शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सुरू झाली जंगल सफारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:21 IST

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ऐन हंगामात बंद पडलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला जिल्ह्यातील सुरळीत परिस्थिती बघता खुले करण्यास परवानगी ...

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ऐन हंगामात बंद पडलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला जिल्ह्यातील सुरळीत परिस्थिती बघता खुले करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, शनिवारपासून (दि.२६) व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी करता येणार आहे. मात्र येत्या ३० तारखेपर्यंतच व्याघ्र प्रकल्पाला परवानगी देण्यात आली असून यातही कोरोना नियमांचे पालन करणे सक्तीचे राहणार आहे.

मागील वर्षी कोरोनामुळे मार्च महिन्यात लॉकडाऊन झाले होते. परिणामी मागील वर्षी वनपर्यटनाच्या मुख्य हंगामातच व्याघ्र प्रकल्प बंद करावे लागले होते. आता यंदा मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केल्याने दुसऱ्यांदा लॉकडाऊन करावा लागला. यामुळे यंदाही ऐन हंगामातच व्याघ्र प्रकल्प बंद करण्यात आले होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून परिस्थिती नियंत्रणात येत आहे. विशेष म्हणजे, अवघ्या राज्यात गोंदिया जिल्ह्यातील पॉझिटिव्ही रेट सर्वांत कमी आहे. परिणामी शासनाने व्याघ्र प्रकल्पांना खुले करण्यास परवानगी दिली आहे. शनिवारपासून (दि.२६) नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी खुले होणार असून पर्यटकांना जंगल सफारीचा आनंद लुटता येणार आहे. मात्र, ही मजा फक्त येत्या ३० जूनपर्यंतच घेता येणार आहे. त्यातही कोरोना नियमांचे सक्तीने पालन करावयाचे आहे. आता मान्सून सुरू झाला असून जंगलात प्रवेशबंदी असते. त्यात आता ५ दिवसांची सूट मिळाली असल्याने तेवढा तरी दिलासा मिळाला असेच म्हणता येईल व पर्यंटकांना एक संधी यातून मिळाली आहे.

-------------------------------

या अटींचे पालन करणे बंधनकारक

व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या व्यक्तींची थर्मल स्कॅनिंग करणे आवश्यक राहील व प्रवेश देताना सॅनिटायझरची व्यवस्था करावी लागेल. प्रत्येकाला मास्क लावावा लागणार आहे. वाहन क्षमतेच्या ५० टक्के एवढ्यात पर्यटकांना प्रवेश देण्यात येईल. जिप्सीत ४ व्यक्तींना तसेच एकाच कुटुंबातील असल्यास ६ व्यक्तींना (चालक व मार्गदर्शक वगळून) प्रवेश दिला जाईल. खासगी चारचाकी (लहान) वाहनांत २ पर्यटक तर मोठ्या वाहनांत ४ पर्यटकांनाच (चालक-मार्गदर्शन वगळून) प्रवेश दिला जाणार आहे. याशिवाय वनविभागाने घातलेल्या अटींचा काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.