शहरं
Join us  
Trending Stories
1
"३१ हजार कोटींच्या पॅकेजचे समर्थन करायला तयार, पण माझी एक अट", उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मोठी मागणी
2
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
3
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
4
Shubman Gill Record : टीम इंडियातील 'प्रिन्स'ची कमाल; क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'चा महारेकॉर्ड मोडला
5
"लोकसभा निवडणुकीत भुमरेंनी माझ्या विरोधात १२० कोटी वाटले, शेतकऱ्यांना दारू पाजून...!" खैरेंचा गंभीर आरोप
6
जे पेरले तेच उगवले! पाकिस्तानी लष्कराचा लाड त्यांच्याच अंगलट आला; 'तहरीक-ए-लब्बैक' संघटनेने डोकेदुखी वाढवली
7
सचिन तेंडुलकरची साद, माणिकराव कोकाटेंचा तत्काळ प्रतिसाद; खेळाडूंसाठी घेतला मोठा निर्णय
8
E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...
9
झाड नाही, 'काळजाचा तुकडा' तोडला! २० वर्षे जपलेल्या वृक्षासाठी आजींचा आक्रोश; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
10
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
11
“हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
12
अनिल अंबानी ग्रुपच्या CFO ला अटक; बनावट बँक हमी प्रकरणात ED ची मोठी कारवाई
13
ग्रामीण भारताचा विकास करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथि; त्यांच्या कार्याचा आढावा!
14
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांची प्रकृती स्थिर, पण दुसऱ्यांची किडनी घेण्यासाठी नकार; कारण... 
15
मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू
16
तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
17
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
18
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
19
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
20
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या

मध्यस्थी प्रक्रियेमुळे लवकर न्याय- त्रिवेदी

By admin | Updated: September 26, 2015 01:55 IST

मध्यस्थी प्रक्रियेमुळे पक्षकारांचा पैसा व वेळ वाचतो. परस्परांशी संबंध चांगले राहतात. वर्षानुवर्षे न्यायालयात प्रकरणे चालविण्यापेक्षा ...

गोंदिया : मध्यस्थी प्रक्रियेमुळे पक्षकारांचा पैसा व वेळ वाचतो. परस्परांशी संबंध चांगले राहतात. वर्षानुवर्षे न्यायालयात प्रकरणे चालविण्यापेक्षा मध्यस्थी प्रक्रियेमुळे लवकर न्याय मिळतो, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश तथा अतिरीक्त सत्र न्यायाधीश एस.आर. त्रिवेदी यांनी केले. जिल्हा न्यायालयात जिल्हा मध्यस्थी केंद्राच्या वतीने मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन न्यायाधीश त्रिवेदी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हा मध्यस्थी केंद्राचे समन्वयक न्या. पी.एच. खरवडे, जिल्हा सरकारी वकील वीणा बाजपेई, जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. राजकुमार बोंबार्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. न्या.खरवडे म्हणाले, न्यायालयात दाखल असलेल्या प्रकरणांत विविध तांत्रिक अडचणी येतात. त्यामुळे न्यायालयीन प्रकरणे लवकर निकाली निघत नाही. ही प्रकरणे मध्यस्थीकरिता पाठवून लवकरात लवकर निकाली काढता येत असल्याचे त्यांनी सांगितले. अ‍ॅड. बांबोर्डे म्हणाले, मध्यस्थीने प्रकरण निकाली काढण्याकरिता पक्षकारांनी आपली मानसिकता तयार केली पाहिजे. वकिलांनी पक्षकारांची प्रकरणे मध्यस्थीकरिता ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे सांगितले. प्रास्ताविकातून अ‍ॅड. बाजपेई यांनी मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमामागील भूमिका विशद केली. याप्रसंगी जिल्हा न्यायालयाच्या व्यवस्थापक नलिनी भारद्वाज, जिल्हा वकील संघाचे सचिव अ‍ॅड.आर.जी. राय, वकील संघाचे पदाधिकारी, नमाद महाविद्यालयाच्या विधी विभागाचे विद्यार्थी, न्यायालयीन कर्मचारी वर्ग उपस्थित होते.