शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

माहितीअभावी विद्यार्थी पोहोचले शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:27 IST

रावणवाडी : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या ३१ तारखेपर्यंत सर्व शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश काढले असून, त्याची ...

रावणवाडी : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या ३१ तारखेपर्यंत सर्व शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश काढले असून, त्याची अंमलबजावणी शनिवारपासून (दि.२०) करण्यात आली. मात्र याबाबत कित्येक विद्यार्थ्यांना माहिती नसल्याने विद्यार्थी शाळेत पोहोचले होते. त्यांना याबाबत माहिती देऊन परत पाठविण्यात आले.

राज्यात कोरोनाने कहर केला असून, आता जिल्ह्यातही कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशात सुरक्षात्मक पाऊल म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.१९) जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविदयालये येत्या ३१ तारखेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढले. या आदेशाची अंमलबजावणी शनिवारपासून (दि.२०) करावयाची होती. त्यानुसार शाळा-महाविद्यालय उघडण्यात आले नाही. मात्र तडकाफडकी निघालेल्या या आदेशाबाबत माहिती नसल्याने जिल्हा परिषद तसेच काही खासगी शाळांतील कित्येक विद्यार्थी व शिक्षक शनिवारी शाळेत पोहोचल्याचे आढळले. शाळा बंद असल्याने काही वाट बघून ते परतून गेले, तर काही ठिकाणी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना माहिती देऊन परत पाठविले. जिल्ह्यातील काही शाळांतील विद्यार्थी बाधित झाल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. पालक आपल्या पाल्यांना मास्क लावून शाळेत पाठवितात. शाळा बंद असल्याच्या माहितीअभावी शनिवारी चारगाव, मुरपार, रावणवाडी, सिरपूर व मोगर्रा येथील जिला परिषद शाळेतील विद्यार्थी मास्क न लावताच आढळले.

-------------------------------

पालकांनी लक्ष देण्याची गरज

शाळांना आता सुटी लागली असून, पालकांना आता आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. पाल्यांनी बाहेर कोठेही जाताना मास्क लावला की नाही, हे बघावे. तसेच पालकांनी आता आपल्या पाल्यांना कोरोनाबाबत माहिती देऊन त्यासाठी असलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना प्रेरित करण्याची गरज आहे.