शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

कोया पुनेमला उसळला जनसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2016 02:02 IST

देशातील १६ ते १७ राज्यातून कचारगड येथे दाखल झालेल्या आदिवासी समाजाच्या विविध आयोजनांमुळे विशेष करुन गोंडी धर्मीय ...

आदिवासी कलावंतांचा आविष्कार : कचारगडच्या कुशीत घडले गोंडी संस्कृतीचे दर्शन विजय मानकर सालेकसादेशातील १६ ते १७ राज्यातून कचारगड येथे दाखल झालेल्या आदिवासी समाजाच्या विविध आयोजनांमुळे विशेष करुन गोंडी धर्मीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पाच दिवसीय मेजवानीमुळे कचारगडच्या कुशीत गोंडी संस्कृतीचे दर्शन प्रत्यक्ष घडून आल्याचे दिसले. मागील ३० वर्षांपासून चालत असलेली कचारगड यात्रा यंदा यशस्वी आयोजनाचे शिखर गाठताना दिसून आली. दरवर्षी माघ पौर्णिमेनिमित्त सुरू होणारी कचारगड यात्रा यंदा २० फेब्रुवारीला सुरू झाली. पहिल्या दिवसापासूनच येथे भाविकांची रीघ लागली. २१ फेब्रुवारीला ध्वजारोहणानंतर शंभूसेकची भाविकांचा ओघ कचारगडकडे वाढला. हळूहळू देशाच्या कोणा-कोपऱ्यातून आदिवासी भाविक येथे दाखल घेऊ लागले. पाहतापाहता लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी वाढू लागली. २२ फेब्रुवारी रोजी कोया पूनेम (माघ पौर्णिमा) पूजा असून या दिवशी आदिवासी समाजाचा जनसागर उसळल्याचे चित्र पहावयास मिळाले. या एकाच दिवशी चार लाखापेक्षा जास्त भाविक येथे येऊन कोया पूनेमी पूजा करून आपल्या पूर्वजांना नवस फेडण्याचे काम आदिवासी महिला-पुरूषांनी केले आहे. ज्यांना २२ पर्यंत शक्य झाले नाही त्यांनी २३, २४ व २५ फेब्रुवारीपर्यंत स्थळ गाठले व कचारगड गुफेत आपल्या पूर्वजांची आठवण केली. कोया पूनेम महोत्सवात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले. या राज्यातील मोठ्या प्रमाणात असलेले आदिवासी मोठ्यमोठ्या समुहाने येथे दाखल होताना दिसून आले. त्यांच्या प्रत्येक समुहात आदिवासींचे सप्तरंगी गोंडी ध्वज पकडून आणि विविध वाद्य, ढोल, सनई, किंदरी, मांदरी आदी वाद्यांच्या मधूर संगीतात भाविकांचा लोंढा कचारगडच्या दिशेने येताना दिसत होता. पौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून तर रात्रीपर्यंत छत्तीसगड आणि झारखंड येथील संपूर्ण आदिवासी आपल्या घराला कुलूप लावून आले की काय, असे मत काही लोक व्यक्त करीत होते. २१ फेब्रुवारी रोजी संत रोहिदास जयंती व पंतप्रधान नरेंद्र मोदी शेजारच्या डोंगरगड येथे आले होते. त्यामुळे छत्तीसगडचे भाविक २१ रोजी मोदींच्या कार्यक्रमात आणि संत रोहिदास जयंती कार्यक्रमात व्यस्त होते. त्यामुळे २१ ऐवजी २२ व २३ ला मोठ्या प्रमाणात आले, असे मानले जात होते. परंतु काही भाविकांशी प्रत्यक्ष चर्चा करून माहिती घेतल्यास त्यांनी म्हटले की, कोया पूनेमी पूजेचा महत्व माघ पौर्णिमेदिवशी १५ व्या तिथीला जास्त असते. त्यामुळे आदिवासी लोक माघ पौर्णिमेच्या दिवशी येथे दाखल होण्यास महत्व देतात.गोंडी गीतांतून गौरवगानया ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाव्यतिरिक्त साहित्यकार, कवी, इतिहासकार, संशोधक, धर्माचार्य आदीनींसुध्दा गोंडी संस्कृतीची वैशिष्ट्यपूर्ण माहिती सादर केली. काहींनी आपल्या कवितांच्या माध्यमातून, काहींनी गोंडी गीतांच्या माध्यमातून गोंडी संस्कृतीचा गौरवगान केला. त्यांनी आपापल्या पध्दतीने आदिवासी समाजाला जागृत करण्याचे प्रयत्न केले. दरम्यान अनेक आदिवासी समाजाचे उच्चपदावर कार्यरत राजकीय मंडळी खासदार, आमदार, आयुक्त, कलेक्टर, सीओ, श्रेणी-१ चे अधिकारी असलेले भाविक येऊन कोया पूनेमी पूजा करून गेले. त्यांनी स्थानिक समितीला आपली ओळख न देताच धार्मिक भावना जपून महापूजा करून निघून गेले. कोणताही अनुचित प्रकार नाहीमागील ३२ वर्षीपासून चालत असलेल्या या कोया पूनेम महोत्सवात कोणताही अनुुचित प्रकार घडला नाही. भाविकांची संभावित संख्या बघत प्रशासनाने भौतिक सोयी, सुरक्षा व्यवस्था व सतत योग्य प्रकारे परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला आहे.