शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
3
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
4
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
5
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
6
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
7
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
8
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
9
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
10
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
11
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
12
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
13
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
14
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
15
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
16
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
17
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
18
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
19
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
20
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?

विकासाच्या संकल्पनांचा विरोधकांकडे अभाव

By admin | Updated: October 5, 2014 23:08 IST

आम्ही सामान्यजणांच्या अडचणी समजून त्या दूर करण्याचा प्रयत्न केला. तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न असो किंवा पुरामुळे खालच्या पुलांना उंच करण्याची बाब असो, ते सर्व प्रश्न आम्ही सोडविण्याचा प्रयत्न केला.

गोंदिया : आम्ही सामान्यजणांच्या अडचणी समजून त्या दूर करण्याचा प्रयत्न केला. तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न असो किंवा पुरामुळे खालच्या पुलांना उंच करण्याची बाब असो, ते सर्व प्रश्न आम्ही सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधी विचारतात की रस्ते बनविल्याने विकास होतो काय? सिंचन योजना पूर्ण न होण्याचा आरोप ते करतात. तर काय एकाच रात्रीत मोठमोठे सिंचन प्रकल्प पूर्णत्वास जातात काय? विरोधकांंकडे विकासाची कसलीही संकल्पना नाही, असे प्रतिपादन आ. गोपालदास अग्रवाल यांनी करून विरोधी पक्षांचा चांगलाच समाचार घेतला. गोंदिया विधानसभा क्षेत्रातील लोधीटोला (सावरी), गर्रा खुर्द, गर्रा बु., रावणवाडी, गोंडीटोला, मुरपार, सिरपूर, सिरपूरटोला, मोगर्रा, चारगाव, अर्जुनी येथे निवडणुकीच्या प्रचारासाठी पदयात्रा काढून जनसंपर्क अभियान राबविण्यात आले. घरोघरी जावून नागरिकांच्या भेटी घेण्यात आल्या. यावेळी अग्रवाल यांनी आपले मत व्यक्त केले. ते विरोधी पक्षांवर आगपाखड करताना पुढे म्हणाले की, सध्याचे भाजपचे उमेदवार हे गोरेगाव तालुक्यातील मोहाडी जि.प. क्षेत्राचे सदस्य आहेत. या क्षेत्रात कटंगी सिंचन प्रकल्पाचे बांधकाम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. तेथील पुनर्वसनाची समस्या प्रलंबित आहे. त्यांनी आपल्या क्षेत्रातील नागरिकांसाठी काय केले व काय करणार गोंदियाच्या जनतेसाठी? त्यांना केवळ आरोप करणेच जमते. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपचे काम केवळ आरोप लावणे व अफवा पसरविणे, एवढेच आहे. ते प्रत्यक्षपणे कसलेही जनहिताचे काम करीत नाही. सन १९९५ ते १९९९ पर्यंत राज्यात भाजप-शिवसेनचे शासन होते. त्यावेळी गोंदिया तालुक्यात काहीतरी चांगले कार्य झाले असेल तर सांगावे. भाजप-शिवसेनेने या तालुक्यात एकही जनहिताचे काम केले नाही. माझ्यावर टिकाटिप्पनी न करता त्यांनी एवढेच सांगावे की, ते गोंदिया कोणते विकासाचे कार्यक्रम राबविणार आहेत? गोंदियाच्या विकासासाठी त्यांचे काय नियोजन आहे? नेत्यांच्या नावावर एकदा भाजपने विजय मिळविले. मात्र नेहमीच हे शक्य नाही. विरोधकांना आपली योग्यता दाखवावी लागेल. जनता यांना योग्यप्रकारे ओळखते. केंद्रासाठी खासदार निवडीचे मुद्दे वेगळे आहेत. परंतु आमदाराची निवड सामान्य माणसाचीच करावी लागेल. जो आमच्यामधील नसून ५० किमी दूरवरील गोरेगाव तालुक्याचा आहे, त्याची निवड कशी करणार? आमदार हा सामान्य माणसाजवळील असावा आणि हे संबंध मी प्रामाणितेने निभवले आहे. या क्षेत्राच्या विकासाला गती देण्यासाठी आपली जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की, मी आपल्या मतदानाच्या योग्य आहे, असे अग्रवाल म्हणाले. यानंतर माजी जि.प . सदस्य ओमप्रकाश भक्तवर्ती यांनी भारतीय जनता पक्षाचा चांगलाच समाचार घेवून पंजा चिन्हाची बटन दाबून गोपालदास अग्रवाल यांना विजयी करण्याचे आवाहन केले. जिल्हा काँग्रेस सचिव गेंदलाल शरणागत यांनी, गोंदिया तालुक्यात एक लाख २५ हजार पेक्षा अधिक गरजूंना लाभदायी योजनांचा लाभ आ. गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे मिळाल्याचे सांगितले. याप्रसंगी प्रामुख्याने तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश रहमतकर, पं.स. सभापती सरिता अंबुले, उपसभापती चमन बिसेन, माजी उपसभापती मनिष मेश्राम, सावरीचे सरपंच चिखलोंडे, माजी सरपंच टेकचंद सिहारे, राधेश्याम गजभिये, जयपाल नाईक, झनक पटले, गमचंद तुरकर, गर्राचे माजी सरपंच मनोज बोरकर, रावणवाडीचे सरपंच कुंजाम, राजेंद्र कटरे, चरण टेंभरे, हरिविठ्ठल ठाकरे, सदाराम येरणे, रघू येरणे, प्रदीप घोडेस्वार, सिरपूरचे सरपंच येरणे, मोगर्राचे सरपंच नागपुरे, चारगावचे सरपंच राधेलाल पटले, राजेश माने, आशिष चव्हाण, वडेगावचे सरपंच देशकर, जे.सी. तुरकर, बकाराम रहांगडाले, अर्जुनीचे उपसरपंच सूर्यप्रकाश भगत आदी उपस्थित होते.