शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन सुविधा देणारे कालवे अतिक्रमणात

By admin | Updated: November 23, 2014 23:23 IST

बाघ इटियाडोह पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या बाघ पाटबंधारे व्यवस्थापन उपविभाग आमगाव येथील अधिकाऱ्यांच्या संगनमताने होणारे कालव्यांचे व्यवस्थापन धोक्यात आले आहे.

आमगाव : बाघ इटियाडोह पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या बाघ पाटबंधारे व्यवस्थापन उपविभाग आमगाव येथील अधिकाऱ्यांच्या संगनमताने होणारे कालव्यांचे व्यवस्थापन धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतीला सिंचन सुविधा देणारे कालवे अतिक्रमणधारकांनी खाजगी मालमत्ता समजून त्यावर पक्के घर तसेच रस्त्यांचे बांधकाम सुरु केले आहे.आमगाव येथील बाघ इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापनातील उपविभागीय कार्यालयाच्या दुर्लक्षितपणामुळे कालव्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधेकरीता शासनाने कोट्यवधींचा निधी कालवे बांधकामासाठी खर्च करुन बाघ कालव्यांचे बांधकाम पूर्ण केले. धरण व कालव्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी शासनाचा निधी कमी पडत नाही. परंतु कालव्यांच्या संरक्षणासाठी विभागातील अधिकारी कामचुकारपणा करीत असल्यामुळे कालव्यांच्या जमिनी खासगी वापरात जात आहेत. बाघ इडियाडोह पाटबंधारे उपविभागाअंतर्गत पुजारीटोला, कालिसराड, सिरपूर या सिंचन धरणासह कालव्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदरारी शासनाने निश्चित केली आहे. पाणी साठवण धरणातील सिंचन सुविधा व कालव्यांच्या व्यवस्थापनाकरीता शेतकऱ्यांकडून मागणी वाढत असताना धरण व कालव्यांच्या व्यवस्थापनाकडे प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष होत असल्यामुळे सिंचन सुविधा मागे पाडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी सिंचनाची सोय अपुरी पडून समस्या निर्माण झाली आहे. आमगाव, बनगाव, रिसामा या परिसरातून बांधकालव्यांची जागा खासगी वापराकडे गेली आहे. या परिसरात धरणाकडून येणारे कालवे लोकवस्तींनी वेढलेले आहे. नागरिकांनी या कालव्यांवर अतिक्रमण करून पक्के बांधकाम केलेले दिसत आहेत. धरणातून निघालेले कालवे व त्यासह असलेली पाणवट मिळून ८० फुटाचा रुंदी भूभाग सिंचन सुविधांसाठी राखीव आहे. परंतु या कालव्यांसह पाणवटातून वाहणाऱ्या जागेवर अतिक्रमण वाढले आहे. याकडे अनेकदा संबंधित अधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या, परंतु अधिकारी व अतिक्रमणधारकांमध्ये असलेल्या संबंधांमुळे शासनाचेच विभाग कालव्यांच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करून अतिक्रमणाला बळ देत आहेत. आमगाव तालुक्यातील कालवा प्रवाह वाहणाऱ्या जागेवर अतिक्रमाणाचा वेढा वाढत असल्याने कालवे संपुष्टात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. धरण व कालवा परिसरातील अतिक्रमणाला वेळ देणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध शासनाने कठोर पाऊल उचलावे अशी मागणी केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)