शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

समाजातील उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणणे हे आमचे कर्तव्य ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:32 IST

गोंदिया : मानवी जीवनात शिक्षणाला फार महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षणाचा मूलभूत अधिकार मानवी जीवनास मिळालेली अमूल्य देण आहे. जीवनात ...

गोंदिया : मानवी जीवनात शिक्षणाला फार महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षणाचा मूलभूत अधिकार मानवी जीवनास मिळालेली अमूल्य देण आहे. जीवनात चांगले शिक्षण घेतले तर आपण उच्चपदापर्यंत जाऊ शकतो व त्याची समाजात प्रतिष्ठा वाढत असते. त्याचप्रमाणे चांगले आरोग्य राहण्यासाठी चांगल्या गुणांचा अवलंब केला तर आरोग्य सुदृढ राहते. चांगले आरोग्य हे एक चांगले व्यक्तिमत्त्वाचे गुण आहे. समाजातील तळागळातील लोकांना जे दीर्घ काळापासून गरीब व उपेक्षित आहेत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे आमचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.ए.ए.आर. औटी यांनी केले.

भटके विमुक्त कल्याणकारी संस्था विदर्भ प्रदेश अंतर्गत ‘पालावरची शाळा’ मांग, गारुडी वस्ती, शिवाजीनगर, कुडवा (गोंदिया) येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. जिल्हा न्यायाधीश-१ एस. बी. पराते, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष टी. बी. कटरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, पोलीस निरीक्षक देविदास कठाळे, तहसीलदार आदेश डफळ, गट विकास अधिकारी दिलीप खोटेले, ॲड. हेमलता पतेह, ॲड. अर्चना नंदघळे, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, पालावरच्या शाळेचे निर्मल बोरसे, कुडवा ग्रामपंचायत सरपंच शामदेवी ठाकरे व ॲड. प्रणिता कुलकर्णी उपस्थित होते.

न्या. औटी यांनी भटक्या विमुक्तांना शासनाच्या विविध योजनांची विस्तृतपणे माहिती दिली. ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना शासनाच्या योजनांचा कसा लाभ घेता येईल याबाबत सविस्तर समजावून सांगितले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाअंतर्गत विविध सेवा पुरविल्या जातात व त्या मोफत असतात. त्यामुळे त्या योजनांचा कसा लाभ घेता येईल मार्गदर्शन केले. भटक्या विमुक्त लोकांना तसेच पालावरच्या शाळेतील मुलांना मार्गदर्शन करतांना मुख्य न्यायदंडाधिकारी एस. जे. भट्टाचार्य म्हणाले, आपण उद्याचे सुजाण नागरिक आहात. त्यामुळे चांगल्या आचरणातून आपण मोठे व्यक्ती व्हावे, ज्यामुळे आपले नाव समाजात एक उत्तम उदाहरण म्हणून नावारूपास येईल. संविधानामध्ये शिक्षण घेण्याच्या अधिकाराबाबत मुलांना वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत मोफत शिक्षण देण्यात यावे व ही जबाबदारी शासनाची आहे. प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देणे हे त्यांचे कर्तव्ये आहे व शिक्षण देवून त्यांना या देशाचा सुजाण नागरिक बनविणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. प्रणिता कुलकर्णी यांनी केले तर उपस्थितांचे आभार ॲड. हेमलता पतेह यांनी मानले.