शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

शेतकऱ्यांकडून जबरीने कर्जवसुली

By admin | Updated: March 25, 2017 01:46 IST

आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने सध्या शेतकऱ्यांकडून जबरण कर्जवसुलीचा सपाटा पतसंस्थेच्या माध्यमातून सुरु आहे.

पतसंस्थेची कार्यप्रणाली : घरातील वस्तू करतात जप्त साखरीटोला : आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने सध्या शेतकऱ्यांकडून जबरण कर्जवसुलीचा सपाटा पतसंस्थेच्या माध्यमातून सुरु आहे. कर्ज न भरल्यास घरातील मिळेल ती वस्तू जप्त केल्या जात आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग धास्तावला असून कोणाकडे कैफियत मांडायची, असा प्रश्न त्यांना पडला आहे. आदिवासी विविध कार्यकारी सहकारी पतसंस्था सातगाव तालुका सालेकसाच्या वतीने कर्ज वसुली पथक तयार करण्यात आला. ज्या शेतकऱ्यांवर थकित कर्ज आहे, त्यांच्याकडून जबरदस्ती कर्ज वसूल करण्याचा सपाटा सुरु केला आहे. या पथकाने १८ मार्च २०१७ ला कारुटोला येथील कर्जदार शेतकरी राधेश्याम लालू खोब्रागडे यांच्या घरी भेट दिली. त्यावेळी ते व त्यांची पत्नी प्रकृती बरी नसल्याने औषधोपचाराकरिता रूग्णालयात गेले होते. त्यांची मुलगी (१७) एकटीच घरी होती. मुलीने आई-बाबा रूग्णालयात गेले आहेत, असे सांगितल्यानंतरही वसुली पथकाने घराच्या मागील बाजूने घरात घुसून घरातील टी.व्ही. संच काढून सोबत नेले. तसेच मुलीला धमकी देऊन जबरण स्वाक्षरी घेतली, असा आरोप सदर शेतकऱ्याने केला आहे. राधेश्याम खोब्रागडे यांच्या म्हणण्यानुसार, सत्र २००९-१० या वर्षात सदर पतसंस्थेकडून क्रॉप्ट लोन घेतले होते. हे कर्ज भरण्याच्या तयारीत असताना त्यांची अचानक प्रकृती बिघडली. गोंदिया येथील डॉ. बाहेकर यांच्या रूग्णालयात उपचार केला. त्यामुळे यात त्यांना बराच खर्च आला. यातून त्यांनी एक एकर जमीन विकली व त्यातून आपला औषधोपचार करवून घेतला. कर्जाची काही रक्कमदेखील भरली. मात्र पुन्हा प्रकृती बिघडली. त्यामुळे उपचाराकरिता खर्च करावे लागले. अशा परिस्थितीमुळे काही कर्ज बाकी राहिले. अशा कोणत्याही परिस्थितीचा विचार न करता पतसंस्था जबरण कर्ज वसुली करुन नव्हे तर वस्तू जप्त करुन भयभित करीत आहे. या प्रकरणामुळे सदर शेतकऱ्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला असून जीवन कसे जगावे? असा प्रश्न पडला आहे. आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची रितसर तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून चौकशी करुन योग्य कार्यवाही करावी व न्याय द्यावा, अशी मागणी राधेश्याम खोब्रागडे यांनी केली आहे.(वार्ताहर)