शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

वणवा रोखणाऱ्या यंत्रणेचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 23:52 IST

मागील वर्षी जिल्ह्यातील जंगलामध्ये आग लागल्याच्या २१९ घटना घडल्या. मात्र यानंतरही वन विभाग व शासनाने यापासून कसलाच धडा घेतलेला नाही.

ठळक मुद्देवन विभाग निधीच्या प्रतीक्षेत : वर्षभरात आगीच्या २१९ घटना

ऑनलाईन लोकमतगोंदिया : मागील वर्षी जिल्ह्यातील जंगलामध्ये आग लागल्याच्या २१९ घटना घडल्या. मात्र यानंतरही वन विभाग व शासनाने यापासून कसलाच धडा घेतलेला नाही. जंगलातील आगीच्या घटनांना प्रतिबंध लावण्यासाठी ‘फायर ब्लोअर’ची खरेदी करण्यासाठी या विभागाकडे निधीच उपलब्ध नसल्याची बाब उघडकीस आली आहे.दरवर्षी उन्हाळ्यात जंगलात आग (वनवा) लागण्याच्या घटना घडतात. मार्च महिन्यानंतर उन्हाळा तीव्र होत असल्याने जंगलात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे बोलल्या जाते.गोंदिया जिल्ह्यातील काही भागात तेंदूपत्ता तोडणी मोठ्या प्रमाणात केली जाते. यातून वनविभागाला कोट्यवधी रूपयांचा महसूल मिळतो. त्यामुळे मागील काही वर्षांपासून जंगलात आग लागल्यास यासाठी तेंदूपत्ता कंत्राटदारांना जबाबदार ठरविले जात होते. तेव्हा तेंदूपत्ता कंत्राटदारानी तेंदूपत्ता लिलावावर बष्हिकार टाकला होता. त्यामुळे वनविभागाला आपला निर्णय मागे घ्यावा लागला. जंगलात आग लावल्यानंतर तेंदूपत्ता अधिक प्रमाणात येत असल्याचे बोलल्या जाते. कुठल्याही कारणामुळे आग लावली जात असली तरी यात वनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मागील वर्षी जिल्ह्यातील जंगलामध्ये आग लागल्याच्या २१९ घडल्या. त्याचा फटका ३५७.२८१ हेक्टरमधील वनसंपदेला बसल्याची नोंद वनविभागाच्या रेकार्डवर आहे. गोंदिया तालुक्यातील जंगलात २१, तिरोडा २१, गोरेगाव २, आमगाव ३, सालेकसा ११, उत्तर देवरी १४, दक्षिण देवरी २३, चिचगढ २६, सडक अर्जुनी १०, नवेगावबांध ३९, गोठणगाव २५ व अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रात २४ घटना घडल्या.जंगलातील आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी २५४ फायर ब्लोअर वनविभागाकडे आहे. मात्र जिल्ह्यातील एकूण वन क्षेत्र आणि आगीच्या घटना पाहता अजून ९० फायर ब्लोअर खरेदीचा प्रस्ताव वन विभागाने शासनाकडे पाठविला होता. मात्र निधी उपलब्ध न झाल्याने हा प्रस्ताव तसाच थंडबस्त्यात आहे. जंगलातील वनवे रोखण्यासाठी जाड रेषा तयार करण्यात आली आहे. यासाठी काही प्रमाणात बाहेरील मजुरांची मदत घेतली जाते. जाड रेषेमुळे झाडाची वाळलेली पाने झाडांपासून दूर ठेवण्यास मदत होत असते. मात्र फायर ब्लोअर असल्यास आगीच्या घटनावर वेळीच नियंत्रण मिळविण्यास मदत होते. मात्र शासनाकडून वन विभागाला निधी उपलब्ध होत नसल्याने फायर ब्लोअर खरेदी रखडली आहे.