शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
5
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
6
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
7
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
8
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
9
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
10
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
11
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
12
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
13
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
14
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
15
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
16
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
17
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
18
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
19
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
20
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

जिल्ह्यात होणार सिंचनक्रांती

By admin | Updated: January 23, 2016 00:29 IST

पूर्व विदर्भातील सर्व मामा तलावांचे खोलीकरण, गाळ काढणे तसेच दुरुस्ती व पुर्नस्थापनेचा कार्यक्रम सरकारने सुरु केला आहे.

राजकुमार बडोले : ताडगाव मामा तलाव दुरुस्तीचे भूमिपूजनगोंदिया : पूर्व विदर्भातील सर्व मामा तलावांचे खोलीकरण, गाळ काढणे तसेच दुरुस्ती व पुर्नस्थापनेचा कार्यक्रम सरकारने सुरु केला आहे. यांतर्गत जिल्ह्यात यावर्षी ३६ मामा तलावांची दुरुस्ती व पुर्नबांधणीचे काम होणार आहेत. तसेच इतर अर्धवट सिंचन प्रकल्पांच्या कामाला गती येणार असल्याने जिल्ह्यात येणाऱ्या दिवसांत सिंचन क्रांती होणार असल्याचे प्रतिपादन, जिल्ह्याचे पालकमंत्री व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ताडगाव येथील मामा तलावाच्या दुरुस्ती व पुर्नस्थापना कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने माजी आमदार दयाराम कापगते, जिल्हा परिषद सदस्य मंदा कुंभरे, पंचायत समिती सदस्य पंधरे, रघुनाथ लांजेवार, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एन.के. ढोरे, पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष अमृत नाकाडे, सरपंच रेखा मडावी, गौरीशंकर अवचटे, प्रभाकर काळबांधे, विनोद नाकाडे, नूतन सोनवाने, संदीप कापगते, देवेंद्र टेंभरे आदी उपस्थित होते.पुढे बोलताना ना. बडोले यांनी, आपल्या जिल्ह्याला जुन्या काळापासून तलावांची परंपरा लाभलेली आहे. आपल्या पूर्वजांनी व्यापक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून मालगुजारी तलावांची बांधणी केल्यामुळे इतर जिल्ह्यापेक्षा सिंचनाच्या बाबतीत आपली चांगली स्थिती आहे. यामुळेच तलावांचा जिल्हा म्हणून आपल्या जिल्ह्याची ओळख आहे. मात्र मागील बऱ्याच काळापासून तलावांची देखभाल दुरुस्ती न झाल्यामुळे शेतकऱ्यांना व पर्यायाने पिक, गुरांना पाण्याचा प्रश्न पडतो. सरकार या बाबतीत गंभीर असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जलयुक्त शिवारामुळे राज्यात जलक्रांती होत आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व मामा तलावांच्या दुरुस्तीचे कार्य हाती घेतले असल्याचे सांगीतले. तसेच जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती सरकार जाणून आहे. मागील वर्षी २५० व या वर्षी २०० रुपये प्रती क्विंटल प्रोत्साहन अनुदान मदत म्हणून सरकारने दिले आहे. मात्र आता शेतकऱ्यांनी पिक पद्धतीत बदल करुन आपली स्थिती कशी सुधारणार याकडे लक्ष घालणे गरजेचे असल्याचे ते बोलले. ताडगाववासीयांना विधानसभा निवडणुकाआधी दिलेले वचन पूर्ण करीत असून या माध्यमाने आपल्याशी भेट व्हावी हा या भूमिपूजनामागचा उद्देश होता, असेही ते म्हणाले. याप्रसंगी पाणी वापर संस्था व ग्रामपंचायत ताडगावच्यावतीने नामदार बडोले यांचा सत्कार करण्यात आला. सदर दुरुस्ती कार्याचा खर्च ६५ लक्ष असून यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाकरिता मोठा लाभ मिळणार असल्याची माहिती ढोरे यांनी दिली. संचालन सोनदास गणवीर यांनी करुन आभार मानले. (शहर प्रतिनिधी)