शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

खेड्यापाड्यातही वाढला इंटरनेटचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 22:07 IST

शहरापाठोपाठ आता इंटरनेटचा वापर खेड्यापाड्यातही मोठ्या प्रमाणात होत आहे. दिवसेंदिवस अँड्रॉईड मोबाईलची वाढती क्रेझ प्रत्येक घराघरात आली आहे. याची भुरळ आता ग्रामीण भागातील लोकांना घालत आहे. अगदी पहिली ते दुसरी वर्गापासूनच्या तर मोठ्यापर्यंत मुलांकडे अँड्रॉईड मोबाईल दिसून येत आहेत. लहान मुले मात्र १० ते २० रुपयांचे रिचार्ज मारताना दिसत आहेत.

ठळक मुद्देमैदानी खेळांबाबत उदासीनता : संस्कार शिबिरातून जागृती करणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : शहरापाठोपाठ आता इंटरनेटचा वापर खेड्यापाड्यातही मोठ्या प्रमाणात होत आहे. दिवसेंदिवस अँड्रॉईड मोबाईलची वाढती क्रेझ प्रत्येक घराघरात आली आहे. याची भुरळ आता ग्रामीण भागातील लोकांना घालत आहे. अगदी पहिली ते दुसरी वर्गापासूनच्या तर मोठ्यापर्यंत मुलांकडे अँड्रॉईड मोबाईल दिसून येत आहेत. लहान मुले मात्र १० ते २० रुपयांचे रिचार्ज मारताना दिसत आहेत.ग्रामीण भागात प्रचलित असलेले मैदानी खेळ आता इतिहासजमा होत आहेत. सोबतच समाजाशी एकरुप असलेला वर्ग समाजापासून दूर जात आहे असेही वाटत आहे. मुलांना शाळेत सांगितलेला प्रकल्प मुले नेटवर सर्च करून सोडविताना दिसतात. मुळात प्रकल्प म्हणजे मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा. त्यात विचार करायला भाग पाडणे प्रत्यक्षात लोकांच्या भेटीगाठी घेऊन त्याविषयी चौकशी करून त्याने तो प्रकल्प तयार करावा असे असताना ग्रामीण भागातील मुले नेटवर सर्व करून शाळेतील प्रकल्प पूर्ण करताना दिसतात. तासन्तास नेट सर्फींग करून तो समाजापासून दूर जाताना दिसतो आहे.या प्रकल्पामुळे समाज संस्कृतीपासून दुरावत आहे. उन्हाळ्याच्या सुट्या म्हणजे मामाचे गाव. आमराईतील डाबडबलीचे खेळ, मित्र सवंगी, फिरण्या बागडण्याचे दिवस. परंतु इंटरनेटच्या वेडापाई हे सर्व दुय्यम झालेले दिसून येत आहे. दिवसागणिक वाढत चाललेली इंटरनेरटचा वापर हा आपल्या संस्कृतीला देखील धोका पोहचू शकतो. खरे तर यांची सुरुवात आण केली. मुलांना या विषयी आकर्षण निर्माण करून देतो. त्यामुळे तो शांत होतो. या व अशा अनेक उदाहरणावरून आपणच आपल्या मुलांना मोबाईलचा वापर करण्यासंबंधी प्रोत्साहीत करीत असतो. जे आपल्याला जमले नाही ते त्याने केले असे म्हणून त्याची वाहवाह करतो. पण हे त्याला गरजेनुसार दिले पाहिजे.त्यासाठीच पालकांनी आपल्या आपल्या मुलाकडे लक्ष दिले पाहिजे. आपला मुलगा किती वेळा इंटरनेटचा वापर करतो व किती वेळा बाहेर फिरायला खेळायला जातो यावर लक्ष देणे गरजेचे आहे. तरच आपली संस्कृती आपण जपू व आपल्यासोबतच आपल्या पुढील पिढीशी नाळ देखील समाजाशी घट्ट करता येईल एवढे मात्र खरे.