शहरं
Join us  
Trending Stories
1
iPhone 17 सीरीजचे चार नवे मॉडेल्स लॉन्च, Pro Motion डिस्प्ले, 20 म‍िनिटांत चार्ज; आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
2
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
3
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
4
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
5
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
6
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
7
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
8
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
9
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
10
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
11
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
12
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
13
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
14
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
15
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
16
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
17
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
18
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
19
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?

कोल्हापुरी बंधाऱ्यांना ग्रहण

By admin | Updated: June 11, 2015 00:47 IST

तालुक्यात तयार करण्यात आलेले कोल्हापुरी बंधारे केवळ शोभेच्या वस्तू ठरले आहेत.

अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : ८० टक्के शेती सिंचनापासून वंचितराजेश मुनिश्वर सडक-अर्जुनीतालुक्यात तयार करण्यात आलेले कोल्हापुरी बंधारे केवळ शोभेच्या वस्तू ठरले आहेत. त्यामुळे तालुक्यातील ८० टक्के शेती सिंचनापासून वंचित आहे. जणूकाय या कोल्हापुरी बंधाऱ्यांना ग्रहण लागले की काय? असेच वातावरण दिसून येत आहे.तालुक्यातील रेंगेपार, बाह्मणी, खडकी, कनेरी, मनेरी, वडेगाव, शेंडा, जांभळी, कोयलारी, कोसलतोंडी, पांढरी, डव्वा, सौंदड, खजरी, बिंद्राबन, कोदामेडी या परिसरात बांधण्यात आलेले कोल्हापुरी बंधाऱ्यांकडे अधिकारी व लोकप्रतिनिधींचे ठाम दुर्लक्ष आहे. त्यामुळे एखाद्या कपाटात शोभेची वस्तू ठेवल्याप्रमाणे हे कोल्हापुरी बंधारे नदीच्या पात्रात मांडून ठेवल्यासारखेच वाटते. लाखो रुपये खर्च करून या कोल्हापुरी बंधाऱ्यांचा पाणी शेतकऱ्यांना एकवेळसुद्धा मिळणे कठीण झाले आहे. नियोजनाअभावी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भलत्याच ठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे पाण्याची योग्य प्रमाणात साठवणूक होत नाही. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी केवळ नावापुरतेच कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम करताना ‘अर्धे तुमचे व अर्धे आमचे’ हे धोरण समोर ठेवून बंधाऱ्याचे बांधकाम केल्याचे चित्र दिसून येत आहे. दहा वर्षांपूर्वी वडेगाव गावालगत वाहणाऱ्या उमरझरी नाल्यावर दोन बंधारे बांधण्यात आले होते. हे कोल्हापुरी बंधारे बांधण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. ज्यावर्षी बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण झाले, त्यानंतर दुसऱ्या वर्षीपासून या बंधाऱ्यात पाणी साठवून राहत नाही. त्यामुळे या बंधाऱ्याचे बांधकाम कशाकरिता? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बंधाऱ्याला लावलेल्या लोखंडी पट्ट्या चोरांनी चोरून नेल्या की कुणी विकून खाल्या, हेसुद्धा कळायला मार्ग नाही. वडेगाव जवळील काळा गोटा १ व २ ठिकाणी मोठे बंधारे आजही मोठ्या ऐटीत उभे आहेत. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने लक्ष दिल्यास वडेगाव, परसोडी, रेंगेपार, डोंगरगाव, खजरी, नवाटोला, डोयेटोला, केसलवाडा, पांढरवाणी, मुनिश्वरटोला या गावातील शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर शेती सिंचनाखाली हमखास येवू शकते. त्यामुळे भाजीपाला, ऊस, टरबूज, धान शेतीचे उत्पादन काढू शकतात. त्याचबरोबर रबी पिके घेऊ शकतात. या दोन्ही बंधाऱ्यांचे खऱ्या अर्थाने नियोजन केल्यास परिसराच्या गावातील पाण्याची पातळी उंचावेल. त्याचप्रमाणे वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय होईल. तालुक्यातील अन्य निकामी ठरलेल्या बंधाऱ्यांची देखभाल दुरूस्ती केल्यास शेतकऱ्यांना या माध्यमातून सिंचनाची सोय उपलब्ध होऊन दुष्काळी परिस्थितीवर मात करणे शक्य होईल. पांढरी, कोसमतोंडी, सौंदड, डोंगरगाव-डेपो, झेंडा, बाम्हणी-खडकी, रेंगेपार, जांभळी-दोडके, डव्वा, बोथली, मुरपार, मनेरी, चिखली या परिसरात प्रामुख्याने निकामी बंधारे आजही पहावयास मिळत आहेत. या सर्व निकामी बंधाऱ्यांची डागडुजी केल्यास पाण्याचा स्तर तर उंचावेल, पण त्याचबरोबर शेतीला सिंचनाची हमखास सोय होईल. उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणार नाही. सिंचनासाठी पाण्याची सोय असेल तर शेतकरी टिकून राहतील. लोकप्रतिनिधींनी व अधिकाऱ्यांनी बंधाऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे. काही गावात सिंचनाची सोय नसल्यामुळे खरीप पिके घेऊन उन्हाळ्याच्या दिवसात नागरिक इतरत्र शहराकडे रोजगाराच्या शोधात जातात. मात्र सिंचनाची सोय झाल्यास शेतकरी सुजलाम-सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही व त्यांची भटकंतीसुद्धा थांबेल. सडक-अर्जुनी तालुक्यातील थाटेझरी, गिरोला, म्हसवाणी, डव्वा, घोटी या गावातील निकामी बंधाऱ्यांची जलयुक्त शिवार अभियानांतर्गत दुरूस्तीचे कामे करण्यात येणार आहेत. केसलवाडा गावाजवळील कोल्हापुरी बंधारा मग्रारोहयोअंतर्गत होऊ शकतो. किशोर शेट्टी,शाखा अभियंता लघु पाटबंधारे विभाग, आमगाव