शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

जिल्हा कारागृहाचा मुद्दा सभागृहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 22:40 IST

भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे विभाजन होऊन १९ वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही जिल्हा कारगृहासाठी निधी मंजूर करण्यात आला नाही. ८० कोटी रुपयांची मागणी असताना शासनाने केवळ १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल यांनी वेधले लक्ष : शहरात सीसीटिव्ही केव्हा ?

आॅनलाईन लोकमतगोंदिया : भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे विभाजन होऊन १९ वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही जिल्हा कारगृहासाठी निधी मंजूर करण्यात आला नाही. ८० कोटी रुपयांची मागणी असताना शासनाने केवळ १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यामुळे जिल्हा कारगृहाचे काम केव्हा सुरु होणार, निधी केव्हा मिळणार असा मुद्दा विधी मंडळाच्या अधिवेशनात आ.गोपालदास अग्रवाल यांनी सोमवारी (दि.२६) सभागृहात लावून धरला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावर उत्तर देणे भाग पडले.गोंदियाला जिल्ह्याचा दर्जा मिळून १९ वर्षांच्या कालावधी पूर्ण होत आहे. मात्र अद्यापही जिल्हा कारागृहाचा प्रश्न मार्गी लागला नाही. जिल्हा कारगृहासाठी गोंदिया येथील कारंजा मुख्यालयामागे जागा मंजूर करण्यात आली. कारागृह बांधकामासाठी ८० कोटी रुपयांचा निधीचा आराखडा तयार करुन गृह विभागाकडे पाठविण्यात आला. आ. अग्रवाल यांनी मागील चार पाच वर्षांपासून हा मुद्दा सातत्याने लावून धरला. गृह विभागाने कारागृहासाठी केवळ १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यामुळे जिल्हा कारागृहाचे बांधकाम कसे सुरू करणार असा मुद्या आ. अग्रवाल यांनी सभागृहात प्रभावीपणे उपस्थित केला. तसेच यावर उत्तर देण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा कारागृहासाठी आवश्यक निधी मंजूर करुन हा मुद्या मार्गी लावू असे सांगितले. गोंदिया शहर हे बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे. शहराच्या लोकसंख्येत वाढ झाली असून गुन्हेगारी घटनांमध्ये सुध्दा वाढ झाली आहे. अशा घटनांवर वेळीच आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही लावण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून आहे. हा मुद्दा अधिवेशनात सुध्दा उपस्थित करण्यात आला. मात्र सरकारने यासाठी अद्यापही निधी मंजूर केला नाही. सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश सुध्दा दिले नसल्याची बाब आ. अग्रवाल यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्र्यांनी यासाठी लवकरच निधी उपलब्ध करुन देवू असे सांगितले.या वेळी आ. अग्रवाल यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी हुतात्मा झालेल्यांच्या कुटुंबीयांना शासनाने मानधन व इतर सोयी सुविधा लागू करण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी निश्चित त्यांना सुध्दा मानधन व इतर सोयी सुविधा देण्यात येतील असे सभागृहाला सांगितले.