शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

कुणबी समाजाने उद्योगाकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 00:25 IST

वर्षानुवर्षे शेती करणारा कुणबी समाज मागासला. शासक असणारा समाज आज आर्थिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रात दुबळा होत आहे.

भुनेश्वर शिवणकर : कोजागिरी उत्सव, फलकाचे अनावरणअर्जुनी मोरगाव : वर्षानुवर्षे शेती करणारा कुणबी समाज मागासला. शासक असणारा समाज आज आर्थिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रात दुबळा होत आहे. शासन प्रत्येकाला नोकरी देऊ शकत नाही. गत वैभव प्राप्त करण्यासाठी समाजाने आपसातील मतभेद विसरुन शेतीला पुरक व्यवसाय करावा. तांत्रिक कौशल्य प्राप्त करुन प्रत्येकाने उद्योजक व्हावे, असे प्रतिपादन जिल्हा उद्योग केंद्र गोंदियाचे अधीक्षक भुनेश्वर शिवणकर यांनी केले.ते तालुकास्तरीय कुणबी समाज बहुउद्देशिय सेवा संस्था द्वारे आयोजित कोजागिरी पौर्णिमा उत्सव समारोहात मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. दिलीप काकडे होते. उद्घाटन योग प्रशिक्षक दादा फुंडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, पं.स. सभापती अरविंद शिवणकर, जि.प. सदस्य किशोर तरोणे, कृउबास उपसभापती लायकराम भेंडारकर, जि.प. सदस्य कमल पाऊलझगडे, पं.स. सदस्य पिंगला ब्राम्हणकर, नगर पंचायत नगरसेविका येमू ब्राम्हणकर, गीता ब्राम्हणकर, लक्ष्मी धान गिरणी अध्यक्ष कांता पाऊलझगडे, कार्यकारिणी अध्यक्ष अनिरुद्ध ढोरे उपस्थित होते. किशोर तरोणे यांनी संबोधनातून कुणबी समाजाने प्रत्येक ठिकाणी नेतृत्व करावे. प्रवाहाच्या विरुद्ध जावून स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्याचे आवाहन केले. पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी, जो समाजासाठी राबला तो समाजाला लक्षात राहिला. शेतकऱ्यांची मुले शिकल्याशिवाय शेतकऱ्यांचा घामाला दाम मिळणार नसल्याचे सांगितले. दादा फुंडे यांनी योगगुरु बाबा रामदेव यांच्या नागपूर येथील फुडपार्कमध्ये येणाऱ्या दिवसात दुधासोबतच गाईचे गोमूत्र, गुरवेल, ज्वारफाटा याची गरज पडेल. ही शेती करा. प्रगतीमध्ये श्रम आवश्यक असते. समाजाने स्वत:सोबत इतर जातीधर्मांनाही सोबत घेवून चालावे, असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणातून डॉ. दिलीप काकडे यांनी, समाजाने क्रांतीसाठी डॉ. बाबासाहेब व भगवान गौतम बुद्ध यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलवा. बुद्धांचे तत्वज्ञान अंगिकारा. मराठा मूक मोर्चा कुणबीयांचे संयम दर्शविते. विचार स्वीकारा, क्रांती होईल. संघटन हे येणाऱ्या पिढीसाठी आहे. नेत्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा संघटन मजबूत करा, असे मत मांडले. कार्यक्रमाची सुरुवात संतसिरोमणी तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमापूजन व माल्यार्पणाने झाली. उरी हमल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमापूर्वी लाखांदूर रोडवरील टी-पार्इंटला छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणून नामकरण केले गेले. फलक व ध्वजाचे अनावरण झाले. संघटनेच्या वतीने तालुक्यातील १३ गावांमधील गाव कार्यकारिणीचे स्वागत करण्यात आले. दहावी व बारावीमधील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक अनिरुद्ध ढोरे यांनी मांडले. संचालन पद्मजा मेहंदळे यांनी केले. आभार सुनिता हुमने यांनी मानले. कार्यक्रमासाठी समाज संघटना, जिजाऊ महिला ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी )