शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

केशोरी ते वडेगाव रस्ता अपघाताला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:38 IST

या दोन्ही रस्त्यांने ये-जा करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत असल्याने कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ...

या दोन्ही रस्त्यांने ये-जा करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत असल्याने कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. बांधकाम विभागाने या दोन्ही रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष देवून तातडीने दुरुस्तीची मागणी नागरिकांनी केली आहे. केशोरी ते वडेगाव (बंध्या) आणि केशोरी ते महागाव (शिरोली) ही दोन्ही रस्ते रहदारीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असून दैनंदिन कामासाठी दिवसरात्र या दोन्ही रस्त्याने मोठ्या प्रमाणात जडवाहनासह हलकी वाहनांची वर्दळ असते. शालेय विद्यार्थी सुध्दा दररोज या रस्त्याने ये-जा करीत असतात. केशोरी ते वडेगाव (बंध्या) हा रस्ता गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख रस्ता आहे. बाजारपेठेच्या दृष्टीने वडसा हे महत्वाचे ठिकाण असल्यामुळे या रस्त्यांने मोठया प्रमाणात नागरिक जात असतात. त्याच बरोबर अर्जुनी-मोरगाव तालुक्याला जाण्यासाठी केशोरी ते महागाव (शिरोली) या रस्त्याशिवाय दुसरा रस्ता नसल्यामुळे तालुक्याच्या दैनंदिन कामासाठी या रस्त्याने जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. ही दोन्ही रस्ते अत्यंत अरुंद असून पूर्णत: खड्डे पडून धोकादायक झाली आहेत. अनेकदा या रस्त्याने लहान-मोठी अपघात झाल्याने नागरिकांनी भिती वाटत आहे. दिवसेंदिवस या रस्त्याने अपघातात वाढ होत आहे. परंतु या दोन्ही रस्त्याच्या दुरुस्तीकडे या भागातील आमदार,खासदारांसह सबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. कदाचित मोठा अपघात होण्याची वाट पाहात तर नसावेत अशी नागरिकांकडून शंका व्यक्त केली जात आहे. या महत्वाच्या दोन्ही रस्त्याच्या दुरुस्तीकडे शासनाचे लक्ष नसल्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. या दोन्ही रस्त्याच्या दुरुस्तीकडे सबंधित विभागाने आणि लोकप्रतिनिधीने जातीने लक्ष देवून तातडीने या रस्त्याच्या रुंदीकरणासह दुरुस्तीची कामे सुरु करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.