शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्ह्यात धान लागवडीला ज्वारीचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 20:14 IST

निसर्गाच्या बदलाचा सर्वाधिक परिणाम शेतीवर होत आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळामुळे शेतीमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे. तर एकाच प्रकारच्या पिकांच्या लागवडीमुळे उत्पादनात घट होत असून त्याचे जमिनीवर सुध्दा परिणाम होत आहे.

ठळक मुद्देप्रायोगिक तत्त्वावर १३०० हेक्टरवर लागवड : पौष्टिक तृण धान्य वर्ष

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :निसर्गाच्या बदलाचा सर्वाधिक परिणाम शेतीवर होत आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळामुळे शेतीमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे. तर एकाच प्रकारच्या पिकांच्या लागवडीमुळे उत्पादनात घट होत असून त्याचे जमिनीवर सुध्दा परिणाम होत आहे. त्यामुळेच कृषी विद्यापीठाचे तज्ञ सुध्दा पीक लागवड पध्दतीत बदल करण्याचा सल्ला देत आहे. याच दृष्टीने गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामात धानाऐवजी ज्वारीची लागवड येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धानाला ज्वारीच्या रुपाने पर्याय मिळणार आहे.धान उत्पादकांचा जिल्हा अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख असून खरीपात १ लाख ७५ हजार तर रब्बीेमध्ये ३५ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी धानाची लागवड करीत असल्याने हळूहळू धानाच्या उत्पादनात घट होत आहे. परिणामी लागवड खर्चात सुध्दा वाढ होत असल्याने शेतकºयांना धानाची शेती म्हणजे तोट्याचा सौदा होत चालली आहे. यालाच पर्याय म्हणून कृषी विभागाने यंदा जिल्ह्यात १३०० हेक्टरवर ज्वारीची प्रायोगिक तत्वावर लागवड करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी १३ कृषी अधिकारी कार्यालयांना प्रत्येकी १०० हेक्टर लागवडीचे उद्दिष्ट दिले असून त्यासाठी लागणारे बियाणे सुध्दा उपलब्ध करुन दिले. धान उत्पादक शेतकºयांनी रब्बी हंगामात ज्वारीची लागवड करावी, यासाठी शेतकºयांना प्रती हेक्टरी १० किलो ज्वारीचे बियाणे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. धानापेक्षा ज्वारी पिकाला पाणी कमी लागत असून त्याचा लागवड खर्च सुध्दा कमी आहे. शिवाय यामुळे जनावरांसाठी चारा सुध्दा उपलब्ध होईल.पीक लागवड पध्दतीत बदल केल्याने जमिनीची खालावत चाललेली पोत सुधारण्यास मदत होईल. केंद्र शासनाने सन २०१८-१९ हे वर्ष पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून घोषीत केले आहे. त्यात रब्बी तृण धान्य पिकांची लावगड व उत्पादन घेण्याचे प्रस्तावित केले आहे. कृषी विभागाने राबविलेला ज्वारी लागवडीचा प्रयोग यशस्वी झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ज्वारीच्या रुपाने पर्याय उपलब्ध होणार आहे.पौष्टिक अन्न व चारा उपलब्धताजिल्ह्यात ५ लाख ८३ हजार ७९१ पशूधन असून मे २०१९ अखेर २ लाख ५४ हजार ५२९ मे.टन संभाव्य चारा टंचाई दिसून येत आहे. अशात ज्वारीच्या लागवडीमुळे जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता होणार आहे. शिवाय पीक पद्धतीत बदलामुळे रब्बी पीक क्षेत्रात वाढ होणार असून ज्वारीच्या माध्यमातून पौष्टीक अन्न घटक उपलब्धत होणार आहे.यंदा जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने रब्बीच्या लागवड क्षेत्रात घट झाली आहे. त्यामुळे कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात १३०० हेक्टरवर ज्वारीची लागवड करण्याचे नियोजन केले आहे.- नंदकिशोर नयनवाड, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.