शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

कन्यादान व शुभमंगल निधीत वाढ करणार

By admin | Updated: May 9, 2015 23:52 IST

पैशाची मोठ्या प्रमाणात बचत करण्यासाठी आणि समाजात एकोपा वाढीसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणे ...

पालकमंत्री बडोले : आदिवासी हलबा-हबली सामूहिक विवाह सोहळा, ३३ जोडपी विवाहबद्धगोंदिया : पैशाची मोठ्या प्रमाणात बचत करण्यासाठी आणि समाजात एकोपा वाढीसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणे काळाची गरज आहे. आदिवासींच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. सामाजिक न्याय विभाग अशाप्रकारच्या विवाह सोहळ्याला प्रोत्साहन देणार असून कन्यादान व शुभमंगल योजनेंतर्गत लाभार्थ्यांला देण्यात येणाऱ्या निधीत २५ हजार रुपयापर्यंत वाढ करणार, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील कुंभीटोला (बाराभाटी) येथे रविवारी हलबा-हलबी संघटनेच्या वतीने हलबी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या वेळी ते मुख्य अतिथी म्हणून मार्गदर्शन करीत होते.याप्रसंगी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष श्रावण राणा, माजी आ. रामरतन राऊत, दयाराम कापगते, पंचायत समितीचे सभापती तानेश ताराम, उपसभापती पोमेश रामटेके, जिल्हा परिषद सदस्य सुरेखा नाईक, डॉ. नामदेव किरसान, भागवत नाकाडे, डॉ. गजानन डोंगरवार, नामदेव कापगते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.सदर सामूहिक विवाह सोहळ्यात ३३ जोडपी विवाहबद्ध झाली. विवाहबद्ध होणाऱ्या जोडपण्यांना मान्यवरांनी आशीर्वाद दिले. २० हजार वऱ्हाड्यांची सामूहिक विवाह सोहळ्याला उपस्थिती होती. ना. बडोले पुढे म्हणाले, लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेले घर खरेदी करण्याची प्रक्रिया या महिन्यात पूर्ण होणार आहे. जिल्ह्यात लवकरच धान खरेदीचे केंद्र सुरू करण्यात येतील. कुंभीटोला येथे आदिवासी समाज भवनासाठी १० लाखांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही ते म्हणाले.या वेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते नवदाम्पत्यांना भेटवस्तू देऊन आशीर्वाद दिले. तसेच दहावी व बारावीच्या परीक्षेत अव्वल आलेल्या हलबा-हलबी समाजातील विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक तानेश ताराम यांनी, संचालन व आभार मोहन नाईक यांनी मानले. कार्यक्रमासाठी आदिवासी हलबा-हबली सामूहिक विवाह सोहळा संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)