शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

माहितीअभावी विद्यार्थी पोहोचले शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:27 IST

रावणवाडी : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या ३१ तारखेपर्यंत सर्व शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश काढले असून, त्याची ...

रावणवाडी : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या ३१ तारखेपर्यंत सर्व शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश काढले असून, त्याची अंमलबजावणी शनिवारपासून (दि.२०) करण्यात आली. मात्र याबाबत कित्येक विद्यार्थ्यांना माहिती नसल्याने विद्यार्थी शाळेत पोहोचले होते. त्यांना याबाबत माहिती देऊन परत पाठविण्यात आले.

राज्यात कोरोनाने कहर केला असून, आता जिल्ह्यातही कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशात सुरक्षात्मक पाऊल म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.१९) जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविदयालये येत्या ३१ तारखेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढले. या आदेशाची अंमलबजावणी शनिवारपासून (दि.२०) करावयाची होती. त्यानुसार शाळा-महाविद्यालय उघडण्यात आले नाही. मात्र तडकाफडकी निघालेल्या या आदेशाबाबत माहिती नसल्याने जिल्हा परिषद तसेच काही खासगी शाळांतील कित्येक विद्यार्थी व शिक्षक शनिवारी शाळेत पोहोचल्याचे आढळले. शाळा बंद असल्याने काही वाट बघून ते परतून गेले, तर काही ठिकाणी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना माहिती देऊन परत पाठविले. जिल्ह्यातील काही शाळांतील विद्यार्थी बाधित झाल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. पालक आपल्या पाल्यांना मास्क लावून शाळेत पाठवितात. शाळा बंद असल्याच्या माहितीअभावी शनिवारी चारगाव, मुरपार, रावणवाडी, सिरपूर व मोगर्रा येथील जिला परिषद शाळेतील विद्यार्थी मास्क न लावताच आढळले.

-------------------------------

पालकांनी लक्ष देण्याची गरज

शाळांना आता सुटी लागली असून, पालकांना आता आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. पाल्यांनी बाहेर कोठेही जाताना मास्क लावला की नाही, हे बघावे. तसेच पालकांनी आता आपल्या पाल्यांना कोरोनाबाबत माहिती देऊन त्यासाठी असलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना प्रेरित करण्याची गरज आहे.