शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

जिजाऊ आरोग्य व पोषण मिशनचा बट्ट्याबोळ

By admin | Updated: September 9, 2014 23:35 IST

काही वर्षांपासून शासनाच्या वतीने ग्राम बालविकास केंद्र तसेच राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियान राबविण्यात येत आहे, परंतु सालेकसा तालुक्यात या अभियानाचा फारसा उपयोग न झाल्यामुळे मार्च ते जुलै

नामदेव हटवार - सालेकसाकाही वर्षांपासून शासनाच्या वतीने ग्राम बालविकास केंद्र तसेच राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियान राबविण्यात येत आहे, परंतु सालेकसा तालुक्यात या अभियानाचा फारसा उपयोग न झाल्यामुळे मार्च ते जुलै २०१४ मध्ये प्रत्येक महिन्यात जवळपास १ हजार ते १२०० पर्यंत कमी वजनाची बालके दिसून येत आहेत. यावरुन एकात्मिक बाल व महिला प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी वर्गाकडून योग्य नियोजन व काम होत नसल्याचे दिसून येत आहे. सालेकसा तालुक्यात प्रत्येक महिन्यात कुपोषणाची स्थिती आढळून आलेली आहे. जुलै महिन्यात ० ते ६ वर्ष वयोगटातील ८०१७ बालकांपैकी ६७४९ बालके साधारण श्रेणीत होती. ९५५ बालके कमी वजनाची तर १८७ बालके ही तीव्र कुपोषीत होती. तालुक्यातील सर्वच बिटमध्ये कमी वजनाची बालके भरपूर प्रमाणात आढळून येत आहेत. काही बिटांचा सर्वे केला असता ही बाब प्रकर्षाने दिसून आली. शासनाने महाराष्ट्राची भावी पिढी सुदृढ, निरोगी व बुद्धीवान होण्यासाठी व राज्यातील कुपोषन निर्मुलनासाठी विविध मार्गानी प्रयत्न चालविले असूनही अजून लोकांना पहिल्या २ वर्षातील आहाराचे महत्व कळलेले नाही. त्यामुळे कुपोषणाची समस्या अजुनही कायम आहे. त्यात मुख्यालयात पर्यवेक्षिका राहत नसून बाहेरील गावावरुन ये-जा करीत असल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात अंगणवाडीला भेट देणे बालकांची माहिती घेणे जास्त प्रमाणात हात नाही. महिन्याची आकडेवाडी जमा करणे व ती कार्यालयात जमा करणे ही बाब आज नित्यनेमाने सुरु असते. याचाही परिणाम तीव्र कुपोषणावर होऊ शकतो.कुपोषणमुक्त अभियान राबवित असताना प्रत्येक प्रकल्पात सर्वात उत्कृष्ट काम करणाऱ्या फक्त ३ अंगणवाड्यांना पुरस्कार देण्याचे काम राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियानात करण्यात आले होते. पण सालेकसा तालुक्यातील एकही अंगणवाडी मात्र ठरलेली नाही. कुपोषणमुक्त करण्यासाठी राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियानात जे विविध उपक्रम राबविण्यासाठी ज्या सूचना देण्यात आल्यात त्याचा उपयोग महिला व बाल प्रकल्प कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून, पर्यवेक्षिकाकडून होत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी महिलांमध्ये जी जनजागृती व्हायला पाहिजे ती झालेलीच नाही. अंगणवाडी सेविका व मदतगीस आपल्या स्तरावर स्थानिक पातळीवर राहत नाही. त्यामुळे त्यांचा प्रभाव तेवढा पडत नाही.