शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

यंदा १.९० लाख हेक्टरवर खरिपाची लागवड

By admin | Updated: May 10, 2014 00:18 IST

गोंदिया कृषी विभागाने सन २०१४-१५ च्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील जमिनीच्या क्षेत्रनिहाय विविध पिकांच्या लागवडीसाठी नियोजन केले आहे.

 देवानंद शहारे - गोंदिया

कृषी विभागाने सन २०१४-१५ च्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील जमिनीच्या क्षेत्रनिहाय विविध पिकांच्या लागवडीसाठी नियोजन केले आहे. यात भातपिकाचे सरासरी क्षेत्र १ लाख ८४ हजार ९०० हेक्टर असून इतर पिकांचे मिळून यंदाचे नियोजित लागवड क्षेत्र एक लाख ९० हजार हेक्टर राहणार आहे. कृषी अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन २०१४-१५ च्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील विविध पिकांसाठी सरासरी क्षेत्र व नियोजित क्षेत्रांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शेतकर्‍यांना अनुदानाच्या विविध योजना १६ मे नंतर कृषी विभागाला उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात तूर पिकासाठी सरासरी क्षेत्र ५३१० हेक्टर असून ७४०० हेक्टर क्षेत्र त्यासाठी नियोजित करण्यात आले आहे. मूंग पिकाचे सरासरी क्षेत्र ६० हेक्टर असून यंदाचे नियोजित क्षेत्र १०० हेक्टर आहे. उडीद पिकाचे सरासरी क्षेत्र १७० हेक्टर असून यंदाचे नियोजित क्षेत्र १०० हेक्टर आहे. तीळ पिकाचे सरासरी क्षेत्र ११४० असून यंदाचे नियोजित क्षेत्र १२०० हेक्टर आहे. भाजीपाला व इतर पिकांसाठी सरासरी क्षेत्र शून्य आहे तर यंदा १२०० हेक्टर जमिनीत भाजीपाला व इतर पिकांसाठी नियोजन करण्यात आले आहे. ऊसासाठी जिल्ह्यात ३५० हेक्टर क्षेत्र सरासरी असून यंदाचे नियोजित क्षेत्र १२०० हेक्टर आहे. बियाण्यांचेही नियोजनही करण्यात आले असून त्यासंबंधीची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यात गोंदिया तालुक्यासाठी महाबीज ३६५६ क्विंटल व खासगी १७५० क्विंटल असे एकूण ५४०६ क्विंटल बियाणे, तिरोडा तालुक्यासाठी महाबीज ३५६६ क्विंटल व खासगी १७०० क्विंटल असे एकूण ५२५६ क्विंटल, आमगाव तालुक्यासाठी महाबीज ३५४५ क्विंटल व खासगी १६५० क्विंटल असे एकूण ५१९५ क्विंटल बियाणे, गोरेगाव तालुक्यासाठी महाबीज ३०४६ क्विंटल व खासगी १६०० क्विंटल असे एकूण ४६४३ क्विंटल बियाणे, सडक/अर्जुनी तालुक्यासाठी महाबीज ३५५७ क्विंटल महाबीज व खासगी १७५० क्विंटल असे एकूण ५३०७ क्विंटल बियाणे लागणार आहेत. अर्जुनी/मोरगाव तालुक्यासाठी महाबीज ३५४७ क्विंटल व खासगी १७५० क्विंटल असे एकूण ५२९७ क्विंटल बियाणे, सालेकसा तालुक्यासाठी महाबीज ३३५६ क्विंटल व खासगी १५०० क्विंटल असे एकूण ४८९५ क्विंटल बियाणे व देवरी तालुक्यासाठी महाबीज ३३५६ क्विंटल व खासगी १६३५ क्विंटल असे एकूण ४९९१ क्विंटल बियाण्यांची मागणी तालुकानिहाय करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांसाठी महाबीज २७६६५ क्विंटल व खासगी १३३३५ क्विंटल असे एकूण ४१ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.