्यात विविध ठिकाणी आठवडी बाजाराचे विस्तीर्ण क्षेत्र आहे. जिल्हा परिषद दरवर्षी त्या क्षेत्राच्या लिलावाच्या माध्यमातून लाखोंची कमाई करते, मात्र आठवडी बाजाराची गावनिहाय नेमकी मालकीची किती जागा आहे यापासून जि.प.चे अधिकारी अनभिज्ञ आहेत. बाजाराच्या कोट्यवधीच्या या जमिनींवर धनदांडग्यांनी अतिक्रमण करुन त्या जमिनी बळकावल्या आहेत. याचा बाजारावर विपरीत परिणाम होत असून आठवडी बाजार गावागावातील रहदारीच्या रस्त्यावर भरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरकर यांनी घेतलेल्या माहितीच्या अधिकारातून हे वास्तव उघड झाले आहे. गोंदिया जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी जिल्ह्यातील २९ बैठकी, ३ गुरांच्या व ३ यात्रा बाजारांचा लिलाव होतो. यात गोंदिया तालुक्यातील मुरदाडा, कामठा, अदासी, रावणवाडी, दासगाव-बु. पांढराबोडी व काटी, तिरोडा तालुक्यातील आमगाव व टेरी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील अर्जुनी-मोर व नवेगावबांध, सालेकस तालुक्यातील कोटजांभोरा, आमगाव खुर्द, जमाकुडो, पाथरी, व साकरीटोला, सडक-अर्जुनी तालुक्यातील सडक-अर्जुनी, सौंदड व पांढरी, गोरेगाव तालुक्यातील गोरेगाव, कुऱ्हाडी व चोपा तर देवरी तालुक्यातील सावली-डो, चिचगड व ककोडी येथील बैठकी बाजारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सडक-अर्जुनी, पांढरी व सावली-डो येथे गुरांचा तर तिरोडा तालुक्याच्या सुकडी-डाकराम, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड व गोरेगाव तालुक्यातील पोंगेझरा येथे यात्रा बाजार भरतो. आठवडी बाजारातून जिल्हा परिषदेला भरपूर उत्पन्न मिळत असले तरी याबाबत जिल्हा परिषद मात्र गंभीर नाही. काही गावांमध्ये जिल्हा परिषद व काही ठिकाणी ग्रामपंचायत आपापल्या स्तरावर बाजारांचे लिलाव करते. या बाजाराच्या जागेवर स्थानिक धनदाडंग्यांनी अतिक्रमण केले आहे. बाजारात व्यापारी जिथे जागा मिळेल तिथे आपली दुकानदारी थाटतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. अनेक मोठ्या गावांमध्ये तर मुख्य रहदारीचे रस्तेच बंद झाले आहेत. यामुळे आता बाजाराच्या जागा स्थालांतरीत करणे आवश्यक झाले आहे. जिल्हा परिषदेच्या या कानाडोळा प्रवृत्तीमुळे दरवर्षी मिळणारा लाखो रुपयांचा महसूल बुडण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या बाजाराच्या जागेवर अतिक्रमण वाढत असले तरी जि.प. ची मालमत्ता असल्याने स्थानिक ग्रामपंचायती अशा अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करतात. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये हिच बोंब आहे. आठवडी बाजाराच्या या जागा मोक्याच्या ठिकाणी असल्याने त्यांचे बाजारमूल्य कोट्यवधीच्या घरात आहे. (तालुका प्रतिनिधी)