शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

माहितीअभावी विद्यार्थी पोहोचले शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:27 IST

रावणवाडी : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या ३१ तारखेपर्यंत सर्व शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश काढले असून, त्याची ...

रावणवाडी : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या ३१ तारखेपर्यंत सर्व शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश काढले असून, त्याची अंमलबजावणी शनिवारपासून (दि.२०) करण्यात आली. मात्र याबाबत कित्येक विद्यार्थ्यांना माहिती नसल्याने विद्यार्थी शाळेत पोहोचले होते. त्यांना याबाबत माहिती देऊन परत पाठविण्यात आले.

राज्यात कोरोनाने कहर केला असून, आता जिल्ह्यातही कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशात सुरक्षात्मक पाऊल म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.१९) जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविदयालये येत्या ३१ तारखेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढले. या आदेशाची अंमलबजावणी शनिवारपासून (दि.२०) करावयाची होती. त्यानुसार शाळा-महाविद्यालय उघडण्यात आले नाही. मात्र तडकाफडकी निघालेल्या या आदेशाबाबत माहिती नसल्याने जिल्हा परिषद तसेच काही खासगी शाळांतील कित्येक विद्यार्थी व शिक्षक शनिवारी शाळेत पोहोचल्याचे आढळले. शाळा बंद असल्याने काही वाट बघून ते परतून गेले, तर काही ठिकाणी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना माहिती देऊन परत पाठविले. जिल्ह्यातील काही शाळांतील विद्यार्थी बाधित झाल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. पालक आपल्या पाल्यांना मास्क लावून शाळेत पाठवितात. शाळा बंद असल्याच्या माहितीअभावी शनिवारी चारगाव, मुरपार, रावणवाडी, सिरपूर व मोगर्रा येथील जिला परिषद शाळेतील विद्यार्थी मास्क न लावताच आढळले.

-------------------------------

पालकांनी लक्ष देण्याची गरज

शाळांना आता सुटी लागली असून, पालकांना आता आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. पाल्यांनी बाहेर कोठेही जाताना मास्क लावला की नाही, हे बघावे. तसेच पालकांनी आता आपल्या पाल्यांना कोरोनाबाबत माहिती देऊन त्यासाठी असलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना प्रेरित करण्याची गरज आहे.