शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरी बंधाऱ्यांना ग्रहण

By admin | Updated: June 11, 2015 00:47 IST

तालुक्यात तयार करण्यात आलेले कोल्हापुरी बंधारे केवळ शोभेच्या वस्तू ठरले आहेत.

अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : ८० टक्के शेती सिंचनापासून वंचितराजेश मुनिश्वर सडक-अर्जुनीतालुक्यात तयार करण्यात आलेले कोल्हापुरी बंधारे केवळ शोभेच्या वस्तू ठरले आहेत. त्यामुळे तालुक्यातील ८० टक्के शेती सिंचनापासून वंचित आहे. जणूकाय या कोल्हापुरी बंधाऱ्यांना ग्रहण लागले की काय? असेच वातावरण दिसून येत आहे.तालुक्यातील रेंगेपार, बाह्मणी, खडकी, कनेरी, मनेरी, वडेगाव, शेंडा, जांभळी, कोयलारी, कोसलतोंडी, पांढरी, डव्वा, सौंदड, खजरी, बिंद्राबन, कोदामेडी या परिसरात बांधण्यात आलेले कोल्हापुरी बंधाऱ्यांकडे अधिकारी व लोकप्रतिनिधींचे ठाम दुर्लक्ष आहे. त्यामुळे एखाद्या कपाटात शोभेची वस्तू ठेवल्याप्रमाणे हे कोल्हापुरी बंधारे नदीच्या पात्रात मांडून ठेवल्यासारखेच वाटते. लाखो रुपये खर्च करून या कोल्हापुरी बंधाऱ्यांचा पाणी शेतकऱ्यांना एकवेळसुद्धा मिळणे कठीण झाले आहे. नियोजनाअभावी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भलत्याच ठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे पाण्याची योग्य प्रमाणात साठवणूक होत नाही. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी केवळ नावापुरतेच कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम करताना ‘अर्धे तुमचे व अर्धे आमचे’ हे धोरण समोर ठेवून बंधाऱ्याचे बांधकाम केल्याचे चित्र दिसून येत आहे. दहा वर्षांपूर्वी वडेगाव गावालगत वाहणाऱ्या उमरझरी नाल्यावर दोन बंधारे बांधण्यात आले होते. हे कोल्हापुरी बंधारे बांधण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. ज्यावर्षी बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण झाले, त्यानंतर दुसऱ्या वर्षीपासून या बंधाऱ्यात पाणी साठवून राहत नाही. त्यामुळे या बंधाऱ्याचे बांधकाम कशाकरिता? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बंधाऱ्याला लावलेल्या लोखंडी पट्ट्या चोरांनी चोरून नेल्या की कुणी विकून खाल्या, हेसुद्धा कळायला मार्ग नाही. वडेगाव जवळील काळा गोटा १ व २ ठिकाणी मोठे बंधारे आजही मोठ्या ऐटीत उभे आहेत. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने लक्ष दिल्यास वडेगाव, परसोडी, रेंगेपार, डोंगरगाव, खजरी, नवाटोला, डोयेटोला, केसलवाडा, पांढरवाणी, मुनिश्वरटोला या गावातील शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर शेती सिंचनाखाली हमखास येवू शकते. त्यामुळे भाजीपाला, ऊस, टरबूज, धान शेतीचे उत्पादन काढू शकतात. त्याचबरोबर रबी पिके घेऊ शकतात. या दोन्ही बंधाऱ्यांचे खऱ्या अर्थाने नियोजन केल्यास परिसराच्या गावातील पाण्याची पातळी उंचावेल. त्याचप्रमाणे वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय होईल. तालुक्यातील अन्य निकामी ठरलेल्या बंधाऱ्यांची देखभाल दुरूस्ती केल्यास शेतकऱ्यांना या माध्यमातून सिंचनाची सोय उपलब्ध होऊन दुष्काळी परिस्थितीवर मात करणे शक्य होईल. पांढरी, कोसमतोंडी, सौंदड, डोंगरगाव-डेपो, झेंडा, बाम्हणी-खडकी, रेंगेपार, जांभळी-दोडके, डव्वा, बोथली, मुरपार, मनेरी, चिखली या परिसरात प्रामुख्याने निकामी बंधारे आजही पहावयास मिळत आहेत. या सर्व निकामी बंधाऱ्यांची डागडुजी केल्यास पाण्याचा स्तर तर उंचावेल, पण त्याचबरोबर शेतीला सिंचनाची हमखास सोय होईल. उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणार नाही. सिंचनासाठी पाण्याची सोय असेल तर शेतकरी टिकून राहतील. लोकप्रतिनिधींनी व अधिकाऱ्यांनी बंधाऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे. काही गावात सिंचनाची सोय नसल्यामुळे खरीप पिके घेऊन उन्हाळ्याच्या दिवसात नागरिक इतरत्र शहराकडे रोजगाराच्या शोधात जातात. मात्र सिंचनाची सोय झाल्यास शेतकरी सुजलाम-सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही व त्यांची भटकंतीसुद्धा थांबेल. सडक-अर्जुनी तालुक्यातील थाटेझरी, गिरोला, म्हसवाणी, डव्वा, घोटी या गावातील निकामी बंधाऱ्यांची जलयुक्त शिवार अभियानांतर्गत दुरूस्तीचे कामे करण्यात येणार आहेत. केसलवाडा गावाजवळील कोल्हापुरी बंधारा मग्रारोहयोअंतर्गत होऊ शकतो. किशोर शेट्टी,शाखा अभियंता लघु पाटबंधारे विभाग, आमगाव