शहरं
Join us  
Trending Stories
1
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
2
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
3
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
4
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
5
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
6
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
7
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
8
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
9
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
10
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
11
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
12
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
13
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग
14
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
15
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
16
Rohit Pawar: समविचारी पक्ष सोबत आले तर ठिक, नाही तर...; रोहित पवार स्पष्टच बोलले
17
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
18
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
19
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  
20
४ ग्रह, ४ राजयोग: १० राशींवर लक्ष्मी प्रसन्न, भरघोस भरभराट; बक्कळ पैसा, बंपर लाभ, वरदान काळ!

वादळी पावसाच्या तडाख्यात लाखोंचे नुकसान

By admin | Updated: May 30, 2017 00:57 IST

जिल्ह्यात रविवार (दि.२८) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वादळी पाऊस आले. या वादळात अनेकांच्या घरांची छते उडून गेली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात रविवार (दि.२८) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वादळी पाऊस आले. या वादळात अनेकांच्या घरांची छते उडून गेली. अनेक ठिकाणी मोठे वृक्ष कोसळून वाहतूक प्रभावित झाली. धानपिकासह फळपिकांनाही फटका बसला. तर विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अनेक गावांतील नागरिकांना अख्खी रात्र अंधारातच काढावी लागली.पान टपरीवर पडले झाडगोंदिया : गोंदिया तालुक्यातील दासगाव बु. येथील रहिवासी पृथ्वीराज बर्वे यांच्या पानटपरीवर जवळपास ५ फुटाच्या अंतरावर असलेला लिंबाचा झाड अचानक पडले. झाड पडल्यामुळे पानटपरीचा संपूर्ण सामान नष्ट झाला. उर्वरित काही न वाचल्याचे टपरी मालकाचे मोठे नुकसान झाले. सोमवार (दि.२९) रोजी स्थानिक तलाठ्याने पंचनामा करुन ६५ हजार ५०० रुपयांचा नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे पाठविला. तसेच गोंदियाच्या सूर्याटोला येथील रहिवासी यशोदा यशवंत प्रधान यांच्या घरावरील छत वादळामुळे उडाले. आता त्या कुटुंबियांच्या डोक्यावर छत नाही. उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी सांगितले की, गोंदिया तालुक्यात ११४ घरे व जनावरांचे ११ गोठे बाधित झाले आहेत. हा प्राथमिक अहवाल असून अधिकृत अहवाल मिळाल्यानंतर या संख्येत वाढ होऊ शकते.दोन घरांचे छत उडालेसडक-अर्जुनी : तालुक्यातील पांढरी येथील दोन घरांचे छत वादळामुळे उडाले. रविवारी सायंकाळी वाऱ्यासोबत पाऊस आले. पावसाचा तडाखा कोकणा-जमी, चिखली, पांढरी, कोसमतोंडी, डव्वा, खजरी, वडेगाव या परिसरात जास्त बसला.गोरेगाव तालुक्यात १०.