शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

खेड्यापाड्यातही वाढला इंटरनेटचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 22:07 IST

शहरापाठोपाठ आता इंटरनेटचा वापर खेड्यापाड्यातही मोठ्या प्रमाणात होत आहे. दिवसेंदिवस अँड्रॉईड मोबाईलची वाढती क्रेझ प्रत्येक घराघरात आली आहे. याची भुरळ आता ग्रामीण भागातील लोकांना घालत आहे. अगदी पहिली ते दुसरी वर्गापासूनच्या तर मोठ्यापर्यंत मुलांकडे अँड्रॉईड मोबाईल दिसून येत आहेत. लहान मुले मात्र १० ते २० रुपयांचे रिचार्ज मारताना दिसत आहेत.

ठळक मुद्देमैदानी खेळांबाबत उदासीनता : संस्कार शिबिरातून जागृती करणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : शहरापाठोपाठ आता इंटरनेटचा वापर खेड्यापाड्यातही मोठ्या प्रमाणात होत आहे. दिवसेंदिवस अँड्रॉईड मोबाईलची वाढती क्रेझ प्रत्येक घराघरात आली आहे. याची भुरळ आता ग्रामीण भागातील लोकांना घालत आहे. अगदी पहिली ते दुसरी वर्गापासूनच्या तर मोठ्यापर्यंत मुलांकडे अँड्रॉईड मोबाईल दिसून येत आहेत. लहान मुले मात्र १० ते २० रुपयांचे रिचार्ज मारताना दिसत आहेत.ग्रामीण भागात प्रचलित असलेले मैदानी खेळ आता इतिहासजमा होत आहेत. सोबतच समाजाशी एकरुप असलेला वर्ग समाजापासून दूर जात आहे असेही वाटत आहे. मुलांना शाळेत सांगितलेला प्रकल्प मुले नेटवर सर्च करून सोडविताना दिसतात. मुळात प्रकल्प म्हणजे मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा. त्यात विचार करायला भाग पाडणे प्रत्यक्षात लोकांच्या भेटीगाठी घेऊन त्याविषयी चौकशी करून त्याने तो प्रकल्प तयार करावा असे असताना ग्रामीण भागातील मुले नेटवर सर्व करून शाळेतील प्रकल्प पूर्ण करताना दिसतात. तासन्तास नेट सर्फींग करून तो समाजापासून दूर जाताना दिसतो आहे.या प्रकल्पामुळे समाज संस्कृतीपासून दुरावत आहे. उन्हाळ्याच्या सुट्या म्हणजे मामाचे गाव. आमराईतील डाबडबलीचे खेळ, मित्र सवंगी, फिरण्या बागडण्याचे दिवस. परंतु इंटरनेटच्या वेडापाई हे सर्व दुय्यम झालेले दिसून येत आहे. दिवसागणिक वाढत चाललेली इंटरनेरटचा वापर हा आपल्या संस्कृतीला देखील धोका पोहचू शकतो. खरे तर यांची सुरुवात आण केली. मुलांना या विषयी आकर्षण निर्माण करून देतो. त्यामुळे तो शांत होतो. या व अशा अनेक उदाहरणावरून आपणच आपल्या मुलांना मोबाईलचा वापर करण्यासंबंधी प्रोत्साहीत करीत असतो. जे आपल्याला जमले नाही ते त्याने केले असे म्हणून त्याची वाहवाह करतो. पण हे त्याला गरजेनुसार दिले पाहिजे.त्यासाठीच पालकांनी आपल्या आपल्या मुलाकडे लक्ष दिले पाहिजे. आपला मुलगा किती वेळा इंटरनेटचा वापर करतो व किती वेळा बाहेर फिरायला खेळायला जातो यावर लक्ष देणे गरजेचे आहे. तरच आपली संस्कृती आपण जपू व आपल्यासोबतच आपल्या पुढील पिढीशी नाळ देखील समाजाशी घट्ट करता येईल एवढे मात्र खरे.