शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

पत्रकार हा जनता व शासनातील महत्त्वपूर्ण दुवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:32 IST

शासनाच्या लोककल्याणकारी योजना राबवित असताना माध्यमाची भूमिका महत्वाची आहे. सकारात्मकतेने चांगल्या योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यत पोहोचिवण्याचे काम पत्रकाराच्या लेखनीतून होते. म्हणून पत्रकाराला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखले जाते.

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : प्रेस ट्रस्ट आॅफ गोंदियाचा स्थापना दिन सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाच्या लोककल्याणकारी योजना राबवित असताना माध्यमाची भूमिका महत्वाची आहे. सकारात्मकतेने चांगल्या योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यत पोहोचिवण्याचे काम पत्रकाराच्या लेखनीतून होते. म्हणून पत्रकाराला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखले जाते. आज ज्या योजना शासन राबवित आहे, त्याचे प्रचार, प्रसार करण्यात माध्यमानी महत्वपूर्ण भूमिका बजावली असून पत्रकार हा जनता व शासनातील महत्वाचा दुवा आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.कांदबरी बलकवडे यांनी केले.प्रेस ट्रस्ट आॅफ गोंदियाचा तिसरा स्थापना दिन सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता. या वेळी त्या बोलत होत्या. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष अपूर्व मेठी होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे लोकलेखा समितीचे अध्यक्ष व आ.गोपालदास अग्रवाल, जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, माजी जि. प. उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, अदानी प्रकल्पाचे प्रमुख सी.पी.साहू, जि.प.सभापती शैलजा सोनवाने, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, ट्रस्टचे सचिव रवि आर्य, संयोजक संतोष शर्मा उपस्थित होते. कार्यक्र माची सुरु वात दीप प्रज्ज्वलनाने करण्यात आली.याप्रसंगी स्व. अटल बिहारी वाजपेयी, स्व. कुलिदप नैय्यर, माजी खासदार स्व. केशवराव पारधी, शहीद जवान व केरळ येथील पूरपरिस्थतीत मृत्युमुखी पडलेल्यांना दोन मिनिट मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर जिल्हा गौरव सामाजिक सेवा पुरस्काराने डॉ. देबाशिष चटर्जी, जिल्हा गौरव साहित्यरत्न पुरस्काराने उषाकिरण आत्राम, जिल्हा गौरव कृषीरत्न पुरस्काराने मंदाताई गावडकर व देवेंद्र राऊत, जिल्हा गौरव कर्तव्यनिष्ठ पुरस्काराने डॉ.विजय वानखेडे, जिल्हा गौरव आदर्श शिक्षक पुरस्काराने विनोद गहाणे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तर प्रेस ट्रस्टच्या जीवन गौरव पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार रमेशचंद्र दुबे यांना सन्मानित करण्यात आले.या वेळी ट्रस्टच्या सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.यामध्ये वेदांत मेठी, ओम ताजणे, करिना राऊत, तेजिस्वनी शर्मा यांचा समावेश आहे. उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून प्रेस ट्रस्ट आॅफ गोंदियाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. माध्यमांची भूमिका, कर्तव्य आणि माध्यमांपासून नागरिकांच्या अपेक्षा यावर विचार व्यक्त केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्र माचे संचालन ट्रस्टचे उपाध्यक्ष जयंत शुक्ला, प्रास्ताविक संतोष शर्मा व आभार रवि आर्य यांनी केले. कार्यक्र माच्या यशस्वीतेसाठी हिदायत शेख, राहूल जोशी, अंकुश गुंडावार, कपिल केकत, हरिंद्र मेठी, उदय चक्र धर, दत्तात्रय दलाल, मुकेश शर्मा, आशिष वर्मा, नरेश रहिले, बिरला गणवीर, नरेंद्र सिंद्रामे, जावेद खान, अर्चना गिरी, प्रमोद नागनाथे, भरत घासले, योगेश राऊत, दीपक जोशी, मोहन पवार यांनी सहकार्य केले.केरळ आपदाग्रस्तांना ११ हजाराची मदतकेरळ येथे आलेल्या पुरामुळे मोठी आपदा निर्माण झाली आहे. अशा वेळी केरळवासीयांना मदत म्हणून ट्रस्टच्या वतीने ११ हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ.कांदबरी बलकवडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल