शहरं
Join us  
Trending Stories
1
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
3
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
4
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
5
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
6
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
7
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
8
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले
9
प्रणित मोरे ऐकत नाय! क्रिकेटपटूच्या बहिणीसोबत वाढतेय जवळीक? 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडीओ पाहून चाहतेही अवाक्
10
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
11
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
12
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
13
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
14
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
16
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
17
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
18
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
19
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
20
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा

कामठा-पांजरा रस्ता अपघाताला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 21:37 IST

तालुक्यातील कामठा-आमगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या मार्गावरुन वाहन चालविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्डयांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून मागील वर्षभरात या मार्गावर तिघांचा बळी गेला आहे.

ठळक मुद्देवर्षभरात तिघांचा बळी : सार्वजनिक बांधकाम विभागाची बघ्याची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्यातील कामठा-आमगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या मार्गावरुन वाहन चालविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्डयांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून मागील वर्षभरात या मार्गावर तिघांचा बळी गेला आहे. मात्र कुंभकर्णी झोपेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला अद्यापही जाग आली नसल्याने हा मार्ग अपघाताला आमंत्रण देत आहे.कामठा-आमगाव मार्गे भोषा ते पांजरा हा रस्ता खड्डयांमुळे गायब झाल्याचे चित्र आहे. डांबरीकरण केलेला रस्ता पूर्णपणे उखडला असल्याने या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या गावकºयांना सुध्दा त्रास सहन करावा लागत आहे. भोसा, किकरीपार, कट्टीपार, बनगाव, गणेश घाट या रस्त्यांची सुध्दा तिच स्थिती आहे. वर्षाभरात या ठिकाणी तीन अपघात झाले असून त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याच मार्गावरुन बालाघाट ते डोंगरगड, राजनांदगाव, रायपूर, भिलाई येथील प्रवासी प्रवास करतात. मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातील शेकडो दुचाकी, चारचाकी व जडवाहन या रस्त्यावरुन धावतात. मागील वर्षभरापासून अद्यापही या रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने आतातरी याची दखल घेवून रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी भोसा येथील सरपंच सुनील ब्राम्हणकर, सहकार चळवळीचे नेते सुखदेव ब्राम्हणकर, कालीमाटीचे सरपंच गजानन भूते, करंजीचे सरपंच डॉ. हंसराज चुटे, काँग्रेसचे नेते गणेश हुकरे, गणेश हर्षे, शंकर रहांगडाले, युवराज पटले, महेंद्र रहांगडाले, बंडू सोनवाने, अशोक खोब्रागडे, लोकचंद तरोणे, हुलसराम बहेकार, शंकर कुरंजेकर, योगेश्वर फरकुंडे, एकनाथ हत्तीमारे, सरिता बहेकार, संगिता फुंडे, मनिषा मटाले, कांता मटाले, वच्छला बागडे, देवानंद डोंगरे, योगेश चुटे, धनिराम मरस्कोल्हे, हेमंत तावाडे, पारबता भांडारकर, पारबता हेमणे, ललीता लांजेवार, केशर फुंडे यांनी केली आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदारकामठा ते आमगाव या रस्त्याच्या देखभाल दुरूस्तीचे जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. मात्र या विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे रस्त्याची पूर्णपणे वाट लागली आहे. गावकऱ्यांनी याबाबत ची तक्रार केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदाराला पत्र देऊन मोकळे होण्यातच धन्यता मानली. त्यामुळे रस्त्याची समस्या कायम आहे.