शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
4
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
5
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
6
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
7
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
8
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
9
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
10
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
11
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
12
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
13
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
14
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
15
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
16
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
17
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
18
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
19
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
20
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर

कर्जमाफीच्या ग्रीन यादीची कोंडी फुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 21:38 IST

जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील २० हजारावर शेतकऱ्यांची दहावी ग्रीन यादी अद्यापही महाआॅनलाईनकडून बँकाना प्राप्त झाली नाही. परिणामी शेतकऱ्यांना दुसऱ्यांपुढे हात पसरण्याची पाळी आली आहे. कर्जमाफीच्या ग्रीन यादीची कोंडी फुटत नसल्याने शेतकऱ्यांसह बँकांची सुध्दा कोंडी झाली आहे.

ठळक मुद्देबळीराजाला फटका : बँकाचे महाआॅनलाईनकडे बोट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील २० हजारावर शेतकऱ्यांची दहावी ग्रीन यादी अद्यापही महाआॅनलाईनकडून बँकाना प्राप्त झाली नाही. परिणामी शेतकऱ्यांना दुसऱ्यांपुढे हात पसरण्याची पाळी आली आहे. कर्जमाफीच्या ग्रीन यादीची कोंडी फुटत नसल्याने शेतकऱ्यांसह बँकांची सुध्दा कोंडी झाली आहे.मागील दोन महिन्यांपासून जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकांना शासनाने नियुक्त केलेल्या महाआॅनलाईनकडून ग्रीन याद्या प्राप्त झाल्या नाही. परिणामी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील २० हजारावर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही. तर दुसरीकडे खरीपातील रोवणीची कामे सुरू असून मजुरी, खते घेण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. मात्र या शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाली नसल्याने त्यांना नवीन पीक कर्जाची उचल करता येत नाही. तर कर्जाच्या थकबाकीची रक्कम भरल्यास या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दोन्हीकडून कोंडी झाली आहे. शेतकरी दररोज बँकेत जावून ग्रीन यादी आली का अशी विचारणा अधिकाऱ्यांना करीत आहे.मात्र याद्या आल्या नसल्याने त्यांना आल्यापावलीच निराश परत जावे लागत आहे. रोवणीची कामे वेळेत न केल्यास हंगामाला मुकावे लागेल. त्यामुळे शेतकरी नातेवाईक आणि सावकारांकडून पैशाची उचल करुन रोवणीची कामे करीत आहेत. दोन महिन्याचा कालावधी लोटून दहावी ग्रीन यादी आली नसल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे. तर ग्रीन यादी मिळण्यास विलंब होत असल्याने बँकाची सुध्दा डोकेदुखी वाढली आहे.शेतकऱ्यांना व्याजाचा भुर्दंडसध्या रोवणीेचा हंगाम सुरू असून वेळीच रोवणी केली नाही तर हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे. तो वाया जावू नये, यासाठी शेतकरी सावकारांकडून व्याजाचे पैसे आणीत आहेत. तर दुसरीकडे कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही हे अद्यापही स्पष्ट झाले नसल्याने थकीत कर्जावर बँकेचे व्याज वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना व्याजाचा आर्थिक भुर्दंड बसत आहे.शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यातराज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. मात्र वर्षभराचा कालावधी लोटूनही यातील घोळ संपलेला नाही. त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना बँक खात्यावर अद्यापही कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे रक्कम त्वरीत खात्यावर जमा करा अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.