शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

‘जय सेवा’च्या गजराने कचारगड दुमदुमले

By admin | Updated: February 10, 2017 01:12 IST

आदिवासी समाजाचे उगमस्थान मानले जाणारे कचारगड येथे गुरूवार ९ फेबु्रवारीला कोया पुनेम महोत्सवाला सुरुवात झाली.

कोयापुनेम महोत्सवाला सुरुवात : गोंडी संस्कृतीचे दर्शन, भाविक रंगले पिवळ्या रंगातसालेकसा : आदिवासी समाजाचे उगमस्थान मानले जाणारे कचारगड येथे गुरूवार ९ फेबु्रवारीला कोया पुनेम महोत्सवाला सुरुवात झाली. जय सेवा, जय जंगो, जय लिंगो असा गजर सुरू असून जय सेवाच्या गजराने संपूर्ण कचारगड परिसर दुमदुमत आहे. सकाळी येथे दोन्ही दिशेकडून येणाऱ्या रेल्वे गाड्यांमधून हजारोंच्या संख्येने आदिवासी भाविक दरेकसा रेल्वे स्टेशनवरुन धनेगाव आणि कचारगडकडे चालताना दिसून येत होते. कचारगड गुफेकडे जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीत आदिवासी समाज बांधवांसह इतर विविध समाजाचे हौशी पर्यटक व यात्रेचा आनंद घेणारे लोक सुद्धा मोठ्या संख्येने उत्साहाने जाताना दिसत होते.सकाळी १० वाजता गोंडी भूमकाल (पुजारी) याने पुजेला सुरुवात केली. गोंडी संस्कृतीनुसार पुजन विधी पार पाडीत राणी दुर्गावती तसेच गोंडी धर्माचार्य स्व.मोतीरावन कंगाली यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर गोंडी धर्म प्रचारक शितल मरकाम यांनी गोंडी धर्माचा सप्तरंगी झेंडा फडकावला. त्यानंतर स्थानिक आमदार संजय पुराम यांनी गोंडवान सामाजिक झेंडा फडकावला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना रत्नदादा हिरासिंह मरकाम आणि कचारगड देवस्थानाचे संशोधक व प्रवर्तक के.बा. मररस्कोल्हे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी लांजी गढचे इंजि.वासुदेव शहा टेकाम, लेखीका चंद्रशेखर मोतीरावन कंगाली, छत्तीसगड येथील गोंडी इतिहासकार भरतलाल कोराम, म.प्र.चे माजी आमदार व धर्म प्रचारक मनमोहन शाह वट्टी, हरिश्चंद्र सलाम, शंकरलाल मडावी, गोपाल उईके, रमेश ताराम, मोहन सिडाम, धनलाल प्रदिते, फगनू कलामे, तुळशीराम सलामे यांच्यासह गोंडी समाजाचे अनेक मान्यवर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.कचारगडचे भूमक नवलसिंह कुमरे आणि धुरसिंह कुमरे यांच्या मार्गदर्शनात सर्व सेवादारांनी पिवळे धोतर, पांढरा कुर्ता आणि डोक्याला पिवळा फेटा बांधून महापूजेत सहभाग घेतला. यात पारी कपार लिंगो माँ काली कंकाली देवस्थान समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे, उपाध्यक्ष रमनलाल सलाम, सचिव संतोष पंधरे, कोषाध्यक्ष बारेलाल वरकडे, मनिष पुराम, रामेश्वर पंधरे, शंकुतला परते, सुरेश परते, मनोज इळपाते, चमन पंधरे, दयाराम परते, मोहन पंधरे यांनी महापूजेत सहभाग घेतला. दरम्यान प्रशासनाच्यावतीने सुद्धा या सात दिवसीय कचारगड यात्रेदरम्यान विशेष दक्षता घेतली जाते. पोलीस विभाग सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तैनात असून प्रत्येकावर करडी नजर ठेवण्यात येत आहे. काही मोक्याच्या ठिकाणी सी.सी. टीव्ही कॅमरेसुद्धा लावण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मोफत जेवन, आरोग्य सेवा इत्यादी सेवा समिती व प्रशासनाच्या माध्यमातून पुरविली जात आहे.(तालुका प्रतिनिधी)