शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

कुणबी समाजाने उद्योगाकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 00:25 IST

वर्षानुवर्षे शेती करणारा कुणबी समाज मागासला. शासक असणारा समाज आज आर्थिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रात दुबळा होत आहे.

भुनेश्वर शिवणकर : कोजागिरी उत्सव, फलकाचे अनावरणअर्जुनी मोरगाव : वर्षानुवर्षे शेती करणारा कुणबी समाज मागासला. शासक असणारा समाज आज आर्थिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रात दुबळा होत आहे. शासन प्रत्येकाला नोकरी देऊ शकत नाही. गत वैभव प्राप्त करण्यासाठी समाजाने आपसातील मतभेद विसरुन शेतीला पुरक व्यवसाय करावा. तांत्रिक कौशल्य प्राप्त करुन प्रत्येकाने उद्योजक व्हावे, असे प्रतिपादन जिल्हा उद्योग केंद्र गोंदियाचे अधीक्षक भुनेश्वर शिवणकर यांनी केले.ते तालुकास्तरीय कुणबी समाज बहुउद्देशिय सेवा संस्था द्वारे आयोजित कोजागिरी पौर्णिमा उत्सव समारोहात मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. दिलीप काकडे होते. उद्घाटन योग प्रशिक्षक दादा फुंडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, पं.स. सभापती अरविंद शिवणकर, जि.प. सदस्य किशोर तरोणे, कृउबास उपसभापती लायकराम भेंडारकर, जि.प. सदस्य कमल पाऊलझगडे, पं.स. सदस्य पिंगला ब्राम्हणकर, नगर पंचायत नगरसेविका येमू ब्राम्हणकर, गीता ब्राम्हणकर, लक्ष्मी धान गिरणी अध्यक्ष कांता पाऊलझगडे, कार्यकारिणी अध्यक्ष अनिरुद्ध ढोरे उपस्थित होते. किशोर तरोणे यांनी संबोधनातून कुणबी समाजाने प्रत्येक ठिकाणी नेतृत्व करावे. प्रवाहाच्या विरुद्ध जावून स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्याचे आवाहन केले. पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी, जो समाजासाठी राबला तो समाजाला लक्षात राहिला. शेतकऱ्यांची मुले शिकल्याशिवाय शेतकऱ्यांचा घामाला दाम मिळणार नसल्याचे सांगितले. दादा फुंडे यांनी योगगुरु बाबा रामदेव यांच्या नागपूर येथील फुडपार्कमध्ये येणाऱ्या दिवसात दुधासोबतच गाईचे गोमूत्र, गुरवेल, ज्वारफाटा याची गरज पडेल. ही शेती करा. प्रगतीमध्ये श्रम आवश्यक असते. समाजाने स्वत:सोबत इतर जातीधर्मांनाही सोबत घेवून चालावे, असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणातून डॉ. दिलीप काकडे यांनी, समाजाने क्रांतीसाठी डॉ. बाबासाहेब व भगवान गौतम बुद्ध यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलवा. बुद्धांचे तत्वज्ञान अंगिकारा. मराठा मूक मोर्चा कुणबीयांचे संयम दर्शविते. विचार स्वीकारा, क्रांती होईल. संघटन हे येणाऱ्या पिढीसाठी आहे. नेत्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा संघटन मजबूत करा, असे मत मांडले. कार्यक्रमाची सुरुवात संतसिरोमणी तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमापूजन व माल्यार्पणाने झाली. उरी हमल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमापूर्वी लाखांदूर रोडवरील टी-पार्इंटला छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणून नामकरण केले गेले. फलक व ध्वजाचे अनावरण झाले. संघटनेच्या वतीने तालुक्यातील १३ गावांमधील गाव कार्यकारिणीचे स्वागत करण्यात आले. दहावी व बारावीमधील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक अनिरुद्ध ढोरे यांनी मांडले. संचालन पद्मजा मेहंदळे यांनी केले. आभार सुनिता हुमने यांनी मानले. कार्यक्रमासाठी समाज संघटना, जिजाऊ महिला ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी )