शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
4
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
5
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
6
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
7
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
9
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
10
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
11
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
13
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
14
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
15
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
16
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
17
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
18
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
19
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
20
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...

ज्योती, नेहा ठरल्या वक्तृत्व करंडकाच्या मानकरी

By admin | Updated: January 8, 2016 02:26 IST

जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत वरिष्ठ महाविद्यालय गटातून सडक-अर्जुनी येथील राजीव गांधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी ज्योती आसाराम नंदेश्वर ...

गोंदिया : जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत वरिष्ठ महाविद्यालय गटातून सडक-अर्जुनी येथील राजीव गांधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी ज्योती आसाराम नंदेश्वर तर कनिष्ठ महाविद्यालय गटातून सरस्वती विद्यालय अर्जुनी मोरगावची नेहा भास्कर कापगते प्रथम आली. त्यांची राज्यस्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. दोन्ही विद्यार्थिनींना प्रत्येकी ११ हजाार रुपयांचे पारितोषिक घोषित करण्यात आले.पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद गोंदियातर्फे स्थानिक स्व. वसंतराव नाईक जिल्हा परिषद सभागृहात मंगळवारी (दि.५) स्पर्धा पार पडली. स्पर्धेत जिल्ह्यातील आठ तालुक्यातील २८ विद्यार्थी सहभागी झाले. याच स्पर्धेत वरिष्ठ महाविद्यालय गटातून तिरोडा येथील सी.जे. पटेल महाविद्यालयाची विद्यार्थिनी सुनिता चौधरी द्वितीय तर न.मा.द. महाविद्यालयाची विद्यार्थिनी शीतल मांदाडे तृतीय पुरस्काराची मानकरी ठरली. कनिष्ठ महाविद्यालय गटातून अरुणनगर येथील नूतन कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी चंपा परिमल विश्वास द्वितीय तर देवरी येथील मनोहरभाई पटेल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी हेमकृष्ण प्रेमलाल पिसदे तृतीय पुरस्काराचा मानकरी ठरला. त्यांना अनुक्रमे सात व पाच हजार रुपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वक्ततृव करंडक स्पर्धेतील सर्वच विजेत्या विद्यार्थ्यांचे लवकरच जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते धनादेश, मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर दोन्ही गटातून प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना शासन निर्णयाप्रमाणे साधन व्यक्तींचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.ए. देशमुख तथा जिल्हा क्रीडा अधिकारी गिरी, प्रा. डॉ. चंद्रकुमार राहुले, माजी प्राचार्य तथा सामाजिक कार्यकर्ते माणिक गेडाम, विधी विभागाचे विभागप्रमुख अ‍ॅड. सुयोग इंगळे, झामेश ठाकरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. संचालन माहिती, शिक्षण व संवाद तज्ज्ञ अतुल गजभिये यांनी केले. कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे अधीक्षक एच.व्ही. गौतम, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जितेंद्र येरपुडे, शालेय स्वच्छता तज्ज्ञ भागचंद रहांगडाले, क्षमता बांधणी तज्ज्ञ देवानंद बोपचे, समाजशास्त्र तज्ञ दिशा मेश्राम, माहिती, शिक्षण व संवाद तज्ज्ञ राजेश उखळकर, स्वच्छता तज्ज्ञ सूर्यकांत रहमतकर, पाणी गुणवत्ता तज्ज्ञ मुकेश त्रिपाठी, सनियंत्रण व मूल्यमापन तज्ज्ञ विशाल मेश्राम, शोभा फटिंग, मनुष्यबळ विकास तज्ज्ञ तृप्ती साकुरे, वित्त व संपादणूक अधिकारी छाया शहारे, सचिन रोडी, रमेश उदयपुरे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)