शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

कोल्हापुरी बंधारे केवळ नावापुरतेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 21:33 IST

तालुक्यातील ग्राम केसलवाडा जवळील काळा गोटा १ व काळा गोटा २ येथे मागील १५ वर्षांपूर्वी दोन कोल्हापुरी बंधारे तयार करण्यात आले. ज्यावर्षी बंधारे तयार करण्यात आले त्याच वर्षी पुराच्या तडाख्याने बंधाऱ्याच्या दोन्ही बाजुला खिंड पडली. त्यामुळे बंधाऱ्यात पाणी साचून राहण्याऐवजी ते वाहून जात आहे.

ठळक मुद्देशेतकरी सिंचनापासून वंचित : लाखो रुपयांचा खर्च पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : तालुक्यातील ग्राम केसलवाडा जवळील काळा गोटा १ व काळा गोटा २ येथे मागील १५ वर्षांपूर्वी दोन कोल्हापुरी बंधारे तयार करण्यात आले. ज्यावर्षी बंधारे तयार करण्यात आले त्याच वर्षी पुराच्या तडाख्याने बंधाऱ्याच्या दोन्ही बाजुला खिंड पडली. त्यामुळे बंधाऱ्यात पाणी साचून राहण्याऐवजी ते वाहून जात आहे.परिणामी शेतकऱ्यांना या बंधाऱ्यांचा कुठलाच उपयोग होत नाही. लाखो रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेले बंधारे सिंचन विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे नावापुरतेच ठरत आहे. सडक-अर्जुनी जवळून वाहणाºया उमरझरी नाल्यावर शासनाचे लाखो रुपये खर्चून काळा गोटा २ व काळा गोटा २ येथे कोल्हापुरी बंधारे बांधले आहेत.या बंधाºयांमुळे परिसरातील केसलवाडा, वडेगाव-सडक, परसोडी, रेंगेपार, डोयेटोला, नवाटोला, पांढरवानी, सडक-अर्जुनी या गावातील शेतकºयांना सिंचनासाठी मदत होत होती.मात्र या बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले त्याचवर्षी याला पुराचा तडाखा बसला. मात्र त्यानंतर संबंधित विभागाने बंधाऱ्यांची दुरूस्ती केली नाही.त्यामुळे बंधाऱ्यातील पाणी वाहुन जात असून याचा शेतकऱ्यांना कुठलाच फायदा होत नाही. पूर्वी बंधाऱ्याच्या मदतीने शेतकरी रब्बी हंगाम करीत होते. तसेच परतीच्या पावसाने दगा दिल्यास बंधाºयांची मोठी मदत शेतकऱ्यांना होत होती. मात्र जि.प.लघू पाटबंधारे विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने या बंधाºयांचा कुठलाच उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.या बंधाºयांची डागडूजी केल्यास १५ फूट पाणी साचून राहू शकते. त्यामुळे पाळीव प्राणी व वन्य प्राण्यांच्या पिण्याचा पाण्याची सोय व शेतकऱ्यांना सिंचनास मदत होवू शकते. तालुक्याला लागून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आहे. व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्यांना पिण्याचा पाण्याची सोय होवू शकते.बंधाऱ्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्षतालुक्यातील खडकी-बामणी, डोंगरगाव, शेंडा, जांभळी, पांढरी, सौंदड, कोकणा जमिदारी, डुग्गीपार, सिंदिपार, कोसमतोंडी, डव्वा, कोदामेडी, मनेरी, घोटी, मालिजुंगा, मुरपार, पळसगाव आदी ठिकाणी तयार करण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या देखभाल दुरूस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या बंधाºयांचा शेतकºयांना कुठलाच उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.