शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियानाची ऐशीतैशी

By admin | Updated: July 25, 2015 01:41 IST

शेतकऱ्यांच्या उत्पन्नाकरीता व त्यांच्या विकासाकरिता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध विकासकामांची योजना तयार केली.

काचेवानी : शेतकऱ्यांच्या उत्पन्नाकरीता व त्यांच्या विकासाकरिता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध विकासकामांची योजना तयार केली. त्या करीता निधीची व्यवस्था केली. मात्र या अभियानाची ऐशीतैशी करुन शेतकऱ्यांच्या विकासाच्या नावावर ठेकेदार आणि कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी मालामाल झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.शेतकऱ्यांच्या शेतीची सुधारणा व्हावी, पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी याकरीता जलयुक्त शिवार अभियान यावर्षापासून राज्यात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत भातखाचर (पुर्णजीवन) कामे, नाल्यातील गाळ काढणे, सिमेंट बंधारे आदी कामे करायची होती. यासाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी जिल्ह्याला देण्यात आला. या अभियानांतर्गत करण्यात येणारी कामे कृषी विभाग, पाटबंधारे विभाग आणि वन विभागाकडे देण्यात आली होती. यात मार्च ते जून दरम्यान करण्यात आलेल्या भातखाचरच्या (पुर्णजीवन) कामांत सर्वाधिक भ्रष्टाचार व अपहार करण्यात आला असल्याचे अनुभवी शेतकऱ्यांनी सांगितले आहे.शासनाने शेतकऱ्यांच्या हिताकरीता योजना आखली. मात्र या योजनेखाली कृषी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या विकासाची योजना आखून शेतकरी आणि राज्य शासनाची फसवणुक केली आहे. अभियानांतर्गत शेतात भातखाचरची (पुर्णजीवन) कामे करताना कंत्राटी पद्धतीवर ट्रॅक्टरने कामे करण्यात आली. काही कृषी अधिकाऱ्यांनी मुलाच्या, नातलगाच्या आणि जवळच्या लोकांच्या नावे ठेकेदारी रुपात कामे करुन घेतली. यावेळी शेतकरी आणि संबंधित कृषि सहायक शेतावर उपस्थित नसल्याने ट्रॅक्टरचालकांनी जमीनीचा उंच-खोलपणा न पाहता जवळची माती घालण्याचे काम केले. यामुळे मात्र शेतकऱ्यांच्या बांध्या उथळ झाल्या. शेतात दोन हजार रुपयांची माती पुरविण्यात आली. पण शेतकऱ्यांना त्या सुधारण्याकरीता जवळचे दोन हजार रुपये खर्च करावे लागणार आहे. बांध्याच्या धुऱ्यावर माती घालण्यात आली त्याची ड्रेसिंग करण्यात आली नाही. काही शेतकऱ्यांनी तुरीचे पीक लावताना बांध्या सुधारल्या आहेत. जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात आलेल्या कामांमुळे शेतकऱ्यांची शेती बिघडलीच त्यात सुधारणा झाली नाही. शेतकऱ्यांचे नुकसान झाले. शासनाचे रुपये लुबाडण्यात आले. मात्र हे खरे की कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे घर भरले असे स्पष्ट आरोप शेतकऱ्यांनी केले आहे. (वार्ताहर)