शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

खरीप पिकांवर १८१ हेक्टरमध्ये कीडरोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 21:14 IST

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात डिसेंबर महिन्यामध्ये खरिपाच्या धानपिकांवर कीडरोगाच्या प्रादुर्भावाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, कृषी विभागाने सर्वेक्षण केले असून जिल्ह्यात १८१.४१२ हेक्टर क्षेत्र कीडरोगाने प्रभावित झाल्याचा अहवाल तयार केला आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा अहवाल : रब्बीच्या १८२ हेक्टरमधील पिकांवर कीडरोग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात डिसेंबर महिन्यामध्ये खरिपाच्या धानपिकांवर कीडरोगाच्या प्रादुर्भावाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, कृषी विभागाने सर्वेक्षण केले असून जिल्ह्यात १८१.४१२ हेक्टर क्षेत्र कीडरोगाने प्रभावित झाल्याचा अहवाल तयार केला आहे.जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीचे लागवड क्षेत्र सहा हजार ४७१ हेक्टर आहे. त्यात १८१.४१२ हेक्टरमधील पीक कीडरोगांनी ग्रसित झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे असून याची टक्केवारी २.८० आहे. त्यात पाने गुंडाळणाऱ्या अळीमुळे ०.८० टक्के पीक (५१.८३२ हेक्टर) ग्रसित झाले होते. त्यापैकी ५१ हेक्टरमधील पिकांवर फवारणी करून उपचार करण्यात आला. तर घाटेअळी व शेंगा पोखरणारी अळी यामुळे दोन टक्के (१२९.५८ हेक्टर) पीक बाधित झाले होते. त्यातील १२९ हेक्टरमधील पिकांवर फवारणी करून उपचार करण्यात आल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद आहे.या शिवाय, रब्बी हंगामात जानेवारी २०१८ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात १८२.६९ हेक्टरमधील (२.६० टक्के) रब्बीचे पीक प्रभावित झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यापैकी १८२ हेक्टरमधील पिकांवर पीकनिहाय उपचार करण्यात आल्याचे अहवालात नमूद आहे. यात मर रोगाची टक्केवारी २ (१४०.५३ हेक्टर) आहे. त्यापैकी १४० हेक्टर क्षेत्रात फवारणी करण्यात आली. तर घाटेअळीने प्रभावित क्षेत्र ०.६० टक्के (४२.१५९ हेक्टर) असून त्यापैकी ४२ हेक्टरमधील प्रभावित पिकांवर फवारणी करण्यात आल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.प्रभावित क्षेत्रावर प्रश्नचिन्हकृषी विभागाने दिलेल्या अहवालात जे कीड रोगाने ग्रसित क्षेत्र दाखविले आहे, त्याचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले किंवा नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सर्वेक्षण सुरू होण्याच्या पूर्वीच जवळपास ९० टक्के पिकांची कापणी आटोपली होती. शेतकऱ्यांच्या शेतात पीकही नव्हते. शिवाय फवारणी (उपचार) केलेल्या क्षेत्राची संख्या त्यांनी कोणत्या आधारावर दर्शविली, हे सुद्धा सांगायला मार्ग नाही. त्यामुळे कृषी विभागाने आपल्या अहवालात जी संख्या दर्शविली आहे, त्यातील सत्यतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.