शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
8
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
9
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
10
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
11
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
12
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
13
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
14
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
15
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
16
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
17
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
18
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
19
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
20
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी

जिल्ह्यात उन्हाने केला कहर

By admin | Updated: May 15, 2017 00:15 IST

सूर्य आता आपला प्रकोप दाखवू लागला असून त्यामुळेच जिल्हयाचे तापमान आता ४२ डिग्रीच्यावर गेल्याची नोंद घेतली जात आहे

तापमान ४२ डिग्रीवर : आणखीही वाढण्याची शक्यता लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : सूर्य आता आपला प्रकोप दाखवू लागला असून त्यामुळेच जिल्हयाचे तापमान आता ४२ डिग्रीच्यावर गेल्याची नोंद घेतली जात आहे. मे महिन्यात सर्वाधिक उन्ह तापते. या उन्हामुळे जीव आता कासावीस होऊ लागला असून कधी उन्हाळ््यापासून सुटका मिळते याची वाट सर्वच बघू लागले आहेत. मात्र मे महिना आता जेमतेम अर्ध्यातच आला असून उरलेल्या या १५ दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता टाळता येत नाही. निसर्गाने उन्हाळा, हिवाळा व पावसाळा असे तीन ऋतूंचे चक्र बांधून दिले आहे. मात्र मानवाने आपल्या स्वार्थासाठी निसर्ग नियम धाब्यावर बसविले. याचा ऋतुचक्र व निसर्गावर परिणाम पडत आहे. झाडांची कत्तल व सिमेंट कॉंक्रीटचे जंगल आज निगर्साला मारक ठरत असून याचाच परिणाम आहे की पावसाळ््यात पाऊस पडत नसून उन्हाळ््यात सूर्य आग ओकू लागला आहे. हेच कारण आहे की, पूर्वी कधीही ४५ डिग्रीपर्यंत न जाणारे तापमान आता ४५ डिग्रीच्या पार जात असून तापमानाची ही पातळी वर्षानुवर्षे वाढतच जाणार आहे. यंदाही असाच काहीसा प्रकार जाणवू लागला आहे. यंदा मार्च व एप्रिल महिन्यापासूनच सूर्याने आग ओकली. त्यात आता मे महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून जिल्हावासीयांना चटका देण्यास सुरूवात केली. मे महिन्यात सुरूवातीपासूनच ४२ डिग्रीच्यावर तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उन्हाळ््यात मे महिनाच खरा मानला जातो. मे महिन्यातच सूर्य आग ओकत असल्याचेही बोलले जाते. तोच प्रकार सध्या बघावयास मिळत आहे. दिवसेंदिवस तापमान वाढत चालल्याने आता कधी या उन्हापासून सुटका मिळते असे सवर्च बोलू लागले आहेत. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून कधी पाऊस बरसून उकाड्यापासून एकदाची सुटका करतो याची सर्वच वाट बघत आहेत.