शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कुंभार समाज आजही जगतोय उपेक्षितांचे जीणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 21:40 IST

तंत्रज्ञानाच्या युगात व चीनी वस्तुंमुळे मातीपासून तयार होणाऱ्या वस्तुंना आता बाजारात भाव व मागणीही नाही. वंश परंपरागत कुंभार समाजाच्या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे कुंभार समाज आजघडीला उपेक्षीतांचे जीवन जगत आहे. त्यांच्या कौटुंबीक उदरनिर्वाहाचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देमागणीत घट झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न : बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याची गरज

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तंत्रज्ञानाच्या युगात व चीनी वस्तुंमुळे मातीपासून तयार होणाऱ्या वस्तुंना आता बाजारात भाव व मागणीही नाही. वंश परंपरागत कुंभार समाजाच्या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे कुंभार समाज आजघडीला उपेक्षीतांचे जीवन जगत आहे. त्यांच्या कौटुंबीक उदरनिर्वाहाचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आला आहे.गोेंदिया जिल्ह्यात कुंभार समाज मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांनी थाटलेला वंश परापंरागत व्यवसाय गावागावात पहावयास मिळतो. मात्र त्यांनी तयार केलेल्या मातीपासून तयात केलेल्या भांड्यांना जिल्ह्यात बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे गावखेड्यात भटकंती करुन तयार केलेले भांडे विकावे लागत आहे. वाढत्या महागाई व दुष्काळात कसे तग धरुन राहायचे व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाल्याची व्यथा गोरेगाव येथील प्रेमलाल खोपडे यांनी लोकमतकडे मांडली.पंचवीस वर्षापूर्वी कुंभारांनी तयार केलेल्या भांड्यांना मोठी मागणी होती. घराघरात स्वयंपाकासाठी पाणी गरम करण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी आंघोळीसाठी मातीपासून तयार झालेल्या भांड्यांचा वापर व्हायचा. मात्र आजघडीला मातीच्या भांड्यांची जागा स्टिल व प्लास्टिकच्या भांड्यांनी घेतली आहे. विस वर्षापूर्वी गोंदियात मातीच्या भांड्यांची बाजारपेठ भरत होती. तेव्हा कुंभार समाजाच्या व्यवसायाला थोडेफार का होईना सुगीचे दिवस होते.हल्ली कुंभार समाजाला मातीकृत विविध प्रकारचे भांडे तयार करण्यासाठी मातीपासून तर इंधनापर्यंत सर्वच विकत आणावे लागते. व्यवसायासाठी लागणारा खर्च व यातून मिळणारे उत्पन्न फार कमी असल्याने या व्यवसायाकडे अनेक कुंभार समाजातील तरुणांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे कुंभार समाज मातीपासून दिवा, गंगाळ, घागर, माथन, गल्ले, उदानी, कुंडल्या, कुंडी माठ, पारोली, सुरई, मुर्त्या अशा वेगवेगळ्या वस्तू बनवून दारोदारी भटकंती करुन व आठवडी बाजारात त्या वस्तुंची विक्री करुन मिळणाºया तुंटपुज्या उत्पन्नात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. हा आपल्या कुटुंबाचा परंपरागत व्यवसाय असून, आपण तो जोपासला असल्याचे सांगत असत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळातही ग्रामीण भागात हाताच्या कलेलाही तेवढीच मागणी होती. आजघडीला मूर्ती तयार करण्याचा व्यवसायाला बरे दिवस आहेत. पण हा वर्षभर चालणारा व्यवसाय नाही. वर्षातून सहा महिने हा व्यवसाय चालते. इतर वेळात वेठबिगार राहावे लागते.कुटुंबातील आई-वडिलांपासून ते लहान्यापर्यंत सारेच या व्यवसायात राबतात. दिवसभर मेहनत करुन मातीचे भांडे गावागावात जाऊन विकावे लागते.पण या मातीच्या भांड्यांना आता तेवढी मागणी नसल्यामुळे या व्यवसायाला उतरती कळा आली आहे.शासनाकडून मिळते मदतकुंभार समाज ओबीसी समाजात मोडतो. या समाजाचे अलीकडेच भंडारा जिल्ह्यातील मुंढरी येथे मोठे प्रशिक्षण झाले. या प्रशिक्षणात ज्यांनी प्रशिक्षण घेतले त्यांना मातीचे भांडे बनविण्यासाठी इलेक्ट्रीक साहित्य वाटप करण्यात आले. गोंदिया जिल्ह्यात असे मोठे प्रशिक्षण व्हायला पाहिजे, अशी मागणी समाजातील नागरिकांनी केली आहे.लग्नकार्यात मातीच्या भांड्यांची मागणीहिंदू संस्कृतीत आजही लग्नसोहळ्यात वर-वधूपक्षांकडे मातीपासून तयार झालेल्या भांड्याची मागणी आहे. दोन्ही पक्षाकडे मंडप पूजनाच्या दिवशी लग्न वाण म्हणून लहान भांडे (गाडगे) कलश, गंगार, माथनची माणगी आहे. सुरईची जागा फ्रिजने, स्वयंपाकाची जागा स्टिल व कढईच्या भांड्यांने जरी घेतली असली तरी लग्नसोहळ्यात लग्न वाणाची जागा कशानेही घेतली नाही. त्यामुळे कुंभार समाजाच्या व्यवसायाची त्यांनी मेहनतीने तयार केलेल्या भांड्यांची भविष्यात गरज राहणार आहे.कुंभार समाजाची होती मागणीपूर्वीच्या काळी कुंभार समाजाची गावच्या पाटलाकडून मोठी मागणी होती. या समाजाचे एकतरी कुटुंब गावात राहयला पाहिजे, यासाठी खास कुंभार कुटुंबाची मागणी होती.पुर्वीच्या काळात कुंभार समाजाने तयार केलेले भांडे गावात उपलब्ध व्हावे हा देखील त्यामागील उद्देश होता.कुंभार समाजातील तरुण आता शिक्षणाकडे वळत आहे. बरेच तरुण शासकीय सेवेत आहेत. वंश परपंरागत व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह कठीण असल्यामुळे इतर व्यवसायाकडे वळणे गरजेचे आहे.-वामन वरवाडे, मूर्ती कलाकार गोरेगाव.