शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

जेठभावडा ग्रामपंचायत व शाळेला आयएसओ मानांकन

By admin | Updated: December 10, 2015 02:02 IST

देवरीसारख्या नक्षलप्रभावित आणि दुर्गम क्षेत्रातील जेठभावडा ग्रामपंचायत आणि तेथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा विदर्भातील पहिली...

विदर्भातील पहिली : जिल्हा परिषदेच्या शाळेचा असाही बहुमानदेवरी : देवरीसारख्या नक्षलप्रभावित आणि दुर्गम क्षेत्रातील जेठभावडा ग्रामपंचायत आणि तेथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा विदर्भातील पहिली आयएसओ मानांकित मानांकित शाळा ठरली आहे. या शाळेला सदर बहुमानाचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.ग्राम पंचायत जेठभावडा ही मागील बऱ्याच वर्षापासून वेगवेगळ्या शासनाच्या स्पर्धेत सहभाग घेत आहे. हे गाव अतिदुर्गम आणि नक्षल्यांच्या प्रभावक्षेत्रात आहे. विशेष म्हणजे १०० टक्के आदिवासी समाज असणाऱ्या या गावात सन २००६-०७ या वर्षी जलस्वराज्य प्रकल्प यशस्वीरित्या राबविण्यात आला होता. २००७ मध्ये निर्मल ग्राम योजनेमार्फत १०० टक्के हागणदारीमुक्त गाव म्हणून या गावाला तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या हस्ते ग्रामपंचायतला २ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले होते. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये दोन वेळा तालुकास्तरावर प्रथम तर सन २०१३-१४ मध्ये जिल्हास्तरावर या ग्रामपंचायतला तृतीय पुरस्कार मिळाला आहे. विविध उपक्रम राबवत असताना गावचे सरपंच डॉ.जे.टी.रहांगडाले हे खूप हिरीरीने भाग घेत असतात. उपसरपंच भोजराज गावडकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर गावडकर, पोलीस पाटील राजेंद्र गावडकर, ग्रा.पं.सदस्य गोपाल कुंभरे, किरसान, शिला गावडकर, कल्पना गावडकर, शहारे तसे चपराशी व शाळेचे मुख्याध्यापक किशोर गर्जे, विनोद मेश्राम, सदस्य अशोक धानगुण, छाया धुर्वे, कांता देहारी, भागवत धानगुन व इतर ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हे उपक्रम राबविले जात आहेत. आयएसओ मानांकनामुळे ग्रामपंचायत व शाळेच्या उपक्रमांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.उपक्रमशील शाळा आणि शिक्षकयेथे असणारी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा ही १ ते ४ वर्गापर्यंत असून त्यात शिकणारे २८ विद्यार्थी १०० टक्के आदिवासी आहेत. या शाळेला मागील काही वर्षात शासनाचे वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये सन २००५-०६ व २००७-०८ मध्ये साने गुरूजी तालुकास्तरिय प्रथम पुरस्कार, तसेच सन २०१३-१४ गाशाआशा तालुकास्तरीय प्रथम तर सन २०१३-१४ मध्ये जिल्हास्तरीय साने गुरूजी प्रथम पुरस्कार मिळाला आहे. जिल्ह्यातील ही पहिली वीज बिल मुक्त शाळा असून येथे सौर उर्जेचा व पवन चक्कीचा वापर करून शाळेसाठी लागणारी वीज तयार केली जाते. सहशालेय उपक्रमात वनराई बंधारे, रक्तदान शिबिर, अंधश्रध्दा निर्मूलन असे विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविले जातात. शाळेत व ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने शाळेत आता सुसज्ज असे बांधकाम केले जात आहे.प्रत्येक उपक्रमात गावकऱ्यांचा पुढाकार गावामध्ये अशा शासकीय स्पर्धा, योजनांमध्ये केवळ लोकसहभाग नसतो तर लोक श्रमदान सुद्धा करतात. १०० टक्के आधार कार्ड नोंदणी झालेले हे गाव आहे. सन २०१४-१५ या वर्षी सामाजिक वनीकरणामार्फत वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन यामध्ये सर्वात जास्त झाडे जोपासणे यामध्ये विदर्भात प्रथम क्रमांक मिळालेला आहे. गावामध्ये ग्रामपंचायत व शाळेच्या सहकार्याने गावातच जातीचे प्रमाणपत्र वाटप करणे, अशी अनेक कामे ग्रामपंचायतद्वारे राबविल्या जातात. आता ग्रामपंचायत व शाळेने आयएसओ मानांकनातून नवीन मानाचा तुरा रोखला आहे.