शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

११ हजार ५१८ पर्यटकांची अभयारण्यात जंगल सफारी

By admin | Updated: July 9, 2014 23:35 IST

जंगलात गेले आणि वाघ दिसला नाही तर पर्यटकांचा ‘मूड आॅफ’ होतो. कित्येकदा गेल्यानंतर कधीतही एखाद्या वेळी वाघोबांचे दर्शन होते व तो प्रसंग जीवनातला अविस्मरणीय प्रसंग ठरतो.

गोंदिया : जंगलात गेले आणि वाघ दिसला नाही तर पर्यटकांचा ‘मूड आॅफ’ होतो. कित्येकदा गेल्यानंतर कधीतही एखाद्या वेळी वाघोबांचे दर्शन होते व तो प्रसंग जीवनातला अविस्मरणीय प्रसंग ठरतो. मात्र यंदाचा उन्हाळा जंगल सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांना आंबड व गोड अशा आठवणींचा ठरला. अनेकांना वाघोबा व अन्य प्राण्यांचे दर्शन झाले. सुट्यांचा आनंद लुटण्यासाठी यंदा मार्च, एप्रिल व मे या मुख्य तीन महिन्यांत ११ हजार ५१८ पर्यटकांनी जंगलसफारी केली. यातून वन विभागालाही सुमारे तीन लाख ९१ हजार रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.आजच्या स्थितीत सिमेंट कॉंक्रीटच्या जंगलात राहून नागरीक वैतागले असून त्यांचा कल आता निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी वळत आहे. त्यामुळे हौसी लोकं आपल्या सुट्यांचा आनंद लुटण्यासाठी आता अभयारण्यांकडे वळू लागले आहेत. त्यातच नागझिरा आता व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित झाल्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची ख्याती वाढली आहे. शिवाय विविध प्रजातींच्या देशी-विदेशी पक्ष्यांचे वस्तीस्थान असलेल्या नवेगाव अभयारण्याचेही यात वेगळेच महत्व आहे. जिल्ह्याला लाभलेले देवाचे हे दोन वरदान म्हणूनच त्यांची ओळख आहे. फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाळ््याची चाहुल लागताच जंगल सफारीचा सिजन सुरू होतो. उन्हाळ््याचे मार्च, एप्रिल व मे हे तीन महिनेच जंगल सफारीसाठी महत्वाचे मानले जातात व या काळातच सर्वाधीक पर्यटक अभयारण्यांना भेट देण्यासाठी निघतात. जवळील चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील कान्हा केसलीसह जिल्ह्यातील नागझीरा व नवेगाव अभयारण्य देशाच्या नकाशात ख्याती प्राप्त आहे. यामुळे मोठ्या संख्येत पर्यटकांची धाव याकडे असते. त्यात नागझिरात वाघोबाचे वास्तव्य असल्याने दूरवरून पर्यटक नागझिराला भेट देतात. मात्र प्रत्येकालाच वाघोबाचे दर्शन होणार असे नाही. कित्येकांना तर हरीण, रान रेडे, मोर यासारख्या वन्यप्राण्यांवरच समाधान मानून परतावे लागते. पर्यटकांच्या आगमनाने वन विभागाचेही चांगलेत फावले. मार्च, एप्रिल व मे या तीनही महिन्यांची बेरीज केल्यास ११ हजार ५१८ पर्यटकांनी जंगल सफारी केली असून यासाठी १८४५ वाहनांनी जंगलात प्रवेश केला होता. अशाप्रकारे वाहन व पर्यटकांकडून वन विभागाला सुमारे तीन लाख ९१ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ते काही असो, पर्यटक आले व त्यांनी जिल्ह्यातील अभ्यारण्यांत येऊन आनंद लुटला. यात कित्येकांना वाघोबा व अन्य वन्य प्राणी दिसले. कित्येकांनी त्यांच्या जिवनातला हा क्षण क्लीक करून आठवणी सोबत नेल्या. हीच बाब येथील वन व वन्यजीव सृष्टीसाठी महत्वाची आहे. (शहर प्रतिनिधी)