शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

ढिसाळ नियोजनाने लाखो लीटर पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:36 IST

एकीकडे जिल्ह्यातील जनता पाणी टंचाईच्या समस्येने चिंताग्रस्त असताना दुसरीकडे मात्र प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. आसोली आणि आंभोऱ्याजवळ गुरूवारी (दि.१२) कालवा फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला शिवाय पाणी टंचाईच्या समस्येत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देदोन ठिकाणी फुटला कालवा : दुरूस्तीचे काम सुरू, पाणी टंचाईची समस्या गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एकीकडे जिल्ह्यातील जनता पाणी टंचाईच्या समस्येने चिंताग्रस्त असताना दुसरीकडे मात्र प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. आसोली आणि आंभोऱ्याजवळ गुरूवारी (दि.१२) कालवा फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला शिवाय पाणी टंचाईच्या समस्येत वाढ झाली आहे.गोंदिया शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्याचा निर्णय १० एप्रिलला घेतला. त्यानंतर ११ एप्रिलला पुजारीटोलाचे पाणी सोडण्यात आले. हे पाणी कालव्याव्दारे डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविले जाणार आहे. यामुळे शहराला नियमित पाणी पुरवठा करणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला शक्य होणार आहे. मात्र पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग आणि सिंचन विभाग यांच्यात योग्य समन्वय केले नाही. कालव्यात पाणी सोडण्यापूवी कालव्यांची स्थिती योग्य आहे का? याची चाचपणी सिंचन विभागाने केली नाही. दरम्यान पुजारीटोला धरणातून २५० क्यूसेक पाणी सोडल्यानंतर हे पाणी सालेकसा तालुक्यातील आंभोºयाजवळ पोहचले तर यापासूनच काही अंतरावर असलेल्या आसोलीजवळ पाणी पोहचल्यानंतर कालव्याला मोठे भगदाड पडले. त्यामुळे लाखो लीटर पाणी शेतांमध्ये वाहून गेले. परिणामी डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत गुरूवारी (दि.१२) पाणीच पोहचले नाही. त्यामुळे गोंदिया शहराच्या पाणी टंचाईच्या समस्येत आणखी भर पडली. प्रकल्पाचे पाणी सोडण्यापूर्वी या विभागाने योग्य नियोजन केले असते तर लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला नसता असे बोलले जात आहे. आंभोरा आणि आसोलीजवळ कालव्याला मोठे भगदाड पडले असून त्याची दुरूस्ती करण्यासाठी किमान तीन चार दिवसांचा कालावधी लागू शकतो. मात्र सिंचन विभागाचे अधिकारी शुक्रवारी (दि.१३) सायंकाळपर्यंत दुरूस्तीचे काम पूर्ण होण्याचा दावा करित आहे. मात्र यासर्व प्रकारामुळे पुन्हा एकदा या तिन्ही विभागाच्या ढिसाळ नियोजनाची पोलखोल झाली आहे.चूक प्रशासनाची फटका शहरवासीयांनापुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी प्रशासनाने योग्य नियोजन केल्याने शहरावरील पाणी टंचाईच्या संकटात अधिक वाढ झाली आहे. मागील महिनाभरापासून शहरात अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने पाण्यासाठी शहरवासीयांची भटकंती सुरू आहे. त्यातच कालवा फुटल्यामुळे डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पाणी पोहचण्यास विलंब होणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला अजून काही दिवस तोंड द्यावे लागणार आहे.अतिआत्मविश्वास नडलादोन महिन्यापूर्वीच भूजल सर्वेक्षण विभागाने संभाव्य पाणी टंचाईची शक्यता वर्तविली होती. त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला दिला होता. तेव्हाच प्रशासन उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र जेव्हा पाणी टंचाईची समस्या गंभीर होईल तेव्हाच उपाय योजना करु असा आत्मविश्वास जिल्हा प्रशासन आणि मजीप्राच्या अधिकाºयांनी बाळगला. त्यामुळे शहरवासीयांना आता पाणी टंचाईच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे.