शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

कामठा-पांजरा रस्ता अपघाताला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 21:37 IST

तालुक्यातील कामठा-आमगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या मार्गावरुन वाहन चालविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्डयांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून मागील वर्षभरात या मार्गावर तिघांचा बळी गेला आहे.

ठळक मुद्देवर्षभरात तिघांचा बळी : सार्वजनिक बांधकाम विभागाची बघ्याची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्यातील कामठा-आमगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या मार्गावरुन वाहन चालविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्डयांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून मागील वर्षभरात या मार्गावर तिघांचा बळी गेला आहे. मात्र कुंभकर्णी झोपेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला अद्यापही जाग आली नसल्याने हा मार्ग अपघाताला आमंत्रण देत आहे.कामठा-आमगाव मार्गे भोषा ते पांजरा हा रस्ता खड्डयांमुळे गायब झाल्याचे चित्र आहे. डांबरीकरण केलेला रस्ता पूर्णपणे उखडला असल्याने या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या गावकºयांना सुध्दा त्रास सहन करावा लागत आहे. भोसा, किकरीपार, कट्टीपार, बनगाव, गणेश घाट या रस्त्यांची सुध्दा तिच स्थिती आहे. वर्षाभरात या ठिकाणी तीन अपघात झाले असून त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याच मार्गावरुन बालाघाट ते डोंगरगड, राजनांदगाव, रायपूर, भिलाई येथील प्रवासी प्रवास करतात. मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातील शेकडो दुचाकी, चारचाकी व जडवाहन या रस्त्यावरुन धावतात. मागील वर्षभरापासून अद्यापही या रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने आतातरी याची दखल घेवून रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी भोसा येथील सरपंच सुनील ब्राम्हणकर, सहकार चळवळीचे नेते सुखदेव ब्राम्हणकर, कालीमाटीचे सरपंच गजानन भूते, करंजीचे सरपंच डॉ. हंसराज चुटे, काँग्रेसचे नेते गणेश हुकरे, गणेश हर्षे, शंकर रहांगडाले, युवराज पटले, महेंद्र रहांगडाले, बंडू सोनवाने, अशोक खोब्रागडे, लोकचंद तरोणे, हुलसराम बहेकार, शंकर कुरंजेकर, योगेश्वर फरकुंडे, एकनाथ हत्तीमारे, सरिता बहेकार, संगिता फुंडे, मनिषा मटाले, कांता मटाले, वच्छला बागडे, देवानंद डोंगरे, योगेश चुटे, धनिराम मरस्कोल्हे, हेमंत तावाडे, पारबता भांडारकर, पारबता हेमणे, ललीता लांजेवार, केशर फुंडे यांनी केली आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदारकामठा ते आमगाव या रस्त्याच्या देखभाल दुरूस्तीचे जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. मात्र या विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे रस्त्याची पूर्णपणे वाट लागली आहे. गावकऱ्यांनी याबाबत ची तक्रार केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदाराला पत्र देऊन मोकळे होण्यातच धन्यता मानली. त्यामुळे रस्त्याची समस्या कायम आहे.