शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
5
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
6
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
7
Operation Sindoor : जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
8
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
9
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
10
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
11
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
12
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
13
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
14
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
15
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
16
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
17
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
18
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
19
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
20
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  

पावसाळ््यातही होतेय अंगाची लाही-लाही

By admin | Updated: June 16, 2017 01:04 IST

मृग लागल्यानंतर सुरूवातीचे दोन-तीन दिवस चांगली हजेरी लावल्यानंतर आता मात्र पावसाने दडी मारली आहे.

पावसाने मारली दडी : उकाड्याने नागरिक हैराणलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मृग लागल्यानंतर सुरूवातीचे दोन-तीन दिवस चांगली हजेरी लावल्यानंतर आता मात्र पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे उकाड्याने नागरिक हैरान झाले असून अंगाची लाह-लाही होत आहे. उन्हाळा परतून आल्यासारखे वातावरण तापू लागले असून कधी पाऊस बरसतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ७ जून पासून पावसाळा सुरू होतो. हवामान खात्यानेही यंदा पावसाळा सुरूवातीपासूनच खुश करणार असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र त्यांचा अंदाज चूक ठरत असल्याचेही दिसून येत आहे. सुरूवातीचे दोन-तीन दिवस पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता व सर्वांना उकाड्यापासून दिलासा मिळाला होता. वातावरण थंड झाल्याने सर्वच खूश होते. मात्र मागील दोन दिवसांपासून पावसाने दडी मारल्याचे दिसून येत आहे. परिणामी वातावरण पुन्हा तापू लागले आहे. विशेष म्हणजे उन्हापासून पाण्याची वाफ होत असून या उमसमुळे जीव कासावीस होऊ लागला आहे. उन्ह पुन्हा उन्हाळ््यासारखे तापू लागले असून घरा बाहेर पडण्यासाठी विचार करावा लागत आहे. त्यामुळे आता पाऊस लवकर बरसावा यासाठी सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. जून महिना आता अर्धा सरला असून फक्त दोन-तीन दिवसच पाऊस पडल्याने हा महिनाही असाच तर निघत नाही ना असा प्रश्न ही पडत आहे. दररोज ढग दाटून येत आहेत, मात्र न बरसताच निघून जातात. आता तरी बरस अशी हाक सर्वच देत आहेत. ९६८.९ मिमी. बरसला पाऊस जिल्ह्यात आतापर्यंत ९६८.९ मिमी. पाऊस बरसल्याची नोंद घेण्यात आली आहे. यात सर्वाधिक पाऊस आमगाव तालुक्यात १९५ मिमी. झाला असून सर्वात कमी पाऊस अर्जुनी-मोरगाव तालुक्यात फक्त ३६.६ मिमी बरसल्याची माहिती आहे. याशिवाय गोंदिया तालुक्यात १०२.१ मिमी., गोरेगाव तालुक्यात १४९.८ मिमी.., तिरोडा तालुक्यात ११५.६ मिमी., देवरी तालुक्यात १२०.४ मिमी.., सडक-अर्जुनी तालुक्यात ९२.३ मिमी तर सालेकसा तालुक्यात १५७.१ मिमी. असा एकूण ९६८.९ मिमी. पाऊस पडला असून त्याची सरासरी २९.२ एवढी आहे. पारा ३८ डिग्रीच्या घरात पावसाळा सुरू झाला असूनही जिल्ह्याचा पारा आजही ३८ डिग्रीच्या घरात आहे. यावरून उकाड्याचा अंदाज लावता येतो. आता पाऊस पडल्यावरच यावर काही तोडगा निघणार व पारा खाली उतरल्यावरच उकाड्यापासून सुटका मिळणार आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या असून पाऊस बरसण्याची वाट बघत आहेत.