शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
3
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
4
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
5
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
6
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
7
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
8
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
9
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
10
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
11
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
12
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
13
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
14
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
15
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
16
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
17
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
18
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
19
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
20
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

कोल्हापुरी बंधारे केवळ नावापुरतेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 21:33 IST

तालुक्यातील ग्राम केसलवाडा जवळील काळा गोटा १ व काळा गोटा २ येथे मागील १५ वर्षांपूर्वी दोन कोल्हापुरी बंधारे तयार करण्यात आले. ज्यावर्षी बंधारे तयार करण्यात आले त्याच वर्षी पुराच्या तडाख्याने बंधाऱ्याच्या दोन्ही बाजुला खिंड पडली. त्यामुळे बंधाऱ्यात पाणी साचून राहण्याऐवजी ते वाहून जात आहे.

ठळक मुद्देशेतकरी सिंचनापासून वंचित : लाखो रुपयांचा खर्च पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : तालुक्यातील ग्राम केसलवाडा जवळील काळा गोटा १ व काळा गोटा २ येथे मागील १५ वर्षांपूर्वी दोन कोल्हापुरी बंधारे तयार करण्यात आले. ज्यावर्षी बंधारे तयार करण्यात आले त्याच वर्षी पुराच्या तडाख्याने बंधाऱ्याच्या दोन्ही बाजुला खिंड पडली. त्यामुळे बंधाऱ्यात पाणी साचून राहण्याऐवजी ते वाहून जात आहे.परिणामी शेतकऱ्यांना या बंधाऱ्यांचा कुठलाच उपयोग होत नाही. लाखो रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेले बंधारे सिंचन विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे नावापुरतेच ठरत आहे. सडक-अर्जुनी जवळून वाहणाºया उमरझरी नाल्यावर शासनाचे लाखो रुपये खर्चून काळा गोटा २ व काळा गोटा २ येथे कोल्हापुरी बंधारे बांधले आहेत.या बंधाºयांमुळे परिसरातील केसलवाडा, वडेगाव-सडक, परसोडी, रेंगेपार, डोयेटोला, नवाटोला, पांढरवानी, सडक-अर्जुनी या गावातील शेतकºयांना सिंचनासाठी मदत होत होती.मात्र या बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले त्याचवर्षी याला पुराचा तडाखा बसला. मात्र त्यानंतर संबंधित विभागाने बंधाऱ्यांची दुरूस्ती केली नाही.त्यामुळे बंधाऱ्यातील पाणी वाहुन जात असून याचा शेतकऱ्यांना कुठलाच फायदा होत नाही. पूर्वी बंधाऱ्याच्या मदतीने शेतकरी रब्बी हंगाम करीत होते. तसेच परतीच्या पावसाने दगा दिल्यास बंधाºयांची मोठी मदत शेतकऱ्यांना होत होती. मात्र जि.प.लघू पाटबंधारे विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने या बंधाºयांचा कुठलाच उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.या बंधाºयांची डागडूजी केल्यास १५ फूट पाणी साचून राहू शकते. त्यामुळे पाळीव प्राणी व वन्य प्राण्यांच्या पिण्याचा पाण्याची सोय व शेतकऱ्यांना सिंचनास मदत होवू शकते. तालुक्याला लागून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आहे. व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्यांना पिण्याचा पाण्याची सोय होवू शकते.बंधाऱ्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्षतालुक्यातील खडकी-बामणी, डोंगरगाव, शेंडा, जांभळी, पांढरी, सौंदड, कोकणा जमिदारी, डुग्गीपार, सिंदिपार, कोसमतोंडी, डव्वा, कोदामेडी, मनेरी, घोटी, मालिजुंगा, मुरपार, पळसगाव आदी ठिकाणी तयार करण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या देखभाल दुरूस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या बंधाºयांचा शेतकºयांना कुठलाच उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.