शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, पोलीस तपासात संतापजनक प्रकार उघड
5
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
6
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
7
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
8
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
9
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
10
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
11
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
12
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
13
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
14
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
15
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
16
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
17
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
18
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
19
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
20
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी

ग्राहक न्यायमंच दिला शेतकऱ्यांच्या विधवांना न्याय

By admin | Updated: December 3, 2014 22:52 IST

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोन शेतकऱ्यांच्या विधवांचे विमा दावे नाकारणाऱ्या आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल विमा कंपनीला झटका देत ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने दोन्ही महिलांना न्याय दिला.

गोंदिया : अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोन शेतकऱ्यांच्या विधवांचे विमा दावे नाकारणाऱ्या आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल विमा कंपनीला झटका देत ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने दोन्ही महिलांना न्याय दिला. दोन्ही प्रकरणात दोन्ही विधवांना प्रत्येकी एकेक लाख रूपये दरसाल दरशेकडा ८ व ९ टक्के व्याजाने द्यावे, असा आदेश न्यायमंचाने सदर विमा कंपनीला दिला.अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी येथील शेतकरी अनिल शालिकराम खोब्रागडे यांचा काळी-पिवळीने प्रवास करीत असताना ट्रकने दिलेल्या धडकेत २३ सप्टेंबर २००५ रोजी मृत्यू झाला. तर आमगाव तालुक्यातील सीतेपार येथील शेतकरी उमेदलाल गौंदन बिसेन हे आपल्या मित्राच्या दुचाकीवर मागे बसून जात असताना दुचाकीला झालेल्या अपघातात १६ मार्च २००६ रोजी त्यांचा मृत्यू झाला. दोन्ही मृतक शेतकऱ्यांची अपघात विमा पॉलिसी आयसीआयसीआय लोंबार्ड विमा कंपनीकडे होती. त्यामुळे दोन्ही शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी किरण अनिल खोब्रागडे व निर्मला उमेदलाल बिसेन यांनी सदर विमा कंपनीकडे प्रत्येकी एकेक लाख रूपये विमा दावा, नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्यासाठी रितसर अर्ज केला. परंतु सदर कंपनीने विमा दावे निकाली काढण्यात कुचराई केल्यामुळे त्यांनी ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात धाव घेवून तक्रार दाखल केली. यानंतर न्यायमंचाने सदर विमा कंपनीला नोटीसेस बजावले. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपले लेखी जबाब दाखल केले. यात पहिल्या प्रकरणात कागतपत्रे न मिळाल्याने व तक्रार मुदतबाह्य असल्यामुळे तर दुसऱ्या प्रकरणात मद्यधुंद अवस्थेत निष्काळजीपणे दुचाकी चालविल्याने अपघात घडल्याचे सांगून दावा फेटाळल्याचे सांगितले. यावर तक्रारकर्त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला व त्यावर न्यायमंचाने कारणमिमांसा केली.पहिल्या प्रकरणात विधवा किरण खोब्रागडे यांनी साकोली पोलीस ठाण्यातून घटनास्थळ पंचनामा व उत्तरीय तपासणी अहवाल सादर केल्याने मृत्यू अपघाताने झाल्याचे सिद्ध झाले. तसेच तिने विमा कंपनीला वकिलामार्फत पाठविलेली नोटीस व रजिस्टर्ड पोस्टाच्या पावत्या यावरून तिने वारंवार विनंती करूनही विमा कंपनीने दावा निकाली न काढल्याचे सिद्ध झाले. तर दुसऱ्या प्रकरणात विधवा निर्मला बिसेन यांनी आमगाव पोलिसांचा घटनास्थळ पंचनामा, अपघातात पतीच्या डोक्याला मार लागून मृत्यू झाल्याचे ठाण्यातील पब्लिक डाक्युमेंटवरून व उत्तरीय तपासणी अहवालावरून सिद्ध झाले. तसेच दोन्ही तक्रारकर्त्यांच्या वकिलाने दोन्ही प्रकरणात राष्ट्रीय आयोग नवी दिल्लीच्या लक्ष्मीबाई विरूद्ध आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल विमा कंपनीच्या न्यायनिवाड्याचा दाखला दिला. या सर्व बाबींची ग्राहक न्यायमंचाने कारणमिमांसा करून दोन्ही विधवा महिलांची तक्रार अंशत: मान्य केली. दोन्ही प्रकरणातील मृतक शेतकऱ्यांच्या विधवांना शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचे प्रत्येकी एकेक लाख रूपये तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून त्यांना मिळेपर्यंत दरसाल दरशेकडा ८ व ९ टक्के व्याजाने द्यावे. दोन्ही विधवांना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून प्रत्येकी १०-१० हजार रूपये व तक्रारीचा खर्च म्हणून प्रत्येकी पाच-पाच हजार रूपये ३० दिवसांच्या आत द्यावे, असा आदेश ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल विमा कंपनीला दिला. (प्रतिनिधी)