शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जिल्ह्यात धान लागवडीला ज्वारीचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 20:14 IST

निसर्गाच्या बदलाचा सर्वाधिक परिणाम शेतीवर होत आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळामुळे शेतीमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे. तर एकाच प्रकारच्या पिकांच्या लागवडीमुळे उत्पादनात घट होत असून त्याचे जमिनीवर सुध्दा परिणाम होत आहे.

ठळक मुद्देप्रायोगिक तत्त्वावर १३०० हेक्टरवर लागवड : पौष्टिक तृण धान्य वर्ष

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :निसर्गाच्या बदलाचा सर्वाधिक परिणाम शेतीवर होत आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळामुळे शेतीमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे. तर एकाच प्रकारच्या पिकांच्या लागवडीमुळे उत्पादनात घट होत असून त्याचे जमिनीवर सुध्दा परिणाम होत आहे. त्यामुळेच कृषी विद्यापीठाचे तज्ञ सुध्दा पीक लागवड पध्दतीत बदल करण्याचा सल्ला देत आहे. याच दृष्टीने गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामात धानाऐवजी ज्वारीची लागवड येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धानाला ज्वारीच्या रुपाने पर्याय मिळणार आहे.धान उत्पादकांचा जिल्हा अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख असून खरीपात १ लाख ७५ हजार तर रब्बीेमध्ये ३५ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी धानाची लागवड करीत असल्याने हळूहळू धानाच्या उत्पादनात घट होत आहे. परिणामी लागवड खर्चात सुध्दा वाढ होत असल्याने शेतकºयांना धानाची शेती म्हणजे तोट्याचा सौदा होत चालली आहे. यालाच पर्याय म्हणून कृषी विभागाने यंदा जिल्ह्यात १३०० हेक्टरवर ज्वारीची प्रायोगिक तत्वावर लागवड करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी १३ कृषी अधिकारी कार्यालयांना प्रत्येकी १०० हेक्टर लागवडीचे उद्दिष्ट दिले असून त्यासाठी लागणारे बियाणे सुध्दा उपलब्ध करुन दिले. धान उत्पादक शेतकºयांनी रब्बी हंगामात ज्वारीची लागवड करावी, यासाठी शेतकºयांना प्रती हेक्टरी १० किलो ज्वारीचे बियाणे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. धानापेक्षा ज्वारी पिकाला पाणी कमी लागत असून त्याचा लागवड खर्च सुध्दा कमी आहे. शिवाय यामुळे जनावरांसाठी चारा सुध्दा उपलब्ध होईल.पीक लागवड पध्दतीत बदल केल्याने जमिनीची खालावत चाललेली पोत सुधारण्यास मदत होईल. केंद्र शासनाने सन २०१८-१९ हे वर्ष पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून घोषीत केले आहे. त्यात रब्बी तृण धान्य पिकांची लावगड व उत्पादन घेण्याचे प्रस्तावित केले आहे. कृषी विभागाने राबविलेला ज्वारी लागवडीचा प्रयोग यशस्वी झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ज्वारीच्या रुपाने पर्याय उपलब्ध होणार आहे.पौष्टिक अन्न व चारा उपलब्धताजिल्ह्यात ५ लाख ८३ हजार ७९१ पशूधन असून मे २०१९ अखेर २ लाख ५४ हजार ५२९ मे.टन संभाव्य चारा टंचाई दिसून येत आहे. अशात ज्वारीच्या लागवडीमुळे जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता होणार आहे. शिवाय पीक पद्धतीत बदलामुळे रब्बी पीक क्षेत्रात वाढ होणार असून ज्वारीच्या माध्यमातून पौष्टीक अन्न घटक उपलब्धत होणार आहे.यंदा जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने रब्बीच्या लागवड क्षेत्रात घट झाली आहे. त्यामुळे कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात १३०० हेक्टरवर ज्वारीची लागवड करण्याचे नियोजन केले आहे.- नंदकिशोर नयनवाड, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.