शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ढिसाळ नियोजनाने लाखो लीटर पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:36 IST

एकीकडे जिल्ह्यातील जनता पाणी टंचाईच्या समस्येने चिंताग्रस्त असताना दुसरीकडे मात्र प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. आसोली आणि आंभोऱ्याजवळ गुरूवारी (दि.१२) कालवा फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला शिवाय पाणी टंचाईच्या समस्येत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देदोन ठिकाणी फुटला कालवा : दुरूस्तीचे काम सुरू, पाणी टंचाईची समस्या गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एकीकडे जिल्ह्यातील जनता पाणी टंचाईच्या समस्येने चिंताग्रस्त असताना दुसरीकडे मात्र प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. आसोली आणि आंभोऱ्याजवळ गुरूवारी (दि.१२) कालवा फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला शिवाय पाणी टंचाईच्या समस्येत वाढ झाली आहे.गोंदिया शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्याचा निर्णय १० एप्रिलला घेतला. त्यानंतर ११ एप्रिलला पुजारीटोलाचे पाणी सोडण्यात आले. हे पाणी कालव्याव्दारे डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविले जाणार आहे. यामुळे शहराला नियमित पाणी पुरवठा करणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला शक्य होणार आहे. मात्र पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग आणि सिंचन विभाग यांच्यात योग्य समन्वय केले नाही. कालव्यात पाणी सोडण्यापूवी कालव्यांची स्थिती योग्य आहे का? याची चाचपणी सिंचन विभागाने केली नाही. दरम्यान पुजारीटोला धरणातून २५० क्यूसेक पाणी सोडल्यानंतर हे पाणी सालेकसा तालुक्यातील आंभोºयाजवळ पोहचले तर यापासूनच काही अंतरावर असलेल्या आसोलीजवळ पाणी पोहचल्यानंतर कालव्याला मोठे भगदाड पडले. त्यामुळे लाखो लीटर पाणी शेतांमध्ये वाहून गेले. परिणामी डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत गुरूवारी (दि.१२) पाणीच पोहचले नाही. त्यामुळे गोंदिया शहराच्या पाणी टंचाईच्या समस्येत आणखी भर पडली. प्रकल्पाचे पाणी सोडण्यापूर्वी या विभागाने योग्य नियोजन केले असते तर लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला नसता असे बोलले जात आहे. आंभोरा आणि आसोलीजवळ कालव्याला मोठे भगदाड पडले असून त्याची दुरूस्ती करण्यासाठी किमान तीन चार दिवसांचा कालावधी लागू शकतो. मात्र सिंचन विभागाचे अधिकारी शुक्रवारी (दि.१३) सायंकाळपर्यंत दुरूस्तीचे काम पूर्ण होण्याचा दावा करित आहे. मात्र यासर्व प्रकारामुळे पुन्हा एकदा या तिन्ही विभागाच्या ढिसाळ नियोजनाची पोलखोल झाली आहे.चूक प्रशासनाची फटका शहरवासीयांनापुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी प्रशासनाने योग्य नियोजन केल्याने शहरावरील पाणी टंचाईच्या संकटात अधिक वाढ झाली आहे. मागील महिनाभरापासून शहरात अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने पाण्यासाठी शहरवासीयांची भटकंती सुरू आहे. त्यातच कालवा फुटल्यामुळे डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पाणी पोहचण्यास विलंब होणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला अजून काही दिवस तोंड द्यावे लागणार आहे.अतिआत्मविश्वास नडलादोन महिन्यापूर्वीच भूजल सर्वेक्षण विभागाने संभाव्य पाणी टंचाईची शक्यता वर्तविली होती. त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला दिला होता. तेव्हाच प्रशासन उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र जेव्हा पाणी टंचाईची समस्या गंभीर होईल तेव्हाच उपाय योजना करु असा आत्मविश्वास जिल्हा प्रशासन आणि मजीप्राच्या अधिकाºयांनी बाळगला. त्यामुळे शहरवासीयांना आता पाणी टंचाईच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे.