शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

खेड्यापाड्यातही वाढला इंटरनेटचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 22:07 IST

शहरापाठोपाठ आता इंटरनेटचा वापर खेड्यापाड्यातही मोठ्या प्रमाणात होत आहे. दिवसेंदिवस अँड्रॉईड मोबाईलची वाढती क्रेझ प्रत्येक घराघरात आली आहे. याची भुरळ आता ग्रामीण भागातील लोकांना घालत आहे. अगदी पहिली ते दुसरी वर्गापासूनच्या तर मोठ्यापर्यंत मुलांकडे अँड्रॉईड मोबाईल दिसून येत आहेत. लहान मुले मात्र १० ते २० रुपयांचे रिचार्ज मारताना दिसत आहेत.

ठळक मुद्देमैदानी खेळांबाबत उदासीनता : संस्कार शिबिरातून जागृती करणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : शहरापाठोपाठ आता इंटरनेटचा वापर खेड्यापाड्यातही मोठ्या प्रमाणात होत आहे. दिवसेंदिवस अँड्रॉईड मोबाईलची वाढती क्रेझ प्रत्येक घराघरात आली आहे. याची भुरळ आता ग्रामीण भागातील लोकांना घालत आहे. अगदी पहिली ते दुसरी वर्गापासूनच्या तर मोठ्यापर्यंत मुलांकडे अँड्रॉईड मोबाईल दिसून येत आहेत. लहान मुले मात्र १० ते २० रुपयांचे रिचार्ज मारताना दिसत आहेत.ग्रामीण भागात प्रचलित असलेले मैदानी खेळ आता इतिहासजमा होत आहेत. सोबतच समाजाशी एकरुप असलेला वर्ग समाजापासून दूर जात आहे असेही वाटत आहे. मुलांना शाळेत सांगितलेला प्रकल्प मुले नेटवर सर्च करून सोडविताना दिसतात. मुळात प्रकल्प म्हणजे मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा. त्यात विचार करायला भाग पाडणे प्रत्यक्षात लोकांच्या भेटीगाठी घेऊन त्याविषयी चौकशी करून त्याने तो प्रकल्प तयार करावा असे असताना ग्रामीण भागातील मुले नेटवर सर्व करून शाळेतील प्रकल्प पूर्ण करताना दिसतात. तासन्तास नेट सर्फींग करून तो समाजापासून दूर जाताना दिसतो आहे.या प्रकल्पामुळे समाज संस्कृतीपासून दुरावत आहे. उन्हाळ्याच्या सुट्या म्हणजे मामाचे गाव. आमराईतील डाबडबलीचे खेळ, मित्र सवंगी, फिरण्या बागडण्याचे दिवस. परंतु इंटरनेटच्या वेडापाई हे सर्व दुय्यम झालेले दिसून येत आहे. दिवसागणिक वाढत चाललेली इंटरनेरटचा वापर हा आपल्या संस्कृतीला देखील धोका पोहचू शकतो. खरे तर यांची सुरुवात आण केली. मुलांना या विषयी आकर्षण निर्माण करून देतो. त्यामुळे तो शांत होतो. या व अशा अनेक उदाहरणावरून आपणच आपल्या मुलांना मोबाईलचा वापर करण्यासंबंधी प्रोत्साहीत करीत असतो. जे आपल्याला जमले नाही ते त्याने केले असे म्हणून त्याची वाहवाह करतो. पण हे त्याला गरजेनुसार दिले पाहिजे.त्यासाठीच पालकांनी आपल्या आपल्या मुलाकडे लक्ष दिले पाहिजे. आपला मुलगा किती वेळा इंटरनेटचा वापर करतो व किती वेळा बाहेर फिरायला खेळायला जातो यावर लक्ष देणे गरजेचे आहे. तरच आपली संस्कृती आपण जपू व आपल्यासोबतच आपल्या पुढील पिढीशी नाळ देखील समाजाशी घट्ट करता येईल एवढे मात्र खरे.