शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘आऊटलेट’द्वारे होणार सिंचन

By admin | Updated: May 6, 2017 00:51 IST

भूसंपादनाच्या अडथळ्यात मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या रजेगाव-काटी मध्यम प्रकल्पास मुख्यमंत्र्यांनी प्रथम प्राधान्य दिल्याने

देवानंद शहारे । लोकमत न्यूज नेटवर्क भूसंपादनाच्या अडथळ्यात मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या रजेगाव-काटी मध्यम प्रकल्पास मुख्यमंत्र्यांनी प्रथम प्राधान्य दिल्याने त्याचे काम ३० जूनपर्यंत पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर आहे. त्यातच आता आऊटलेटद्वारे (विमोचक)सिंचन करण्याचे नवीन प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आले असून त्याला लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे. मान्यता मिळून काम पूर्ण झाले तर एका आऊटलेटद्वारे जवळपास पाच ते सहा हेक्टर जमिनीचे सिंचन होणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणात धानपीक घेतले जाते. मात्र पर्याप्त प्रमाणात सिंचनाच्या सोयी नसल्यामुळे येथील शेतकरी नेहमी आर्थिक अडचणीत सापडतो. मात्र आता शासनाने सिंचनाच्या सोयी वाढविण्याकडे लक्ष दिल्याचे समजते. सुरूवातीला सन १९९६-९७ मध्ये रजेगाव-काटी मध्यम प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता २३.३८ कोटींची होती. तर सन २०११-१२ मध्ये ही प्रशासकीय मान्यता ८७.४३ कोटींवर पोहोचली. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले तर ४,५६० हेक्टर जमिनीला त्याद्वारे सिंचन होवू शकेल. सद्या वाघ नदीवर पंप हाऊसचे काम पूर्ण झाले आहे. तेथून पाण्याचा उपसा करून वितरण कुंडात घातले जाते. हे पंप हाऊस ते वितरण कुंडाच्या नलिकेची लांबी ७.६ किमी आहे. तिचा डायमीटर १.२ मीटर एवढा आहे. रजेगाव-काटी मध्यम प्रकल्पाच्या सिरपूर, बघोली, सावरी व अर्जुनी या चार प्रमुख वितरिका आहे. त्यांचे काम सुरूच आहे. यात बघोेली व सावरी वितरिकांसाठी भूसंपादन करण्यात आले. मात्र सन २०१३ मध्ये नवीन भू संपादन कायदा आला. यात नवीन भू संपादन कायद्यानुसार जमिनीचे दर देण्यात यावे अन्यथा ताबा देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. तर अर्जुनी वितरिकेसाठी जमिनीच्या रजिस्ट्रीची प्रक्रिया सुरूच आहे. नवीन दर हवे असल्याने शेतकरी ताबा देत नव्हते. त्यांना वाढीव दर हवे होते. जुन्या दराप्रति असंतोष असल्याने मागील दोन वर्षांपासून ही प्रक्रिया रेंगाळत चालली होती. मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्तीने काही शेतकऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. सध्या मूरपार व सिरपूर वितरिकांचे ७० ते ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. अर्जुनी व सावरी वितरिकांवर मातीकाम सुरू असून ३० जूनपर्यंत काम पूर्णत्वास जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. रजेगाव काटी मध्यम प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी वॉररूममध्ये घालून जून २०१७ पर्यंत सदर प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच दोन वर्षांपासून जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी नकार दिल्याने यावर्षी प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. रजेगाव-काटी प्रकल्प जून २०१७ मध्ये पूर्ण करायचा आहे. काही शेतकऱ्यांना भू संपादनाची भरपाई मिळाली नाही, त्यामुळे त्यांच्यात असंतोष होता. मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्तीने शेतकऱ्यांकडून ताबा मिळाला आहे. अद्याप काही शेतकऱ्यांनी पैशाची उचल केली नाही तर काहींना भरपाई मिळाली नाही. ही भरपाई शेतकऱ्यांना मिळाली तर ते समाधानी होतील व प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी सहकार्य मिळेल. पी.डी. बडवाईक, कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभाग, गोंदिया १८ गावांना होणार ओलिताची सोय वाघ प्रकल्पाचा खालचा भाग सोडला तर वरील भागातील १८ गावांना रजेगाव-काटी मध्यम प्रकल्पाद्वारे सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे. यात अर्जुनी, बघोली, भदूटोला, चारगाव, गर्रा, गर्रा खुर्द, कन्हारटोला, लोधीटोला, मोगर्रा, मरारटोला, मुंडीपार, रजेगाव, सावरी, खातिया, सिरपूर, रावणवाडी, कोचेवाही व गोंदीटोला या १८ गावांचा समावेश आहे. प्रकल्प पूर्ण होताच सदर गावे ओलिताखाली येणार आहेत. आऊटलेटसाठी हेक्टरी लाखाचा खर्च रजेगाव-काटी मध्यम प्रकल्पाचा मुख्य कालवा खुला (ओपन) राहणार आहेत. मात्र या कालव्यातून निघणाऱ्या शाखा बंद नलिका असणार आहेत. त्या शेताखालून जाणार असून शेतजमिनीच्या पृष्ठभागापासून १.५ मीटर आत राहतील. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक घेण्यास कसलीही अडचण होणार नाही. या बंद नलिकेतून नियोजनानुसार आऊटलेट (विमोचक) किंवा फव्वारा लावण्यात येणार आहे. आऊटलेटसाठी जवळपास ९० हजार ते एक लाख रूपयांचा खर्च प्रति हेक्टर येणार आहे. तसेच एका आऊटलेटद्वारे तब्बल पाच ते सहा हेक्टर जमिनीचे सिंचन होणार आहे. याचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात आला असून यावर्षी किंवा पुढील वर्षापर्यंत सदर प्रस्तावास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.