शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या संकल्पनांचा विरोधकांकडे अभाव

By admin | Updated: October 5, 2014 23:08 IST

आम्ही सामान्यजणांच्या अडचणी समजून त्या दूर करण्याचा प्रयत्न केला. तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न असो किंवा पुरामुळे खालच्या पुलांना उंच करण्याची बाब असो, ते सर्व प्रश्न आम्ही सोडविण्याचा प्रयत्न केला.

गोंदिया : आम्ही सामान्यजणांच्या अडचणी समजून त्या दूर करण्याचा प्रयत्न केला. तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न असो किंवा पुरामुळे खालच्या पुलांना उंच करण्याची बाब असो, ते सर्व प्रश्न आम्ही सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधी विचारतात की रस्ते बनविल्याने विकास होतो काय? सिंचन योजना पूर्ण न होण्याचा आरोप ते करतात. तर काय एकाच रात्रीत मोठमोठे सिंचन प्रकल्प पूर्णत्वास जातात काय? विरोधकांंकडे विकासाची कसलीही संकल्पना नाही, असे प्रतिपादन आ. गोपालदास अग्रवाल यांनी करून विरोधी पक्षांचा चांगलाच समाचार घेतला. गोंदिया विधानसभा क्षेत्रातील लोधीटोला (सावरी), गर्रा खुर्द, गर्रा बु., रावणवाडी, गोंडीटोला, मुरपार, सिरपूर, सिरपूरटोला, मोगर्रा, चारगाव, अर्जुनी येथे निवडणुकीच्या प्रचारासाठी पदयात्रा काढून जनसंपर्क अभियान राबविण्यात आले. घरोघरी जावून नागरिकांच्या भेटी घेण्यात आल्या. यावेळी अग्रवाल यांनी आपले मत व्यक्त केले. ते विरोधी पक्षांवर आगपाखड करताना पुढे म्हणाले की, सध्याचे भाजपचे उमेदवार हे गोरेगाव तालुक्यातील मोहाडी जि.प. क्षेत्राचे सदस्य आहेत. या क्षेत्रात कटंगी सिंचन प्रकल्पाचे बांधकाम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. तेथील पुनर्वसनाची समस्या प्रलंबित आहे. त्यांनी आपल्या क्षेत्रातील नागरिकांसाठी काय केले व काय करणार गोंदियाच्या जनतेसाठी? त्यांना केवळ आरोप करणेच जमते. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपचे काम केवळ आरोप लावणे व अफवा पसरविणे, एवढेच आहे. ते प्रत्यक्षपणे कसलेही जनहिताचे काम करीत नाही. सन १९९५ ते १९९९ पर्यंत राज्यात भाजप-शिवसेनचे शासन होते. त्यावेळी गोंदिया तालुक्यात काहीतरी चांगले कार्य झाले असेल तर सांगावे. भाजप-शिवसेनेने या तालुक्यात एकही जनहिताचे काम केले नाही. माझ्यावर टिकाटिप्पनी न करता त्यांनी एवढेच सांगावे की, ते गोंदिया कोणते विकासाचे कार्यक्रम राबविणार आहेत? गोंदियाच्या विकासासाठी त्यांचे काय नियोजन आहे? नेत्यांच्या नावावर एकदा भाजपने विजय मिळविले. मात्र नेहमीच हे शक्य नाही. विरोधकांना आपली योग्यता दाखवावी लागेल. जनता यांना योग्यप्रकारे ओळखते. केंद्रासाठी खासदार निवडीचे मुद्दे वेगळे आहेत. परंतु आमदाराची निवड सामान्य माणसाचीच करावी लागेल. जो आमच्यामधील नसून ५० किमी दूरवरील गोरेगाव तालुक्याचा आहे, त्याची निवड कशी करणार? आमदार हा सामान्य माणसाजवळील असावा आणि हे संबंध मी प्रामाणितेने निभवले आहे. या क्षेत्राच्या विकासाला गती देण्यासाठी आपली जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की, मी आपल्या मतदानाच्या योग्य आहे, असे अग्रवाल म्हणाले. यानंतर माजी जि.प . सदस्य ओमप्रकाश भक्तवर्ती यांनी भारतीय जनता पक्षाचा चांगलाच समाचार घेवून पंजा चिन्हाची बटन दाबून गोपालदास अग्रवाल यांना विजयी करण्याचे आवाहन केले. जिल्हा काँग्रेस सचिव गेंदलाल शरणागत यांनी, गोंदिया तालुक्यात एक लाख २५ हजार पेक्षा अधिक गरजूंना लाभदायी योजनांचा लाभ आ. गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे मिळाल्याचे सांगितले. याप्रसंगी प्रामुख्याने तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश रहमतकर, पं.स. सभापती सरिता अंबुले, उपसभापती चमन बिसेन, माजी उपसभापती मनिष मेश्राम, सावरीचे सरपंच चिखलोंडे, माजी सरपंच टेकचंद सिहारे, राधेश्याम गजभिये, जयपाल नाईक, झनक पटले, गमचंद तुरकर, गर्राचे माजी सरपंच मनोज बोरकर, रावणवाडीचे सरपंच कुंजाम, राजेंद्र कटरे, चरण टेंभरे, हरिविठ्ठल ठाकरे, सदाराम येरणे, रघू येरणे, प्रदीप घोडेस्वार, सिरपूरचे सरपंच येरणे, मोगर्राचे सरपंच नागपुरे, चारगावचे सरपंच राधेलाल पटले, राजेश माने, आशिष चव्हाण, वडेगावचे सरपंच देशकर, जे.सी. तुरकर, बकाराम रहांगडाले, अर्जुनीचे उपसरपंच सूर्यप्रकाश भगत आदी उपस्थित होते.