शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

निधीत अडकल्या सिंचन विहिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 05:00 IST

१३ हजार सिंचन विहिरी बांधकाम कार्यक्रमातंर्गत लाभार्थ्यांना प्रलंबित देयके देण्याकरीता निधी देण्याची मागणी नागपूर आयुक्तांनी प्रधान सचिव नियोजन विभाग (रोहयो प्रभाग) यांच्याकडे ३१ जुलै रोजी पाठविलेल्या पत्रातून केली आहे. नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये १३ हजार सिंचन विहिरींचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देगरज २२९.६४ कोटीची : निधी उपलब्ध झाल्याशिवाय काम सुरू करू नका

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून मागेल त्याला विहीर देण्यासाठी नागपूर विभागातील जिल्ह्यांसाठी १३ हजार विहिरींची योजना सुरू करण्यात आली होती. परंतु या योजनेला २२९.६४ कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. पण अद्याप उपलब्ध न झाल्याने निधी अभावी नागपूर विभागातील सिंचन विहिरींचे बांधकाम अडले आहे.१३ हजार सिंचन विहिरी बांधकाम कार्यक्रमातंर्गत लाभार्थ्यांना प्रलंबित देयके देण्याकरीता निधी देण्याची मागणी नागपूर आयुक्तांनी प्रधान सचिव नियोजन विभाग (रोहयो प्रभाग) यांच्याकडे ३१ जुलै रोजी पाठविलेल्या पत्रातून केली आहे. नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये १३ हजार सिंचन विहिरींचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.या कार्यक्रमांतर्गत आॅनलाईन अर्ज मागविणे, अर्जाची छानणी करणे, दिलेल्या उद्दिष्टानुसार तालुकास्तरीय समितीद्वारे व त्यानंतर जिल्हास्तरीय समितीद्वारे अनुज्ञेय लाभार्थ्यांच्या यादीस मान्यता प्रदान करणे, त्यानंतर कामे सुरु केली. सद्यस्थितीत २३७३ कामे सुरू झाली आहेत.५३२ कामे पूर्ण झाली तर १८४१ कामे अपूर्ण आहेत. या कार्यक्रमासाठी २३ कोटी रुपयांचा निधी मिळाला आणि तो खर्च सुध्दा झाला. या योजनेत लाभार्थ्यांना स्वखर्चाने विहिरींचे काम करावे लागते. त्यानंतर केलेल्या मुल्यांकणानुसार गटविकास अधिकारी यांच्यामार्फत पैसे दिले जातात.निधी अभावी १४५४ विहिरींचे काम अपूर्णशेतकऱ्यांनी आपल्या खिशातून पैसे खर्च करून विहिरींचे काम करणे सुरू केले.परंतु निधी अभावी त्या विहिरी अपूर्ण आहेत. त्या शेतकºयांनी कामावर केलेला खर्च वाया जाऊ नये, अशा १४५४ लाभार्थ्यांकरीता १८.१९ कोटी निधीची आवश्यकता आहे. हा निधी सुध्दा दुसºया प्राधान्याने शासनाद्वारे उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.सद्यस्थितीत १९०१ लाभार्थ्यांच्या विहिरींचे बांधकाम २०.७७ कोटी निधी अभावी प्रलंबित आहेत. लाभार्थी शेतकºयांनी विहिरींच्या कामाकरीता उधार उसणवारी करुन निधी उभारून काम सुरू केले.मात्र आता विहीर बांधकामाचे देयके मिळत नसल्याचे त्यांच्या समस्येत वाढ झाली आहे. त्यामुळे देयकांसाठी त्यांची पंचायत समितीत पायपीट सुरू आहे. प्रलंबित देयकासाठी प्रथम प्राधान्याने २०.७७ कोटी रूपये शासनाद्वारे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त ज्या विहिरींची कामे सुरू झाली त्या विहिरी सुध्दा पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पagricultureशेती