शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

जीर्ण बांधकामांचा रेकॉर्डच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 21:10 IST

शहरातील जीर्ण बांधकामाची अद्ययावत स्थिती व त्यावर उपाययोजना करून जीवीतहानी होणार नाही, याची दक्षता घेणे नगर परिषद प्रशासनाची जबाबदारी आहे.

ठळक मुद्देनगर रचना विभागाचे दुर्लक्ष: पालिका प्रशासनालाही घेणे-देणे नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील जीर्ण बांधकामाची अद्ययावत स्थिती व त्यावर उपाययोजना करून जीवीतहानी होणार नाही, याची दक्षता घेणे नगर परिषद प्रशासनाची जबाबदारी आहे. येथे मात्र उलट कारभार सुरू आहे. नगर परिषद प्रशासनाला याचे काहीच घेणे-देणे नसून नगर रचना विभागाचेही सपशेल दुर्लक्ष आहे. विशेष म्हणजे नगर रचना विभागाकडे शहरातील जीर्ण बांधकामांचा रेकॉर्डच नसल्याची माहिती आहे.एखादी इमारत पडून जीवीतहानी झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रात व टिव्हीवर बघावयास मिळतात. यात विशेष म्हणजे अशाप्रकारच्या घटना पावसाळ््यात जास्त प्रमाणात घडतात. शहरातही असे काहीसे प्रकार घडले आहेत. असे प्रकार घडू नये व जीर्ण इमारती पडून कुणाचा जीव जाऊ नये याची जबाबदारी नगर परिषद प्रशासनावर असते. मिळालेल्या माहितीनुसार, नगर परिषदेला यासाठी विभाग निहाय पथक तयार करून जीर्ण इमारतींची माहिती संकलीत करावयाची असते. तसेच अशा मालमत्ताधारकांना नोटीस बजाविण्याचे, शिवाय गरज पडल्यास धोकादायक बांधकाम पाडण्याची कारवाई करावी लागते.विशेष म्हणजे यासाठी नगर रचना विभागाकडे तसे काही अधिकार देण्यात आले आहेत. येथील नगर परिषदेत मात्र गंगा उलट्या दिशेने वाहत असल्याचे दिसून येत आहे. येथील नगर रचना विभागाक डे अशा जीर्ण बांधकामांबाबत माहितीच नसून तसा रेकॉर्डच उपलब्ध नाही. पावसाळ््यात सर्वेक्षणकरून अशा बांधकामांची नोंद करून त्यांच्यावर कारवाई करण्याची तसदी घेण्याचे काम करण्यास कुणीही इच्छूक नाही. अशात मात्र एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.विशेष म्हणजे, सध्या नगर रचना विभागातील नगर रचानाकार नकाशे यांची बदली झाल्याने त्यांचे पद रिक्त पडून आहे. अशात या विभागात जबाबदार अधिकारीच नसल्याने कोण डोकेदुखी लावून घेणार अशी स्थिती आहे असे म्हणता येईल. तर यापूर्वी बांधकाम विभागाकडून जीर्ण इमारतींचे सर्वेक्षण केले जात असल्याची माहिती आहे. मात्र ही प्रथा मागील कित्येक वर्षांपासून गोंदिया नगर परिषदेत बंद पडल्याची माहिती आहे.एकमेकांकडे बोट दाखविणेजिर्ण इमारतींचा रेकॉर्ड कोण तयार करतो या विषयाला घेऊन नगर परिषदेत एकमेकांकडे बोट दाखविण्याचे काम सुरू आहे. नगर रचना विभागाला विचारणा केली असता ते एसेसमेंंट विभागाचे नाव सांगतात. एसेसमेंट विभागाकडे विचारणा केली असता ते बांधकाम विभागाकडे बोट दाखवितात. यावरून जिर्ण इमारतींचा लेखा-जोखा ठेवण्याची जबाबदारी कुणीही घेण्यास तयार नसल्याचे दिसते. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सुरू असताना अधिकारी व पदाधिकारीही गप्प बसून आहेत.फक्त तक्रारींची नोंदयेथील नगर रचना विभागाकडे आलेल्या तक्रारींची नोंद करण्यात येते. तसेच आलेल्या तक्रारीवरून संबंधीत घर मालकाला नोटीस धाडली जाते. याशिवाय अन्य कोणतीही यादी किंवा रेकॉर्ड त्यांच्याकडे नाही. यातून विभागाकडे आलेल्या तक्रारींवर संबंधीताला नोटीस बजावण्या इतपत कामच केले जात असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यातही यंदा एकही नोटीस धाडण्यात आले नसल्याचे विभागातील कर्मचाºयाकडून कळले.