शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

सिंचन सुविधा देणारे कालवे अतिक्रमणात

By admin | Updated: November 23, 2014 23:23 IST

बाघ इटियाडोह पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या बाघ पाटबंधारे व्यवस्थापन उपविभाग आमगाव येथील अधिकाऱ्यांच्या संगनमताने होणारे कालव्यांचे व्यवस्थापन धोक्यात आले आहे.

आमगाव : बाघ इटियाडोह पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या बाघ पाटबंधारे व्यवस्थापन उपविभाग आमगाव येथील अधिकाऱ्यांच्या संगनमताने होणारे कालव्यांचे व्यवस्थापन धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतीला सिंचन सुविधा देणारे कालवे अतिक्रमणधारकांनी खाजगी मालमत्ता समजून त्यावर पक्के घर तसेच रस्त्यांचे बांधकाम सुरु केले आहे.आमगाव येथील बाघ इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापनातील उपविभागीय कार्यालयाच्या दुर्लक्षितपणामुळे कालव्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधेकरीता शासनाने कोट्यवधींचा निधी कालवे बांधकामासाठी खर्च करुन बाघ कालव्यांचे बांधकाम पूर्ण केले. धरण व कालव्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी शासनाचा निधी कमी पडत नाही. परंतु कालव्यांच्या संरक्षणासाठी विभागातील अधिकारी कामचुकारपणा करीत असल्यामुळे कालव्यांच्या जमिनी खासगी वापरात जात आहेत. बाघ इडियाडोह पाटबंधारे उपविभागाअंतर्गत पुजारीटोला, कालिसराड, सिरपूर या सिंचन धरणासह कालव्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदरारी शासनाने निश्चित केली आहे. पाणी साठवण धरणातील सिंचन सुविधा व कालव्यांच्या व्यवस्थापनाकरीता शेतकऱ्यांकडून मागणी वाढत असताना धरण व कालव्यांच्या व्यवस्थापनाकडे प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष होत असल्यामुळे सिंचन सुविधा मागे पाडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी सिंचनाची सोय अपुरी पडून समस्या निर्माण झाली आहे. आमगाव, बनगाव, रिसामा या परिसरातून बांधकालव्यांची जागा खासगी वापराकडे गेली आहे. या परिसरात धरणाकडून येणारे कालवे लोकवस्तींनी वेढलेले आहे. नागरिकांनी या कालव्यांवर अतिक्रमण करून पक्के बांधकाम केलेले दिसत आहेत. धरणातून निघालेले कालवे व त्यासह असलेली पाणवट मिळून ८० फुटाचा रुंदी भूभाग सिंचन सुविधांसाठी राखीव आहे. परंतु या कालव्यांसह पाणवटातून वाहणाऱ्या जागेवर अतिक्रमण वाढले आहे. याकडे अनेकदा संबंधित अधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या, परंतु अधिकारी व अतिक्रमणधारकांमध्ये असलेल्या संबंधांमुळे शासनाचेच विभाग कालव्यांच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करून अतिक्रमणाला बळ देत आहेत. आमगाव तालुक्यातील कालवा प्रवाह वाहणाऱ्या जागेवर अतिक्रमाणाचा वेढा वाढत असल्याने कालवे संपुष्टात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. धरण व कालवा परिसरातील अतिक्रमणाला वेळ देणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध शासनाने कठोर पाऊल उचलावे अशी मागणी केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)