शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

समाजातील उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणणे हे आमचे कर्तव्य ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:32 IST

गोंदिया : मानवी जीवनात शिक्षणाला फार महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षणाचा मूलभूत अधिकार मानवी जीवनास मिळालेली अमूल्य देण आहे. जीवनात ...

गोंदिया : मानवी जीवनात शिक्षणाला फार महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षणाचा मूलभूत अधिकार मानवी जीवनास मिळालेली अमूल्य देण आहे. जीवनात चांगले शिक्षण घेतले तर आपण उच्चपदापर्यंत जाऊ शकतो व त्याची समाजात प्रतिष्ठा वाढत असते. त्याचप्रमाणे चांगले आरोग्य राहण्यासाठी चांगल्या गुणांचा अवलंब केला तर आरोग्य सुदृढ राहते. चांगले आरोग्य हे एक चांगले व्यक्तिमत्त्वाचे गुण आहे. समाजातील तळागळातील लोकांना जे दीर्घ काळापासून गरीब व उपेक्षित आहेत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे आमचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.ए.ए.आर. औटी यांनी केले.

भटके विमुक्त कल्याणकारी संस्था विदर्भ प्रदेश अंतर्गत ‘पालावरची शाळा’ मांग, गारुडी वस्ती, शिवाजीनगर, कुडवा (गोंदिया) येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. जिल्हा न्यायाधीश-१ एस. बी. पराते, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष टी. बी. कटरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, पोलीस निरीक्षक देविदास कठाळे, तहसीलदार आदेश डफळ, गट विकास अधिकारी दिलीप खोटेले, ॲड. हेमलता पतेह, ॲड. अर्चना नंदघळे, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, पालावरच्या शाळेचे निर्मल बोरसे, कुडवा ग्रामपंचायत सरपंच शामदेवी ठाकरे व ॲड. प्रणिता कुलकर्णी उपस्थित होते.

न्या. औटी यांनी भटक्या विमुक्तांना शासनाच्या विविध योजनांची विस्तृतपणे माहिती दिली. ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना शासनाच्या योजनांचा कसा लाभ घेता येईल याबाबत सविस्तर समजावून सांगितले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाअंतर्गत विविध सेवा पुरविल्या जातात व त्या मोफत असतात. त्यामुळे त्या योजनांचा कसा लाभ घेता येईल मार्गदर्शन केले. भटक्या विमुक्त लोकांना तसेच पालावरच्या शाळेतील मुलांना मार्गदर्शन करतांना मुख्य न्यायदंडाधिकारी एस. जे. भट्टाचार्य म्हणाले, आपण उद्याचे सुजाण नागरिक आहात. त्यामुळे चांगल्या आचरणातून आपण मोठे व्यक्ती व्हावे, ज्यामुळे आपले नाव समाजात एक उत्तम उदाहरण म्हणून नावारूपास येईल. संविधानामध्ये शिक्षण घेण्याच्या अधिकाराबाबत मुलांना वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत मोफत शिक्षण देण्यात यावे व ही जबाबदारी शासनाची आहे. प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देणे हे त्यांचे कर्तव्ये आहे व शिक्षण देवून त्यांना या देशाचा सुजाण नागरिक बनविणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. प्रणिता कुलकर्णी यांनी केले तर उपस्थितांचे आभार ॲड. हेमलता पतेह यांनी मानले.