शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
5
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
6
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
7
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
8
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
9
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
10
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
11
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
12
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
13
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
14
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
15
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
16
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
17
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
18
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
19
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
20
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान

निधीत अडकल्या सिंचन विहिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 05:00 IST

१३ हजार सिंचन विहिरी बांधकाम कार्यक्रमातंर्गत लाभार्थ्यांना प्रलंबित देयके देण्याकरीता निधी देण्याची मागणी नागपूर आयुक्तांनी प्रधान सचिव नियोजन विभाग (रोहयो प्रभाग) यांच्याकडे ३१ जुलै रोजी पाठविलेल्या पत्रातून केली आहे. नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये १३ हजार सिंचन विहिरींचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देगरज २२९.६४ कोटीची : निधी उपलब्ध झाल्याशिवाय काम सुरू करू नका

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून मागेल त्याला विहीर देण्यासाठी नागपूर विभागातील जिल्ह्यांसाठी १३ हजार विहिरींची योजना सुरू करण्यात आली होती. परंतु या योजनेला २२९.६४ कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. पण अद्याप उपलब्ध न झाल्याने निधी अभावी नागपूर विभागातील सिंचन विहिरींचे बांधकाम अडले आहे.१३ हजार सिंचन विहिरी बांधकाम कार्यक्रमातंर्गत लाभार्थ्यांना प्रलंबित देयके देण्याकरीता निधी देण्याची मागणी नागपूर आयुक्तांनी प्रधान सचिव नियोजन विभाग (रोहयो प्रभाग) यांच्याकडे ३१ जुलै रोजी पाठविलेल्या पत्रातून केली आहे. नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये १३ हजार सिंचन विहिरींचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.या कार्यक्रमांतर्गत आॅनलाईन अर्ज मागविणे, अर्जाची छानणी करणे, दिलेल्या उद्दिष्टानुसार तालुकास्तरीय समितीद्वारे व त्यानंतर जिल्हास्तरीय समितीद्वारे अनुज्ञेय लाभार्थ्यांच्या यादीस मान्यता प्रदान करणे, त्यानंतर कामे सुरु केली. सद्यस्थितीत २३७३ कामे सुरू झाली आहेत.५३२ कामे पूर्ण झाली तर १८४१ कामे अपूर्ण आहेत. या कार्यक्रमासाठी २३ कोटी रुपयांचा निधी मिळाला आणि तो खर्च सुध्दा झाला. या योजनेत लाभार्थ्यांना स्वखर्चाने विहिरींचे काम करावे लागते. त्यानंतर केलेल्या मुल्यांकणानुसार गटविकास अधिकारी यांच्यामार्फत पैसे दिले जातात.निधी अभावी १४५४ विहिरींचे काम अपूर्णशेतकऱ्यांनी आपल्या खिशातून पैसे खर्च करून विहिरींचे काम करणे सुरू केले.परंतु निधी अभावी त्या विहिरी अपूर्ण आहेत. त्या शेतकºयांनी कामावर केलेला खर्च वाया जाऊ नये, अशा १४५४ लाभार्थ्यांकरीता १८.१९ कोटी निधीची आवश्यकता आहे. हा निधी सुध्दा दुसºया प्राधान्याने शासनाद्वारे उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.सद्यस्थितीत १९०१ लाभार्थ्यांच्या विहिरींचे बांधकाम २०.७७ कोटी निधी अभावी प्रलंबित आहेत. लाभार्थी शेतकºयांनी विहिरींच्या कामाकरीता उधार उसणवारी करुन निधी उभारून काम सुरू केले.मात्र आता विहीर बांधकामाचे देयके मिळत नसल्याचे त्यांच्या समस्येत वाढ झाली आहे. त्यामुळे देयकांसाठी त्यांची पंचायत समितीत पायपीट सुरू आहे. प्रलंबित देयकासाठी प्रथम प्राधान्याने २०.७७ कोटी रूपये शासनाद्वारे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त ज्या विहिरींची कामे सुरू झाली त्या विहिरी सुध्दा पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पagricultureशेती