शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

शिवभोजन वितरण करणाऱ्यांवरच आली उपाशी राहण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:20 IST

गोंदिया : कोरोनाच्या कठीण काळात कुणीही उपाशीपोटी राहू नये यासाठी राज्य शासनाने शिवभोजन थाळी सुरू केली. यासाठी मोठ्या प्रमाणात ...

गोंदिया : कोरोनाच्या कठीण काळात कुणीही उपाशीपोटी राहू नये यासाठी राज्य शासनाने शिवभोजन थाळी सुरू केली. यासाठी मोठ्या प्रमाणात शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले व या केंद्रचालकांना शासनाकडून प्रति थाळी अनुदान ठरवून देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात २४ केंद्रांच्या माध्यमातून गरजूंसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून २६ जानेवारी २०२० पासून आतापर्यंत ४,५८,७१८ नागरिकांनी भोजन देण्यात आले. मात्र या केद्रचालकांना मागील २ महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही. परिणामी गरजूंचे पोट भरणाऱ्यांवरच आता उपाशी राहण्याची पाळी आली असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. विशेष म्हणजे, राज्य शासनाच्या या उपक्रमाचा गरजूंना खरेच मोठा आधार झाला व त्यांच्या २ वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटला होता. आताही शिवभोजन थाळीच्या माध्यमातून गरजूंना जेवणाची सोय सुरूच आहे. मात्र केंद्रचालकांना अनुदान मिळाल्याने त्यांना ही सर्व व्यवस्था करताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. परिणामी ते आता आर्थिक अडचणीत आले आहेत.

--------------------------------

- जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्र- २४

- आतापर्यंत किती जणांनी लाभ घेतला - ४५८७१८

-------------------------------

प्रति थाळी ५० रुपये अनुदान

केंद्र चालकाने लाभार्थ्याकडून ५ रुपये घेतल्यास त्याला ४५ रुपये तसेच जर १० रुपये घेतले तर ४० रुपये अनुदान दिले जाते. मात्र सध्या नि:शुल्क थाळी वितरण करावे लागत असल्याने एका थाळीवर ५० रुपये अनुदान दिले जात आहे.

---------------------------------

अनुदान रखडले तरीही थाळींचे वितरण तेवढेच

राज्य शासनाने शिवभोजन केंद्रांना एक कोटा ठरवून दिला आहे व त्यानुसार त्यांना थाळींचे वितरण करावयाचे असून त्यावरच अनुदान दिले जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात सध्या गरजूंना नि:शुल्क भोजन वाटपासाठी २४ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांना मागील २ महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही. मात्र तरीही या सर्व केंद्रांकडून त्यांना ठरवून देण्यात आलेल्या थाळींच्या कोट्यानुसार थाळींचे वाटप सुरूच आहे. अनुदान रखडले म्हणून थाळींची संख्या कमी करण्यात आल्याचा प्रकार कुठेच सुरू नाही.

------------------------------

केेंद्रचालक म्हणतात...

शासन आदेशानुसार केंद्रातून गरजूंना नि:शुल्क थाळी दिली जात आहे. त्यात आम्ही अनुदानामुळे काहीच कमी-जास्त केले नाही. गरजूंना आमच्या माध्यमातून काही फायदा होत आहे याचेच समाधान आहे.

केंद्रचालक

--------------------------

अनुदान रखडले असले तरीही शिवभोजन थाळीचे वितरण सुरूच आहे. त्यात आम्ही थाळींची संख्या कमी केलेली नाही. अनुदान मिळणारच आहे, मात्र लोकांना जेवणाची सोय होत आहे हे महत्त्वाचे आहे.

- केंद्रचालक

---------------------------

कोट

जिल्ह्यात २४ शिवभोजन केंद्रे सुरू असून त्यांच्या माध्यमातून गरजूंना थाळींचे वितरण केले जात आहे. या केंद्रांचे २ महिन्यांचे अनुदान द्यायचे आहे. शासनाकडून अनुदान आले असून प्रक्रिया झाल्यावर लगेच त्यांचे अनुदान दिले जाणार आहे.

- डी.एस. वानखेडे

जिल्हा पुरवठा अधिकारी, गोंदिया