शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

जिल्ह्यात धान लागवडीला ज्वारीचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 20:14 IST

निसर्गाच्या बदलाचा सर्वाधिक परिणाम शेतीवर होत आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळामुळे शेतीमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे. तर एकाच प्रकारच्या पिकांच्या लागवडीमुळे उत्पादनात घट होत असून त्याचे जमिनीवर सुध्दा परिणाम होत आहे.

ठळक मुद्देप्रायोगिक तत्त्वावर १३०० हेक्टरवर लागवड : पौष्टिक तृण धान्य वर्ष

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :निसर्गाच्या बदलाचा सर्वाधिक परिणाम शेतीवर होत आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळामुळे शेतीमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे. तर एकाच प्रकारच्या पिकांच्या लागवडीमुळे उत्पादनात घट होत असून त्याचे जमिनीवर सुध्दा परिणाम होत आहे. त्यामुळेच कृषी विद्यापीठाचे तज्ञ सुध्दा पीक लागवड पध्दतीत बदल करण्याचा सल्ला देत आहे. याच दृष्टीने गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामात धानाऐवजी ज्वारीची लागवड येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धानाला ज्वारीच्या रुपाने पर्याय मिळणार आहे.धान उत्पादकांचा जिल्हा अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख असून खरीपात १ लाख ७५ हजार तर रब्बीेमध्ये ३५ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी धानाची लागवड करीत असल्याने हळूहळू धानाच्या उत्पादनात घट होत आहे. परिणामी लागवड खर्चात सुध्दा वाढ होत असल्याने शेतकºयांना धानाची शेती म्हणजे तोट्याचा सौदा होत चालली आहे. यालाच पर्याय म्हणून कृषी विभागाने यंदा जिल्ह्यात १३०० हेक्टरवर ज्वारीची प्रायोगिक तत्वावर लागवड करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी १३ कृषी अधिकारी कार्यालयांना प्रत्येकी १०० हेक्टर लागवडीचे उद्दिष्ट दिले असून त्यासाठी लागणारे बियाणे सुध्दा उपलब्ध करुन दिले. धान उत्पादक शेतकºयांनी रब्बी हंगामात ज्वारीची लागवड करावी, यासाठी शेतकºयांना प्रती हेक्टरी १० किलो ज्वारीचे बियाणे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. धानापेक्षा ज्वारी पिकाला पाणी कमी लागत असून त्याचा लागवड खर्च सुध्दा कमी आहे. शिवाय यामुळे जनावरांसाठी चारा सुध्दा उपलब्ध होईल.पीक लागवड पध्दतीत बदल केल्याने जमिनीची खालावत चाललेली पोत सुधारण्यास मदत होईल. केंद्र शासनाने सन २०१८-१९ हे वर्ष पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून घोषीत केले आहे. त्यात रब्बी तृण धान्य पिकांची लावगड व उत्पादन घेण्याचे प्रस्तावित केले आहे. कृषी विभागाने राबविलेला ज्वारी लागवडीचा प्रयोग यशस्वी झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ज्वारीच्या रुपाने पर्याय उपलब्ध होणार आहे.पौष्टिक अन्न व चारा उपलब्धताजिल्ह्यात ५ लाख ८३ हजार ७९१ पशूधन असून मे २०१९ अखेर २ लाख ५४ हजार ५२९ मे.टन संभाव्य चारा टंचाई दिसून येत आहे. अशात ज्वारीच्या लागवडीमुळे जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता होणार आहे. शिवाय पीक पद्धतीत बदलामुळे रब्बी पीक क्षेत्रात वाढ होणार असून ज्वारीच्या माध्यमातून पौष्टीक अन्न घटक उपलब्धत होणार आहे.यंदा जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने रब्बीच्या लागवड क्षेत्रात घट झाली आहे. त्यामुळे कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात १३०० हेक्टरवर ज्वारीची लागवड करण्याचे नियोजन केले आहे.- नंदकिशोर नयनवाड, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.