५८ लाखांचे नुकसानगोरेगाव : तालुक्यात रविवारी आलेल्या वादळी पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले. झाड पडून जनावरांचा मृत्यू तर घराची भिंत पडून नागरिकांवर जखमी होण्याची पाळी आली. यात पलखेडा येथे झाड पडून एका गाईचा मृत्यू झाला. तर कटंगी येथे भिंत पडून दोन इसम जखमी झाले. त्यांना गोंदिया येथे शासकीय रूग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. आंबेतलाव येथे १० घरे, गिधाडी येथे दोन घरे, तुमसर येथे एक घर, खोसेटोला येथे एक घर, हौसेटोला येथे एक घर, नवाटोला येथे एक घर, पलखेडा येथे एक घर, गणखैरा येथे दोन घरे, पिंडकेपार येथे सात घरे, तुमखेडा येथे नऊ घरे व दोन गोठे, बोटे येथे नऊ घरे, कटंगी येथे एक गोठा, गोरेगाव येथे दोन घरे व एक गोठा, चिचगाव येथे एक घर, चिचगावटोला येथे एक गोठा, गिरोला येथे एक गोठा शॉर्टसर्किटमुळे जळून खाक, बबई येथे दोन घरे, बाजारटोला येथे दोन घरे, मोहाडी येथे एक घर, मोहगाव येथे २० घरे, सर्वाटोला येथे सात घरे, धुंदाटोला येथे पाच घरे, दवडीपार येथे १५ घरे, शहारवाणी येथे सहा घरे, पिपरटोला-निंबा येथे एक घर व गोठा, हलबीटोला-निंबा येथे एक गोठा, तेढा येथे एक घर व निंबा येथे एक घर बाधित झाले. यात एकूण १०५ घरे व सात गोठ्यांची पडझड झाली असून एका गाईचा मृत्यू तर दोन इसम जखमी झाले आहेत. यात अंदाजे नुकसान १० लाख ५८ हजार ७०० रूपयांचा झाला आहे.वादळी वाऱ्यासह पर्जन्यवृष्टीअर्जुनी-मोरगाव : रविवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास वादळी वाऱ्याने थैमान घातले. आकाशात अचानक ढग दाटून आले. वाऱ्याची तीव्रता प्रचंड होती. सुमारे दीड तास वादळी वारा सुरुच होता. पावणे आठच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. फार काळ पाऊस झाला नसल्याने पिकांचे नुकसान टळले. धान कापणीचा हंगाम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांचे धान कापून शेतात ठेवले होते. मात्र पावसाचे प्रमाण कमी असल्याने नुकसान टळले. वादळी वाऱ्याच्या प्रचंड तीव्रतेमुळे आंबा गळून पडला. सायंकाळच्या सुमारास तयार झालेल्या हवामानामुळे उकाड्याने त्रास झालेल्यांना दिलासा मिळाला.वादळी वाऱ्याचा फटकासिरपूरबांध : रविवारी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्याने चांगलेच झोडपले. परिसरातील लोक या वादळाचा उग्ररुप पाहून दहशतीत आले होते. या वादळामध्ये झाडे खाली कोसळली. यामध्ये आंबा पिकाला मोठे नुकसान झाले आहे. परिसरात सध्या उन्हाळी धानपीक असून वादळी पावसाचा फटका त्या पिकाला बसला आहे. त्याचप्रमाणे घरांचे सुद्धा नुकसान झाले आहे. यात अनेकांचे छत उडाले तर गोठेसुद्धा बाधित झाले आहेत.वादळाने उडाले छत, झाड पडून रहदारी बाधिततिरोडा : रविवारी आलेल्या जोरदार वादळाने तुमसर-तिरोडा रस्त्यावर बाभळीचे झाड तिरोडा-बिर्सी फाटा या दरम्यान दोन ठिकाणी पडले. काही वेळ रहदारीस अडथडा निर्माण झाला. परंतु नागरिकांनी लवकरच रस्ता मोकळा केला. तालुक्यातील सेलोटपार येथील सेवकराम टेकेउके यांच्या घराचे छप्पर उडाले असून तलाठ्यांच्या रिपोर्टवरुन १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर सिल्ली येथील चांगो राजकुमार निलगाये व प्रविण राजकुमार निलगाये या दोन्ही भावांच्या घराचे छप्पर उडून १२ हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच मुरमाडी येथील चेतराम महादेव पारधी यांच्या घराचे छप्पर उडून आठ हजार रुपयांचे नुकसान झाले. असा एकूण तिरोडा तालुक्यात तीस हजार रुपयांचा नुकसान झाल्याचे तहसीलदार संजय रामटेके यांनी सांगितले. तालुक्यात जीवित हानी कुठेही झालेली नाही. मोठ्या प्रमाणात झाडे मात्र पडलीत. तसेच आंबा पिकाचे नुकसान झाले.