शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

आठ वर्षांत केवळ ३४ अनुकंपाधारकांना नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 22:34 IST

कधी नोकरभरतीवर बंदी तर कधी शासनाच्या दप्तर दिंरगाईचा फटका अनुकंपधारक उमेदवारांना बसत आहे.

ठळक मुद्देमाहितीच्या अधिकारांतर्गत उघड : वयोमर्यादेमुळे अनेकांचे स्वप्न भंगणार

आॅनलाईन लोकमतगोंदिया :कधी नोकरभरतीवर बंदी तर कधी शासनाच्या दप्तर दिंरगाईचा फटका अनुकंपधारक उमेदवारांना बसत आहे. मागील आठ वर्षांत जिल्ह्यातील ३५० अनुकंपाधारक उमेदवारांपैकी केवळ ३४ उमेदवारांना शासकीय सेवेत सामावून घेतल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातंर्गत मागविलेल्या माहितीतून उघडकीस आली आहे.शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाºयांचे आकस्मिक किंवा अपघाती निधन झाल्यास त्यांच्या परिवारातील एका सदस्याला अनुकंपातत्त्वावर शासकीय सेवेत सामावून घेतले जाते. शासनाने तसा नियम तयार केला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अनुकंपाधारक उमेदवारांची लांबलचक यादी आहे. मागील आठ वर्षांत केवळ ३४ अनुकंपाधारक उमेदवारांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात आले. परिणामी अनुकंपाधारक उमेदवारांच्या यादीत वाढ होत आहे. एकट्या गोंदिया जिल्ह्यात २००८ पासूनचे ३५० अनुकंपाधारक उमेदवार असून यापैकी मागील आठ वर्षांत केवळ ३४ उमेदवारांना संधी देण्यात आली. जिल्ह्यात एकूण अनुकंपाधारक उमेदवार किती आहेत, यापैकी किती उमेदवारांंना शासकीय सेवेत सामावून घेण्यात आले, किती अनुकंपाधारक वयोमर्यादेमुळे बाद झाले. याची सविस्तर माहिती जिल्हा अधिकारी आणि जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाकडून माहितीच्या अधिकारातंर्गत एका उमेदवारांने मागविली. सुरूवातीला मात्र प्रशासनाने माहिती देण्यास टाळटाळ केली. त्यानंतर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने माहिती दिली. त्यात मागील आठ वर्षांत केवळ ३४ उमेदवारांना शासकीय सेवेत सामावून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ४५ अनुकंपाधारक उमेदवार वयोमर्यादेमुळे बाद झाले. विशेष म्हणजे या यादीत चालु वर्षांत अनुकंपाधारक उमेदवारांच्या संख्येत किती वाढ झाली ही माहिती देणे टाळले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनुकंपाधारक उमेदवारांचा आकडा ३५० हुन अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या उमेदवारांकडे शासकीय नोकरीकरिता सर्व शैक्षणिक अर्हता, तसेच पदभरतीच्या वेळेस आवश्यक असलेली पात्रता असून देखील त्यांना प्रत्येक वेळेस डावलले जाते.शासकीय विभागाकडे जेव्हा हे उमेदवार एखादी माहिती विचारण्यासाठी जातात तेव्हा त्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जाते. आधीच कुटुंबातील कर्ता पुरूष गेल्याने कुटुंबीय कसे बसे जीवन जगत आहे. त्यात अनुकंपातत्वावर नोकरी मिळाली तर कुटुंबावरील आर्थिक संकट दूर होईल, या अपेक्षेने हे उमेदवार शासकीय कार्यालयाच्या पायºया झिजवित आहेत. मात्र निगरगट्ट प्रशासनाला अद्यापही त्यांच्या परिस्थितीची जाणीव झालेली नाही.स्वबळावर नोकरी लागल्यास लाभ नाहीअनुकंपाधारक उमेदवाराच्या कुटुंबातील एखादा सदस्य स्वबळावर नोकरीवर लागला. तर त्याच्या कुटुंबातील अन्य सदस्याला अनुकंपातत्त्वावर शासकीय सेवेत सामावून घेतले जाणार नाही. असा अजब फतवा येथील जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. त्याचा देखील फटका या उमेदवारांना बसत आहे.शैक्षणिक अर्हता लपविण्याचा प्रयत्नअनेक अनुकंपाधारक उमेदवार पदवी, पदव्युत्तर आहेत. त्यांनी वेळोवेळी संबंधीत विभागाकडे जावून शैक्षणिक अहर्तेची माहिती अपडेट केली आहे. त्याचे पुरावे देखील अनुकंपाधारक उमेदवारांकडे आहे. मात्र सामान्य प्रशासन विभागाकडून त्यांची माहिती अपडेट करण्याऐवजी स्नातक उमेदवाराला बारावी अनुउर्तीण दाखवून अपात्र ठरविण्याचा प्रकार सुरू केला आहे. ही बाब सुध्दा माहितीच्या अधिकारातंर्गत पुढे आली आहे.४५ बाद तर ३० पुन्हा मार्गावरअनुकंपाधारक उमेदवारांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी शासनाने ४५ वर्षे वयोमर्यादा निश्चित केली आहे. मात्र शासकीय दप्तर दिंरगाई आणि सरकारच्या धोरणामुळे मागील आठ ते दहा वर्षांपासून अनुकंपाधारक उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. ३५० पैकी ४५ अनुकंपाधारक उमेदवार वयोमर्यादेमुळे बाद झाले. येत्या दोन महिन्यात नोकर भरती न झाल्यास पुन्हा ३० उमेदवार वयोमर्यादेमुळे बाद होणार आहेत.जिल्ह्यातील अनुकंपाधारक उमेदवारांच्या समस्यांची जाणीव शासनाला व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यापासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत मागील दहा वर्षांत अनेकदा पाठपुरावा केला. मात्र याचा निगरगट्ट प्रशासनावर कुठलाही परिणाम झालेला नाही.- संजय हत्तीमारे,अध्यक्ष गोंदिया जिल्हा अनुकंपाधारक संघर्ष समिती.