शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

मंजूर लाखोंचा निधी परत

By admin | Updated: September 8, 2016 00:29 IST

शासनामार्फत आदिवासींच्या कल्याणाकरिता राबविण्यात येणाऱ्या केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्यूक्लिअस बजेट योजना)

आदिवासी कल्याण : गरजूंना लाभापासून वंचित ठेवल्याचा आरोपदेवरी : शासनामार्फत आदिवासींच्या कल्याणाकरिता राबविण्यात येणाऱ्या केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्यूक्लिअस बजेट योजना) योजनेतील तरतुदीनुसार मिळालेला निधी देवरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत पाहीजे त्या प्रमाणात खर्च करण्यात आला नाही. त्यामुळे लाखो रुपयांचा निधी परत गेला. यामुळे गरजू लाभार्थी लाभापासून वंचित राहिल्याचा आरोप, काँग्रेसच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनातून केला आहेया प्रकरणाची शासनस्तरावर योग्य चौकशी करण्यात यावी व यात दोषी असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या आशयाचे निवेदन मंगळवारी मुख्यमंत्री व आदिवासी विकासमंत्री यांच्या नावे देवरीचे उपविभागीय अधिकारी यांचे प्रतिनिधी नायब तहसीदलार आर.एस. पटले यांना जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांच्या नेतृत्वात देवरी तालुका काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने दिले.निवेदनानुसार, महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी आदिवासींचा विकास व कल्याणाच्या दृष्टीकोणातून ज्या योजनांचा समावेश अर्थ संकल्पात नाही, अशा अभिनव स्वरुपाच्या स्थानिक व महत्वाच्या योजना तांत्रिक औपचारीकतेमुळे दीर्घ कालावधीकरिता अडकून न पडता त्या स्थानिक पातळीवर तातडीने व प्रभावीपणे कार्यान्वित कराव्या. त्यांच्या लाभ गरजू आदिवासींना प्रत्यक्ष मिळवून देण्याकरिता शासनातर्फे केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्यूक्लिअर बजेट योजना) योजना राबविण्यात येते. यात मिळालेल्या निधीतून प्रामुख्याने आदिवासी व्यक्ती, कुटुंब यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे जीवनमाान वाढविण्याच्या दृष्टीकोनातून ही योजना राज्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांमार्फत राबविले जाते. यात उत्पन्न निर्मितीच्या किंवा वाढीच्या योजना, प्रशिक्षणाची योजना आणि मानवी साधन संपत्तीच्या विकासाच्या योजनांचा समावेश आहे. ही योजना राबविण्याकरिता देवरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाला सन २०१५-१६ या वित्तीय वर्षात ८४.६९ लाख रुपयांची तरतूद शासनातर्फे करण्यात आली होती. परंतु सदर योजनेची अंमलबजावणी योग्यरित्या न झाल्याने ३१ मार्च २०१६ अखेर या प्राप्त निधीतून फक्त १०.९६ लाख रुपये खर्च करण्यात आले. आदिवासी लोकांकरिता विविध योजनेच्या वाटपाच्या नियोजनाअभावी शेवटी ७३.७३ लाखांचा निधी शासनाला परत करण्यात आला. याला जबाबदार अधिकारी आणि सत्तेतील आदिवासींच्या आरक्षणावर निवडून येणारे बेजबाबदार लोकप्रतिनिधीच आहेत. आमगाव-देवरी विधानसभा व लोकसभा क्षेत्र आदिवासीकरिता राखीव ठेवण्यामागे शासनाचा उद्देश असा आहे की, या क्षेत्रातून निवडून येणारे लोकप्रतिनिधी हे आदिवासींचे जीवनमान उंचावण्यात आपले अमूल्य हातभार लावून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा आहे. परंतु संबंधित या क्षेत्रातील लोकप्रतिनिधींचे आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर वचक नाही. सदर कल्याणाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याची तयारी नाही म्हणून आदिवासींच्या कल्याणाकरिता मंजूर निधीच्या नियोजनाअभावी शासनाला परत जाते, याला काय म्हणावे? हेच काय शासनाचे ‘अच्छे दिन’ असा प्रश्न या निवेदनातून उपस्थित करुन या प्रकरणाची शासन स्तरावर चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.शिष्टमंडळात सहषराम कोरोटे, जि.प. सदस्य माधुरी कुंभरे, देवरी नगर पंचायतचे उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष चैनसिंग मडावी, माजी पं.स. सदस्य सोनू नेताम, माजी सरपंच धनपत भोयर, काँग्रेसचे वरिष्ठ कार्यकर्ता बळीराम कोटवार, गणेश भेलावे, सुदाम पुराम, मोहन कुंभरे, टी.डी. वाघमारे, आकेश उईके, इकबाल शेख, रामराज उपाध्याय, सखाराम कोरोटी आणि ओमराज बहेकार आदींचा समावेश आहे. जर १५ दिवसांत या प्रकरणाची चौकशी करुन आदिवासी लोकांना न्याय न मिळाल्यास काँग्रेस पक्षातर्फे या मागणीला धरुन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला. (प्रतिनिधी)