शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

विनियोग समिती नेमा

By admin | Updated: February 15, 2016 02:03 IST

राज्य शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविणाऱ्या गावांना लोकसंख्येच्या आधारावर लाखो रुपयांची बक्षीसे वाटली.

अहवाल गेला नाही : अपहार थांबविण्यासाठी कार्यकारिणीची गरजगोंदिया : राज्य शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविणाऱ्या गावांना लोकसंख्येच्या आधारावर लाखो रुपयांची बक्षीसे वाटली. या बक्षिसांच्या रक्कमेचे नियोजन कसे करावे, यासाठी शासनाने नियोजन पत्रकेही काढली. मात्र ग्राम पंचायतीमार्फत पुरस्कार रकमेचा अपहार केल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना प्राप्त झाल्या. हा प्रकार राज्यातच आहे. या पुरस्काराचा अपहार थांबविण्यासाठी तालुकास्तरावर विनियोग व आॅडिी करणारी समिती नेमणे गरजेचे झाले आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरु झाली. या मोहिमेत पहिल्या वर्षी गोंदिया जिल्ह्यातील ५६ गावे, दुसऱ्या २६२ गावे, तिसऱ्या वर्षी २०५ गावे व चौथ्या वर्षी उर्वरित अशा एकूण ५५६ गावांना शासनाने कोट्यवधींची बक्षिसे वाटली. परंतू या पुरस्कार रकमेचा विनियोग काही ग्राम पंचायतींनी योग्यरीत्या न केल्यामुळे समित्यांच्या तक्रारी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्या. बिरसी, हिवरा, पांजरा व आमगाव तालुक्यातील भजेपार या गावांच्या तक्रारी बऱ्याच गाजल्या. पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे पुरस्कार प्राप्त गावांकडून विनियोग केल्याचा अहवाल मागविण्यात आला होता. मात्र अनेक ग्रामपंचायतींनी पुरस्कार रकमेच्या विनियोगाचा अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयाला दिलेला नाही.यामुळे पुरस्कार रकमेत मोठा घोळ झाला असावा, अशी दाट शक्यता आहे. यासाठी तालुकास्तरावर एक समिती गठित केल्यास ही समिती पुरस्कार रकमेचे नियोजन योग्य झाले की नाही, त्याची पाहणी करेल. या समितीत पोलीस विभागाचा एक व्यक्ती, महसूल विभागाचा एक व्यक्ती, खंडविकास अधिकारी, सरपंच प्रतिनिधी, पोलीस पाटील प्रतिनिधी व पत्रकार प्रतिनिधीचा समावेश करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील सर्व गावे तंटामुक्त झाली. परंतु पहिल्या तीन वर्षात प्राप्त झालेल्या ५५६ गावांना पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कार रकमेचे नियोजन योग्य झाले की नाही हे पाहण्याची सर्वस्व जबाबदारी तालुकास्तरावर कार्यकारिणी गठित करुन त्यांना द्यावी, अशी मागणी मोहिम राबविणाऱ्यांंनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)