शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

शिवभोजन वितरण करणाऱ्यांवरच आली उपाशी राहण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:20 IST

गोंदिया : कोरोनाच्या कठीण काळात कुणीही उपाशीपोटी राहू नये यासाठी राज्य शासनाने शिवभोजन थाळी सुरू केली. यासाठी मोठ्या प्रमाणात ...

गोंदिया : कोरोनाच्या कठीण काळात कुणीही उपाशीपोटी राहू नये यासाठी राज्य शासनाने शिवभोजन थाळी सुरू केली. यासाठी मोठ्या प्रमाणात शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले व या केंद्रचालकांना शासनाकडून प्रति थाळी अनुदान ठरवून देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात २४ केंद्रांच्या माध्यमातून गरजूंसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून २६ जानेवारी २०२० पासून आतापर्यंत ४,५८,७१८ नागरिकांनी भोजन देण्यात आले. मात्र या केद्रचालकांना मागील २ महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही. परिणामी गरजूंचे पोट भरणाऱ्यांवरच आता उपाशी राहण्याची पाळी आली असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. विशेष म्हणजे, राज्य शासनाच्या या उपक्रमाचा गरजूंना खरेच मोठा आधार झाला व त्यांच्या २ वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटला होता. आताही शिवभोजन थाळीच्या माध्यमातून गरजूंना जेवणाची सोय सुरूच आहे. मात्र केंद्रचालकांना अनुदान मिळाल्याने त्यांना ही सर्व व्यवस्था करताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. परिणामी ते आता आर्थिक अडचणीत आले आहेत.

--------------------------------

- जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्र- २४

- आतापर्यंत किती जणांनी लाभ घेतला - ४५८७१८

-------------------------------

प्रति थाळी ५० रुपये अनुदान

केंद्र चालकाने लाभार्थ्याकडून ५ रुपये घेतल्यास त्याला ४५ रुपये तसेच जर १० रुपये घेतले तर ४० रुपये अनुदान दिले जाते. मात्र सध्या नि:शुल्क थाळी वितरण करावे लागत असल्याने एका थाळीवर ५० रुपये अनुदान दिले जात आहे.

---------------------------------

अनुदान रखडले तरीही थाळींचे वितरण तेवढेच

राज्य शासनाने शिवभोजन केंद्रांना एक कोटा ठरवून दिला आहे व त्यानुसार त्यांना थाळींचे वितरण करावयाचे असून त्यावरच अनुदान दिले जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात सध्या गरजूंना नि:शुल्क भोजन वाटपासाठी २४ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांना मागील २ महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही. मात्र तरीही या सर्व केंद्रांकडून त्यांना ठरवून देण्यात आलेल्या थाळींच्या कोट्यानुसार थाळींचे वाटप सुरूच आहे. अनुदान रखडले म्हणून थाळींची संख्या कमी करण्यात आल्याचा प्रकार कुठेच सुरू नाही.

------------------------------

केेंद्रचालक म्हणतात...

शासन आदेशानुसार केंद्रातून गरजूंना नि:शुल्क थाळी दिली जात आहे. त्यात आम्ही अनुदानामुळे काहीच कमी-जास्त केले नाही. गरजूंना आमच्या माध्यमातून काही फायदा होत आहे याचेच समाधान आहे.

केंद्रचालक

--------------------------

अनुदान रखडले असले तरीही शिवभोजन थाळीचे वितरण सुरूच आहे. त्यात आम्ही थाळींची संख्या कमी केलेली नाही. अनुदान मिळणारच आहे, मात्र लोकांना जेवणाची सोय होत आहे हे महत्त्वाचे आहे.

- केंद्रचालक

---------------------------

कोट

जिल्ह्यात २४ शिवभोजन केंद्रे सुरू असून त्यांच्या माध्यमातून गरजूंना थाळींचे वितरण केले जात आहे. या केंद्रांचे २ महिन्यांचे अनुदान द्यायचे आहे. शासनाकडून अनुदान आले असून प्रक्रिया झाल्यावर लगेच त्यांचे अनुदान दिले जाणार आहे.

- डी.एस. वानखेडे

जिल्हा पुरवठा अधिकारी, गोंदिया