शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
3
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
4
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
5
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
6
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
7
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
8
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
9
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
10
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
11
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
12
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
13
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
14
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
15
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
16
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
17
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
18
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
19
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
20
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."

जेठभावडा ग्रामपंचायत व शाळेला आयएसओ मानांकन

By admin | Updated: December 10, 2015 02:02 IST

देवरीसारख्या नक्षलप्रभावित आणि दुर्गम क्षेत्रातील जेठभावडा ग्रामपंचायत आणि तेथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा विदर्भातील पहिली...

विदर्भातील पहिली : जिल्हा परिषदेच्या शाळेचा असाही बहुमानदेवरी : देवरीसारख्या नक्षलप्रभावित आणि दुर्गम क्षेत्रातील जेठभावडा ग्रामपंचायत आणि तेथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा विदर्भातील पहिली आयएसओ मानांकित मानांकित शाळा ठरली आहे. या शाळेला सदर बहुमानाचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.ग्राम पंचायत जेठभावडा ही मागील बऱ्याच वर्षापासून वेगवेगळ्या शासनाच्या स्पर्धेत सहभाग घेत आहे. हे गाव अतिदुर्गम आणि नक्षल्यांच्या प्रभावक्षेत्रात आहे. विशेष म्हणजे १०० टक्के आदिवासी समाज असणाऱ्या या गावात सन २००६-०७ या वर्षी जलस्वराज्य प्रकल्प यशस्वीरित्या राबविण्यात आला होता. २००७ मध्ये निर्मल ग्राम योजनेमार्फत १०० टक्के हागणदारीमुक्त गाव म्हणून या गावाला तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या हस्ते ग्रामपंचायतला २ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले होते. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये दोन वेळा तालुकास्तरावर प्रथम तर सन २०१३-१४ मध्ये जिल्हास्तरावर या ग्रामपंचायतला तृतीय पुरस्कार मिळाला आहे. विविध उपक्रम राबवत असताना गावचे सरपंच डॉ.जे.टी.रहांगडाले हे खूप हिरीरीने भाग घेत असतात. उपसरपंच भोजराज गावडकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर गावडकर, पोलीस पाटील राजेंद्र गावडकर, ग्रा.पं.सदस्य गोपाल कुंभरे, किरसान, शिला गावडकर, कल्पना गावडकर, शहारे तसे चपराशी व शाळेचे मुख्याध्यापक किशोर गर्जे, विनोद मेश्राम, सदस्य अशोक धानगुण, छाया धुर्वे, कांता देहारी, भागवत धानगुन व इतर ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हे उपक्रम राबविले जात आहेत. आयएसओ मानांकनामुळे ग्रामपंचायत व शाळेच्या उपक्रमांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.उपक्रमशील शाळा आणि शिक्षकयेथे असणारी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा ही १ ते ४ वर्गापर्यंत असून त्यात शिकणारे २८ विद्यार्थी १०० टक्के आदिवासी आहेत. या शाळेला मागील काही वर्षात शासनाचे वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये सन २००५-०६ व २००७-०८ मध्ये साने गुरूजी तालुकास्तरिय प्रथम पुरस्कार, तसेच सन २०१३-१४ गाशाआशा तालुकास्तरीय प्रथम तर सन २०१३-१४ मध्ये जिल्हास्तरीय साने गुरूजी प्रथम पुरस्कार मिळाला आहे. जिल्ह्यातील ही पहिली वीज बिल मुक्त शाळा असून येथे सौर उर्जेचा व पवन चक्कीचा वापर करून शाळेसाठी लागणारी वीज तयार केली जाते. सहशालेय उपक्रमात वनराई बंधारे, रक्तदान शिबिर, अंधश्रध्दा निर्मूलन असे विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविले जातात. शाळेत व ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने शाळेत आता सुसज्ज असे बांधकाम केले जात आहे.प्रत्येक उपक्रमात गावकऱ्यांचा पुढाकार गावामध्ये अशा शासकीय स्पर्धा, योजनांमध्ये केवळ लोकसहभाग नसतो तर लोक श्रमदान सुद्धा करतात. १०० टक्के आधार कार्ड नोंदणी झालेले हे गाव आहे. सन २०१४-१५ या वर्षी सामाजिक वनीकरणामार्फत वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन यामध्ये सर्वात जास्त झाडे जोपासणे यामध्ये विदर्भात प्रथम क्रमांक मिळालेला आहे. गावामध्ये ग्रामपंचायत व शाळेच्या सहकार्याने गावातच जातीचे प्रमाणपत्र वाटप करणे, अशी अनेक कामे ग्रामपंचायतद्वारे राबविल्या जातात. आता ग्रामपंचायत व शाळेने आयएसओ मानांकनातून नवीन मानाचा तुरा रोखला आहे.