शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाच्या तडाख्यात लाखोंचे नुकसान

By admin | Updated: May 30, 2017 00:57 IST

जिल्ह्यात रविवार (दि.२८) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वादळी पाऊस आले. या वादळात अनेकांच्या घरांची छते उडून गेली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात रविवार (दि.२८) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वादळी पाऊस आले. या वादळात अनेकांच्या घरांची छते उडून गेली. अनेक ठिकाणी मोठे वृक्ष कोसळून वाहतूक प्रभावित झाली. धानपिकासह फळपिकांनाही फटका बसला. तर विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अनेक गावांतील नागरिकांना अख्खी रात्र अंधारातच काढावी लागली.पान टपरीवर पडले झाडगोंदिया : गोंदिया तालुक्यातील दासगाव बु. येथील रहिवासी पृथ्वीराज बर्वे यांच्या पानटपरीवर जवळपास ५ फुटाच्या अंतरावर असलेला लिंबाचा झाड अचानक पडले. झाड पडल्यामुळे पानटपरीचा संपूर्ण सामान नष्ट झाला. उर्वरित काही न वाचल्याचे टपरी मालकाचे मोठे नुकसान झाले. सोमवार (दि.२९) रोजी स्थानिक तलाठ्याने पंचनामा करुन ६५ हजार ५०० रुपयांचा नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे पाठविला. तसेच गोंदियाच्या सूर्याटोला येथील रहिवासी यशोदा यशवंत प्रधान यांच्या घरावरील छत वादळामुळे उडाले. आता त्या कुटुंबियांच्या डोक्यावर छत नाही. उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी सांगितले की, गोंदिया तालुक्यात ११४ घरे व जनावरांचे ११ गोठे बाधित झाले आहेत. हा प्राथमिक अहवाल असून अधिकृत अहवाल मिळाल्यानंतर या संख्येत वाढ होऊ शकते.दोन घरांचे छत उडालेसडक-अर्जुनी : तालुक्यातील पांढरी येथील दोन घरांचे छत वादळामुळे उडाले. रविवारी सायंकाळी वाऱ्यासोबत पाऊस आले. पावसाचा तडाखा कोकणा-जमी, चिखली, पांढरी, कोसमतोंडी, डव्वा, खजरी, वडेगाव या परिसरात जास्त बसला.गोरेगाव तालुक्यात १०.५८ लाखांचे नुकसानगोरेगाव : तालुक्यात रविवारी आलेल्या वादळी पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले. झाड पडून जनावरांचा मृत्यू तर घराची भिंत पडून नागरिकांवर जखमी होण्याची पाळी आली. यात पलखेडा येथे झाड पडून एका गाईचा मृत्यू झाला. तर कटंगी येथे भिंत पडून दोन इसम जखमी झाले. त्यांना गोंदिया येथे शासकीय रूग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. आंबेतलाव येथे १० घरे, गिधाडी येथे दोन घरे, तुमसर येथे एक घर, खोसेटोला येथे एक घर, हौसेटोला येथे एक घर, नवाटोला येथे एक घर, पलखेडा येथे एक घर, गणखैरा येथे दोन घरे, पिंडकेपार येथे सात घरे, तुमखेडा येथे नऊ घरे व दोन गोठे, बोटे येथे नऊ घरे, कटंगी येथे एक गोठा, गोरेगाव येथे दोन घरे व एक गोठा, चिचगाव येथे एक घर, चिचगावटोला येथे एक गोठा, गिरोला येथे एक गोठा शॉर्टसर्किटमुळे जळून खाक, बबई येथे दोन घरे, बाजारटोला येथे दोन घरे, मोहाडी येथे एक घर, मोहगाव येथे २० घरे, सर्वाटोला येथे सात घरे, धुंदाटोला येथे पाच घरे, दवडीपार येथे १५ घरे, शहारवाणी येथे सहा घरे, पिपरटोला-निंबा येथे एक घर व गोठा, हलबीटोला-निंबा येथे एक गोठा, तेढा येथे एक घर व निंबा येथे एक घर बाधित झाले. यात एकूण १०५ घरे व सात गोठ्यांची पडझड झाली असून एका गाईचा मृत्यू तर दोन इसम जखमी झाले आहेत. यात अंदाजे नुकसान १० लाख ५८ हजार ७०० रूपयांचा झाला आहे.वादळी वाऱ्यासह पर्जन्यवृष्टीअर्जुनी-मोरगाव : रविवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास वादळी वाऱ्याने थैमान घातले. आकाशात अचानक ढग दाटून आले. वाऱ्याची तीव्रता प्रचंड होती. सुमारे दीड तास वादळी वारा सुरुच होता. पावणे आठच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. फार काळ पाऊस झाला नसल्याने पिकांचे नुकसान टळले. धान कापणीचा हंगाम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांचे धान कापून शेतात ठेवले होते. मात्र पावसाचे प्रमाण कमी असल्याने नुकसान टळले. वादळी वाऱ्याच्या प्रचंड तीव्रतेमुळे आंबा गळून पडला. सायंकाळच्या सुमारास तयार झालेल्या हवामानामुळे उकाड्याने त्रास झालेल्यांना दिलासा मिळाला.वादळी वाऱ्याचा फटकासिरपूरबांध : रविवारी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्याने चांगलेच झोडपले. परिसरातील लोक या वादळाचा उग्ररुप पाहून दहशतीत आले होते. या वादळामध्ये झाडे खाली कोसळली. यामध्ये आंबा पिकाला मोठे नुकसान झाले आहे. परिसरात सध्या उन्हाळी धानपीक असून वादळी पावसाचा फटका त्या पिकाला बसला आहे. त्याचप्रमाणे घरांचे सुद्धा नुकसान झाले आहे. यात अनेकांचे छत उडाले तर गोठेसुद्धा बाधित झाले आहेत.वादळाने उडाले छत, झाड पडून रहदारी बाधिततिरोडा : रविवारी आलेल्या जोरदार वादळाने तुमसर-तिरोडा रस्त्यावर बाभळीचे झाड तिरोडा-बिर्सी फाटा या दरम्यान दोन ठिकाणी पडले. काही वेळ रहदारीस अडथडा निर्माण झाला. परंतु नागरिकांनी लवकरच रस्ता मोकळा केला. तालुक्यातील सेलोटपार येथील सेवकराम टेकेउके यांच्या घराचे छप्पर उडाले असून तलाठ्यांच्या रिपोर्टवरुन १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर सिल्ली येथील चांगो राजकुमार निलगाये व प्रविण राजकुमार निलगाये या दोन्ही भावांच्या घराचे छप्पर उडून १२ हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच मुरमाडी येथील चेतराम महादेव पारधी यांच्या घराचे छप्पर उडून आठ हजार रुपयांचे नुकसान झाले. असा एकूण तिरोडा तालुक्यात तीस हजार रुपयांचा नुकसान झाल्याचे तहसीलदार संजय रामटेके यांनी सांगितले. तालुक्यात जीवित हानी कुठेही झालेली नाही. मोठ्या प्रमाणात झाडे मात्र पडलीत. तसेच आंबा पिकाचे नुकसान झाले.