शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विनियोग समिती नेमा

By admin | Updated: February 15, 2016 02:03 IST

राज्य शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविणाऱ्या गावांना लोकसंख्येच्या आधारावर लाखो रुपयांची बक्षीसे वाटली.

अहवाल गेला नाही : अपहार थांबविण्यासाठी कार्यकारिणीची गरजगोंदिया : राज्य शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविणाऱ्या गावांना लोकसंख्येच्या आधारावर लाखो रुपयांची बक्षीसे वाटली. या बक्षिसांच्या रक्कमेचे नियोजन कसे करावे, यासाठी शासनाने नियोजन पत्रकेही काढली. मात्र ग्राम पंचायतीमार्फत पुरस्कार रकमेचा अपहार केल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना प्राप्त झाल्या. हा प्रकार राज्यातच आहे. या पुरस्काराचा अपहार थांबविण्यासाठी तालुकास्तरावर विनियोग व आॅडिी करणारी समिती नेमणे गरजेचे झाले आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरु झाली. या मोहिमेत पहिल्या वर्षी गोंदिया जिल्ह्यातील ५६ गावे, दुसऱ्या २६२ गावे, तिसऱ्या वर्षी २०५ गावे व चौथ्या वर्षी उर्वरित अशा एकूण ५५६ गावांना शासनाने कोट्यवधींची बक्षिसे वाटली. परंतू या पुरस्कार रकमेचा विनियोग काही ग्राम पंचायतींनी योग्यरीत्या न केल्यामुळे समित्यांच्या तक्रारी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्या. बिरसी, हिवरा, पांजरा व आमगाव तालुक्यातील भजेपार या गावांच्या तक्रारी बऱ्याच गाजल्या. पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे पुरस्कार प्राप्त गावांकडून विनियोग केल्याचा अहवाल मागविण्यात आला होता. मात्र अनेक ग्रामपंचायतींनी पुरस्कार रकमेच्या विनियोगाचा अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयाला दिलेला नाही.यामुळे पुरस्कार रकमेत मोठा घोळ झाला असावा, अशी दाट शक्यता आहे. यासाठी तालुकास्तरावर एक समिती गठित केल्यास ही समिती पुरस्कार रकमेचे नियोजन योग्य झाले की नाही, त्याची पाहणी करेल. या समितीत पोलीस विभागाचा एक व्यक्ती, महसूल विभागाचा एक व्यक्ती, खंडविकास अधिकारी, सरपंच प्रतिनिधी, पोलीस पाटील प्रतिनिधी व पत्रकार प्रतिनिधीचा समावेश करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील सर्व गावे तंटामुक्त झाली. परंतु पहिल्या तीन वर्षात प्राप्त झालेल्या ५५६ गावांना पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कार रकमेचे नियोजन योग्य झाले की नाही हे पाहण्याची सर्वस्व जबाबदारी तालुकास्तरावर कार्यकारिणी गठित करुन त्यांना द्यावी, अशी मागणी मोहिम राबविणाऱ्यांंनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)