शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

ढिसाळ नियोजनाने लाखो लीटर पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:36 IST

एकीकडे जिल्ह्यातील जनता पाणी टंचाईच्या समस्येने चिंताग्रस्त असताना दुसरीकडे मात्र प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. आसोली आणि आंभोऱ्याजवळ गुरूवारी (दि.१२) कालवा फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला शिवाय पाणी टंचाईच्या समस्येत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देदोन ठिकाणी फुटला कालवा : दुरूस्तीचे काम सुरू, पाणी टंचाईची समस्या गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एकीकडे जिल्ह्यातील जनता पाणी टंचाईच्या समस्येने चिंताग्रस्त असताना दुसरीकडे मात्र प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. आसोली आणि आंभोऱ्याजवळ गुरूवारी (दि.१२) कालवा फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला शिवाय पाणी टंचाईच्या समस्येत वाढ झाली आहे.गोंदिया शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्याचा निर्णय १० एप्रिलला घेतला. त्यानंतर ११ एप्रिलला पुजारीटोलाचे पाणी सोडण्यात आले. हे पाणी कालव्याव्दारे डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविले जाणार आहे. यामुळे शहराला नियमित पाणी पुरवठा करणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला शक्य होणार आहे. मात्र पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग आणि सिंचन विभाग यांच्यात योग्य समन्वय केले नाही. कालव्यात पाणी सोडण्यापूवी कालव्यांची स्थिती योग्य आहे का? याची चाचपणी सिंचन विभागाने केली नाही. दरम्यान पुजारीटोला धरणातून २५० क्यूसेक पाणी सोडल्यानंतर हे पाणी सालेकसा तालुक्यातील आंभोºयाजवळ पोहचले तर यापासूनच काही अंतरावर असलेल्या आसोलीजवळ पाणी पोहचल्यानंतर कालव्याला मोठे भगदाड पडले. त्यामुळे लाखो लीटर पाणी शेतांमध्ये वाहून गेले. परिणामी डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत गुरूवारी (दि.१२) पाणीच पोहचले नाही. त्यामुळे गोंदिया शहराच्या पाणी टंचाईच्या समस्येत आणखी भर पडली. प्रकल्पाचे पाणी सोडण्यापूर्वी या विभागाने योग्य नियोजन केले असते तर लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला नसता असे बोलले जात आहे. आंभोरा आणि आसोलीजवळ कालव्याला मोठे भगदाड पडले असून त्याची दुरूस्ती करण्यासाठी किमान तीन चार दिवसांचा कालावधी लागू शकतो. मात्र सिंचन विभागाचे अधिकारी शुक्रवारी (दि.१३) सायंकाळपर्यंत दुरूस्तीचे काम पूर्ण होण्याचा दावा करित आहे. मात्र यासर्व प्रकारामुळे पुन्हा एकदा या तिन्ही विभागाच्या ढिसाळ नियोजनाची पोलखोल झाली आहे.चूक प्रशासनाची फटका शहरवासीयांनापुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी प्रशासनाने योग्य नियोजन केल्याने शहरावरील पाणी टंचाईच्या संकटात अधिक वाढ झाली आहे. मागील महिनाभरापासून शहरात अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने पाण्यासाठी शहरवासीयांची भटकंती सुरू आहे. त्यातच कालवा फुटल्यामुळे डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पाणी पोहचण्यास विलंब होणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला अजून काही दिवस तोंड द्यावे लागणार आहे.अतिआत्मविश्वास नडलादोन महिन्यापूर्वीच भूजल सर्वेक्षण विभागाने संभाव्य पाणी टंचाईची शक्यता वर्तविली होती. त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला दिला होता. तेव्हाच प्रशासन उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र जेव्हा पाणी टंचाईची समस्या गंभीर होईल तेव्हाच उपाय योजना करु असा आत्मविश्वास जिल्हा प्रशासन आणि मजीप्राच्या अधिकाºयांनी बाळगला. त्यामुळे शहरवासीयांना आता पाणी टंचाईच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे.