शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जिजाऊ आरोग्य व पोषण मिशनचा बट्ट्याबोळ

By admin | Updated: September 9, 2014 23:35 IST

काही वर्षांपासून शासनाच्या वतीने ग्राम बालविकास केंद्र तसेच राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियान राबविण्यात येत आहे, परंतु सालेकसा तालुक्यात या अभियानाचा फारसा उपयोग न झाल्यामुळे मार्च ते जुलै

नामदेव हटवार - सालेकसाकाही वर्षांपासून शासनाच्या वतीने ग्राम बालविकास केंद्र तसेच राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियान राबविण्यात येत आहे, परंतु सालेकसा तालुक्यात या अभियानाचा फारसा उपयोग न झाल्यामुळे मार्च ते जुलै २०१४ मध्ये प्रत्येक महिन्यात जवळपास १ हजार ते १२०० पर्यंत कमी वजनाची बालके दिसून येत आहेत. यावरुन एकात्मिक बाल व महिला प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी वर्गाकडून योग्य नियोजन व काम होत नसल्याचे दिसून येत आहे. सालेकसा तालुक्यात प्रत्येक महिन्यात कुपोषणाची स्थिती आढळून आलेली आहे. जुलै महिन्यात ० ते ६ वर्ष वयोगटातील ८०१७ बालकांपैकी ६७४९ बालके साधारण श्रेणीत होती. ९५५ बालके कमी वजनाची तर १८७ बालके ही तीव्र कुपोषीत होती. तालुक्यातील सर्वच बिटमध्ये कमी वजनाची बालके भरपूर प्रमाणात आढळून येत आहेत. काही बिटांचा सर्वे केला असता ही बाब प्रकर्षाने दिसून आली. शासनाने महाराष्ट्राची भावी पिढी सुदृढ, निरोगी व बुद्धीवान होण्यासाठी व राज्यातील कुपोषन निर्मुलनासाठी विविध मार्गानी प्रयत्न चालविले असूनही अजून लोकांना पहिल्या २ वर्षातील आहाराचे महत्व कळलेले नाही. त्यामुळे कुपोषणाची समस्या अजुनही कायम आहे. त्यात मुख्यालयात पर्यवेक्षिका राहत नसून बाहेरील गावावरुन ये-जा करीत असल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात अंगणवाडीला भेट देणे बालकांची माहिती घेणे जास्त प्रमाणात हात नाही. महिन्याची आकडेवाडी जमा करणे व ती कार्यालयात जमा करणे ही बाब आज नित्यनेमाने सुरु असते. याचाही परिणाम तीव्र कुपोषणावर होऊ शकतो.कुपोषणमुक्त अभियान राबवित असताना प्रत्येक प्रकल्पात सर्वात उत्कृष्ट काम करणाऱ्या फक्त ३ अंगणवाड्यांना पुरस्कार देण्याचे काम राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियानात करण्यात आले होते. पण सालेकसा तालुक्यातील एकही अंगणवाडी मात्र ठरलेली नाही. कुपोषणमुक्त करण्यासाठी राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियानात जे विविध उपक्रम राबविण्यासाठी ज्या सूचना देण्यात आल्यात त्याचा उपयोग महिला व बाल प्रकल्प कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून, पर्यवेक्षिकाकडून होत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी महिलांमध्ये जी जनजागृती व्हायला पाहिजे ती झालेलीच नाही. अंगणवाडी सेविका व मदतगीस आपल्या स्तरावर स्थानिक पातळीवर राहत नाही. त्यामुळे त्यांचा प्रभाव तेवढा पडत नाही.